शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव हरेश्वर येथे १५ दिवसांआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 15:49 IST

टंचाईच्या तीव्र झळा : ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय, टँकर सुरु करण्याची मागणी

एस. एम. जैन ।पिंपळगाव हरेश्वर, ता.पाचोरा : येथे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थ पाण्यासाठी वणवण भटकंती करतांना दिसत आहेत. १५ दिवसाआड ४० मिनिटे पाणीपुरवठा होत असल्याची गंभीर स्थिती आहे.पिंपळगाव हरे. येथे गेल्या वर्षी कमी पाऊस झाला. त्यामुळे यावर्षी ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असे संकेत जाणकारांनी व्यक्त केले होते. त्याचा अनुभव आज रोजी पिंपळगाव करांना येत आहे.पिंपळगाव हरे. हे पाचोरा तालुक्यातील मोठे गाव आहे. लोकसंख्या सुमारे ३० हजार आहे. पाणी पुरवठ्यासाठी गावात ७५ व्हॉल्व्ह असून जनावरे व कपडे धुण्यासाठी ८ हाळ (पाण्याचे कुंड) आहेत. महिला स्वच्छतागृहासाठी मुख्य जलवाहिनी वरुन पाणी पुरवठा होत आहे.पाणी टंचाईस तोंड देण्यासाठी ग्राम पंचायतीचे प्रयत्नगावातील जुन्या विहिरीतील गाळ काढणे काही विहिरीत आडवे बोअर लावणे अशी कामे ग्रामपंचायत करीत आहे. गावात ७ विंधन विहिरी आहेत. बाजार पेठेतील विंधन विहिरीला चांगले पाणी आहे. हॉटेल व परिसरातील ग्रामस्थांना तेथून पाणी मिळते. गावातील ७ विंधन विहिरींपैकी आठवडे बाजार, गोविंद महाराज देवालय व हरेश्वर देवालय जवळील विंधन विहिरीवर शासकीय योजनेतून सोलर पंप व ५ हजार लिटरची पाण्याची टाकी बसवणार आहेत. धरण क्षेत्रात २ विहिरी सारखे खड्डे आहेत त्यात झिरपून येणाऱ्या पाण्यासाठी वीज पंप, धरण क्षेत्रात असलेल्या विहिरीवर तीन वीज पंप सुमारे १२ तास पाणी उपलब्ध करीत आहे असे पाणी एकत्र करून गावाला १५ दिवसात ४० मिनिटे पाणी पुरवठा केला जात आहे.कल६ कि. मी. लांब असलेल्या कोल्हे धरणावरुन पाणी पुरवठा सुरु करण्यासाठी शासनान ४ कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. मात्र ही योजना घोडसगाव धरणा पासून ४ कि. मी. अंतरावरील झिंगापूर धरणावरुन केल्यास पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविला जाईल.दरम्यान सध्या गावकरी पाणी टंचाईने त्रस्त झाले असून याची दखल घेत राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी लक्ष घालावे आािण ही समस्या सोडवावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.धरणात केवळ मृतसाठा शिल्लकपिंपळगाव हरे. येथे घोडसगाव धरणातून पाणीपुरवठा होतो. अत्यल्प पावसामुळे नदीला पूर नाही मात्र अजिंठा डोंगरावर झालेल्या जोरदार पावसामुळे सोयगाव तालुक्यातील झिंगापूर धरण भरले व त्याचेच काही पाणी घोडसगाव धरणात आल्याने धरणात काही प्रमाणात पाणी आहे. त्या पाण्याचा काटकसरीने वापर पिंपळगाव ग्रा.पं. करीत आहे. आता धरणात केवळ मृतसाठा शिल्लक आहे. धरण क्षेत्रातील जलस्वराज्य योजना व क्षेत्रातील काही विहिरी याचा उपयोग करून आज रोजी गावाला १५ दिवसांनी पाणी दिले जात आहे असे सरपंच म्हणाले.