शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

पिंपळगाव हरेश्वर येथे १५ दिवसांआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 15:49 IST

टंचाईच्या तीव्र झळा : ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय, टँकर सुरु करण्याची मागणी

एस. एम. जैन ।पिंपळगाव हरेश्वर, ता.पाचोरा : येथे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थ पाण्यासाठी वणवण भटकंती करतांना दिसत आहेत. १५ दिवसाआड ४० मिनिटे पाणीपुरवठा होत असल्याची गंभीर स्थिती आहे.पिंपळगाव हरे. येथे गेल्या वर्षी कमी पाऊस झाला. त्यामुळे यावर्षी ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असे संकेत जाणकारांनी व्यक्त केले होते. त्याचा अनुभव आज रोजी पिंपळगाव करांना येत आहे.पिंपळगाव हरे. हे पाचोरा तालुक्यातील मोठे गाव आहे. लोकसंख्या सुमारे ३० हजार आहे. पाणी पुरवठ्यासाठी गावात ७५ व्हॉल्व्ह असून जनावरे व कपडे धुण्यासाठी ८ हाळ (पाण्याचे कुंड) आहेत. महिला स्वच्छतागृहासाठी मुख्य जलवाहिनी वरुन पाणी पुरवठा होत आहे.पाणी टंचाईस तोंड देण्यासाठी ग्राम पंचायतीचे प्रयत्नगावातील जुन्या विहिरीतील गाळ काढणे काही विहिरीत आडवे बोअर लावणे अशी कामे ग्रामपंचायत करीत आहे. गावात ७ विंधन विहिरी आहेत. बाजार पेठेतील विंधन विहिरीला चांगले पाणी आहे. हॉटेल व परिसरातील ग्रामस्थांना तेथून पाणी मिळते. गावातील ७ विंधन विहिरींपैकी आठवडे बाजार, गोविंद महाराज देवालय व हरेश्वर देवालय जवळील विंधन विहिरीवर शासकीय योजनेतून सोलर पंप व ५ हजार लिटरची पाण्याची टाकी बसवणार आहेत. धरण क्षेत्रात २ विहिरी सारखे खड्डे आहेत त्यात झिरपून येणाऱ्या पाण्यासाठी वीज पंप, धरण क्षेत्रात असलेल्या विहिरीवर तीन वीज पंप सुमारे १२ तास पाणी उपलब्ध करीत आहे असे पाणी एकत्र करून गावाला १५ दिवसात ४० मिनिटे पाणी पुरवठा केला जात आहे.कल६ कि. मी. लांब असलेल्या कोल्हे धरणावरुन पाणी पुरवठा सुरु करण्यासाठी शासनान ४ कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. मात्र ही योजना घोडसगाव धरणा पासून ४ कि. मी. अंतरावरील झिंगापूर धरणावरुन केल्यास पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविला जाईल.दरम्यान सध्या गावकरी पाणी टंचाईने त्रस्त झाले असून याची दखल घेत राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी लक्ष घालावे आािण ही समस्या सोडवावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.धरणात केवळ मृतसाठा शिल्लकपिंपळगाव हरे. येथे घोडसगाव धरणातून पाणीपुरवठा होतो. अत्यल्प पावसामुळे नदीला पूर नाही मात्र अजिंठा डोंगरावर झालेल्या जोरदार पावसामुळे सोयगाव तालुक्यातील झिंगापूर धरण भरले व त्याचेच काही पाणी घोडसगाव धरणात आल्याने धरणात काही प्रमाणात पाणी आहे. त्या पाण्याचा काटकसरीने वापर पिंपळगाव ग्रा.पं. करीत आहे. आता धरणात केवळ मृतसाठा शिल्लक आहे. धरण क्षेत्रातील जलस्वराज्य योजना व क्षेत्रातील काही विहिरी याचा उपयोग करून आज रोजी गावाला १५ दिवसांनी पाणी दिले जात आहे असे सरपंच म्हणाले.