शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

वीजबिलावरील मीटर रीडिंगचे छायाचित्र होणार गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 17:52 IST

१ फेब्रुवारीपासून अंमलबजावणी

पाचोरा : महावितरणकडून वीजबिलाबाबत तसेच मीटर रीडिंगबाबतची अद्ययावत माहिती एसएमएसद्वारे ग्राहकांच्या अधिकृत मोबाइलवर दिली जाते. छापील वीजबिल ग्राहकांना मिळण्यापूर्वीच मीटर रिडिंगची माहिती त्यांना मिळत असल्यामुळे आता १ फेब्रुवारीपासून महावितरणने वीजबिलावरील मीटर रिडिंगचे छायाचित्र देण्याची पद्धत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.वीज ग्राहकांना वीज मीटरच्या रिडिंगची अचूक माहिती मिळावी म्हणून महावितरणने वीजबिलावर मीटर रिडिंगचे छायाचित्र प्रसिद्ध करण्याची पद्धत सुरू केली होती. या निर्णयाचा महातिवरणसह ग्राहकांनाही पारदर्शक वीज बिलासाठी उपयोग होत आहे. या पुढचे पाऊल म्हणून डिजिटल युगाशी जुळवून घेत आता महावितरणकडून ग्राहकांना महावितरणसंबंधीच्या विविध सेवांची अद्ययावत माहिती एसएमएसद्वारे देण्यात येत आहे. त्यामुळे मोबाइल नोंदणी केलेल्या ग्राहकांना वीजबिल मिळण्यापूर्वीच मीटर रिडिंग घेतल्यानंतर त्याची माहिती तत्काळ उपलब्ध होते. परिणामी ग्राहकांना आपले मीटर रिडिंग पडताळणीसाठी उपलब्ध होते. तसेच मीटर रिडिंगमध्ये काही तफावत आढळल्यास ती टोल फ्री क्रमांक अथवा नजीकच्या कार्यालयात संपर्क साधून दुरुस्त करता येणे शक्य होते. यामुळे छापील बिल मिळण्यापूर्वीच ग्राहकांना मीटर रिडिंग समजू लागल्याने आता यापुढे वीजबिलावरील मीटर रिडिंगचे छायाचित्र देण्याची पद्धत बंद करण्यात येणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले.सध्या महावितरणकडे २ कोटी ५० लाख वीजग्राहक आहेत. यापैकी सुमारे दोन कोटी सात लाखांहून अधिक ग्राहकांनी मोबाइल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली आहे. ज्यांनी मोबाइलची नोंदणी केलेली नाही त्यांनी या नव्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तत्काळ मोबाइल क्रमांकाची नोंदणी करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. 

टॅग्स :Jalgaonजळगाव