शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजना -महाजन

By admin | Updated: December 22, 2014 14:46 IST

दुष्काळ निवारणावर दरवर्षीच मोठा खर्च होतो मात्र कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी राज्य शासन काम करीत असल्याची माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

जामनेर : हरितक्रांती घडविण्याचे आपले नेहमीचे स्वप्न होते. आता जलसंपदा खात्याची जबाबदारी मिळाल्यामुळे प्रत्येक शेतकर्‍याच्या शेतीला वीज आणि पाणी देण्याचे माझे प्रयत्न असतील. दुष्काळ निवारणावर दरवर्षीच मोठा खर्च होतो मात्र कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी राज्य शासन काम करीत असल्याची माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

तेली समाजातर्फे आयोजित संत जगनाडे महाराज पुण्यतिथी व सत्कार सोहळ्याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना महाजन बोलत होते. व्यासपीठावर आर.टी. चौधरी, भुसावळचे माजी प्र.नगराध्यक्ष अनिल चौधरी, जि.प. सदस्य नामदेव तेली, उपनगराध्यक्ष उत्तम पवार, महेंद्र बाविस्कर आदी उपस्थित होते.
विजेवर उपायासाठी सोलरपंप
राज्यभरात विजेअभावी पिकांना पाणी देता येत नसल्याने उत्पादनात मोठी घट निर्माण झाली आहे. वीज, पाणी शेतकर्‍यांच्या मुख्य गरजा आहे. याच दृष्टिकोनातून विजेच्या समस्येवर मात करण्यासाठी शेतकर्‍यांना पाच लाख सोलर पंप देण्याचा निर्णय नुकताच मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. एक सोलर पंप पाच लाख रुपयांचा आहे. यात शेतकर्‍याचे २५ हजार तर शासनाचा पावणेपाच लाख रुपये हिस्सा राहील. यामुळे वाटेल तेव्हा पिकांना पाणी देता येईल. त्याचबरोबर उद्योगांना, ग्राहकांनाही वीज देता येईल, असेही जलसंपदामंत्री महाजन यांनी नमूद केले. 
(वार्ताहर)
■ जलसंपदा हे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे खाते असून ते शेतकर्‍यांशी निगडित आहे. मोठय़ा प्रमाणावर निधी याच खात्यातून खर्च होत असल्याने अजित पवार यांनी पंधरा वर्ष ते आपल्याकडेच ठेवले होते. मात्र राज्यकर्त्यांनी भ्रष्टाचाराने या खात्याचा बट्टय़ाबोळ केला आहे. या भ्रष्टाचाराच्या चौकशीची परवानगी दिली गेली आहे. खात्यात खूप अनियमितता आहे. ते भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी आपले प्रयत्न आहेत. शेतकरी हितासाठी कामांना अधिक प्राधान्य दिले जाईल, असेही महाजन म्हणाले. 
--------------------------
गावागावात हवामानमापक यंत्रे
ऐनपूर, ता.रावेर : नेहमी येणार्‍या वादळ, पाऊस, गारपिटीमुळे त्रस्त झालेल्या शेतकरीवर्गाला दिलासा देण्यासाठी गावागावात हवामानमापक यंत्र बसवले जाईल, अशी माहिती महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली.
आतापर्यंत हवामानमापक यंत्र हे प्रत्येक तालुक्याच्या मंडळ असलेल्या ठिकाणी बसविण्यात आले होते.ते यापुढे प्रत्येक गावागावात बसविले जाणार आहे. मंडळाच्या ठिकाणी असलेल्या यंत्रामुळे शासनाला नुकसानीचा अंदाज नेमका ठरवता येत नव्हता. नुकसानीचा योग्य अंदाज बांधण्याकरिता महाराष्ट्रात प्रत्येक गावात हवामानमापक यंत्र बसवले जाणार असल्याने त्या गावात वादळ, गारपीटमुळे किती नुकसान झाले याचा अंदाज कळणार आहे.
यंत्रामुळे मिळणार विम्याची रक्कम 
गावात यंत्र बसल्यानंतर शेतकर्‍यांनी काढलेल्या विम्याची रक्कम तत्काळ मिळण्यासाठी याचा फायदा होणार आहे. 
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन-धन योजनेंतर्गत लाभाथर्र्ींचे खाते न उघडणार्‍या राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकारी बडतर्फ केले जातील.तसेच जे अधिकारी खाते उघडणार नाही त्यांचीही आपल्याकडे लेखी तक्रार करावी, असे आवाहन खडसे यांनी केले.
नुकसान भरपाई हेक्टरी दहा हजारावरून २५हजार रुपये करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली
ऐनपूर येथे दिवंगत डिगंबर पाटील यांच्याकडे आले असता शेतकर्‍यांच्या समस्या समजण्याकरिता त्यांनी शेतकर्‍यांची सभा घेतली.पं.स. सदस्य नंदू महाजन, अशोक कांडेलकर, राजेंद्र पाटील, प्रगतशील शेतकरी विकास महाजन, कमलेश महाजन, राजू महाजन, सरपंच मुरलीधर पाटील, तसेच गावातील शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)