शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
'AI वर आंधळा विश्वास ठेवू नका; यातील गुंतवणुकीचा फुगा कधीही फुटू शकतो' सुंदर पिचाईं यांचा इशारा!
4
"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
5
Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
6
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
7
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
8
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
9
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
10
शेअर बाजारात आजही घसरण, २५,९०० च्या खाली निफ्टी; IT Stocks मध्ये मोठी खरेदी
11
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
12
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
13
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
14
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
15
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
16
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
17
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
18
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
19
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
20
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:32 IST

जळगाव : जिल्ह्यातील १५०२ गावांची अंतिम पैसेवारी मंगळवारी जाहीर करण्यात आली असून, ही पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक असल्याची माहिती ...

जळगाव : जिल्ह्यातील १५०२ गावांची अंतिम पैसेवारी मंगळवारी जाहीर करण्यात आली असून, ही पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. गत दोन वर्षांपासून पर्जन्यमान चांगले झाल्याने पैसेवारी ५० पैसांपेक्षा अधिक आली आहे.

गत दोन वर्षांपासून जळगाव जिल्ह्यात १०० टक्केपेक्षा अधिक पर्जन्यमान झाले आहे. प्रत्येक वर्षी दुष्काळाच्या दृष्टीने पैसेवारी निश्चित केली जाते. नजर पैसेवारी, सुधारित पैसेवारी आणि अंतिम पैसेवारी अशा तीन टप्प्यांत ही पैसेवारी घेतली जाते. स्थानिक ठिकाणची पीक परिस्थिती पाहून ही पैसेवारी निश्‍चित केली जात असते. यंदा दुष्काळाचे निकष बदलले असले तरी त्याचाच एक भाग म्हणून पैसेवारी निश्‍चित करण्यात आली आहे. यात जिल्ह्यात १५०२ गावे असून, या सर्व गावांची पैसेवारी ही ५० पैसांपेक्षा अधिक आहे. पैसेवारी अधिक असल्याने दुष्काळाची परिस्थिती नसल्याचे मानले जात आहे.

अशी आहेत गावे

जळगाव-९२, जामनेर १५३, एरंडोल ६५, धरणगाव ८९, पारोळा ११४, भुसावळ ५४, बोदवड ५१, मुक्ताईनगर ८१, यावल ८४, रावेर १२०, पाचोरा १२९, भडगाव ६३, अमळनेर १५४, चोपडा ११६, चाळीसगाव १३७ असे एकूण १५०२ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक आहे.