शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

गिरणा धरणाचा टक्का वाढतोय; पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:16 IST

संजय हिरे खेडगाव, ता. भडगाव : मागील तीन वर्षे ऑगस्टमध्येच गिरणा धरणातील जलसाठ्याने शंभरी गाठली होती. यावर्षी ...

संजय हिरे

खेडगाव, ता. भडगाव : मागील तीन वर्षे ऑगस्टमध्येच गिरणा धरणातील जलसाठ्याने शंभरी गाठली होती. यावर्षी मात्र पावसाळ्यात अद्यापपावेतो २४ तासांत फक्त अर्धा ते एक टक्का वाढ नोंदवीत शंभरीसाठी तिष्ठत ठेवत आहे.

यावर्षी सर्वदूर चांगला पाऊस झाला. खान्देशात बहुतांश धरणांनी शंभरी गाठली. गिरणा धरण या स्पर्धेत मागे पडले आहे. शुक्रवारी सकाळी गिरणा धरणात ७०.७३ टक्के जलसाठा होता, तो ७५ टक्क्यांच्या दिशेने वाटचाल करीत आहे. मागील तीन वर्षांत ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये गिरणा धरणाच्या वरील भागांत जोरदार पर्जन्यवृष्टी झाली होती. नाशिक जिल्ह्यातील चणकापूर, हरणबारी, केळझर, पुनद मिळून पंधरा ते तीस हजार क्युसेकपर्यंत विसर्ग खाली गिरणा धरणात होई. एका दिवसात किंवा चोवीस तासांत चार टक्क्यांपासून सात-आठ टक्के अशी जलसाठ्यात भर पडत होती.

यावर्षी त्या भागात नाशिक जिल्ह्याच्या इतर तालुक्यांच्या मानाने पर्जन्यमान सुरुवातीपासूनच कमी राहिले. वरील धरणे आता भरली आहेत. पावसाचे प्रमाणदेखील सातत्यपूर्ण व जोरदार असे राहिले नाही. परिणामी संपूर्ण पावसाळ्यात वरच्या धरणांतून गिरणा धरणात होणारा पाण्याचा विसर्ग दहा हजारांच्या वर गेला नाही. एरव्ही ऑगस्टमध्ये शंभरी गाठणारे धरण यावर्षी पन्नाशी गाठू शकले नाही. गिरणा धरण जलसाठ्यात सप्टेंबरमध्ये आजवर पंचवीस टक्के वाढ झाली. मागच्या दहा दिवसांत २४ तासांत एक-दीड टक्का झालेली वाढ हेच वैशिष्ट्य यावेळेस ठरले. त्याआधी अर्धा ते एक टक्का वाढच २४ तासांत नोंदली गेली. यावर्षी मन्याड, बोरी आदी धरणांनी गिरणाला केव्हाच मागे टाकत शंभरी गाठली. आता गिरणा धरणाचा जलसाठा ७५ टक्क्यांच्या दिशेने वाटचाल करीत असला तरी सिंचनाच्या दृष्टीने आवर्तन मिळेल की नाही, ही धाकधूक कायम आहे.

मिळाले तर एक पाणी..

यात कमी पाण्यात येणारे हरभरा, दादर आदी सर्वच पिके अर्ध्यातच दम सोडतात. म्हणून गिरणा धरणाच्या वरच्या भागात एक चांगला मुसळधार, कोसळधार पाऊस व्हावा, अशी अपेक्षा केली जात आहे.