शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

लोकप्रतिनिधी विसरले निवडणुकीतील आश्वासन पूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 00:54 IST

चार वर्षांपूर्वी पालिका निवडणुकीच्या वेळेस देण्यात आलेली आश्वासन पूर्ती लोकप्रतिनिधी विसरले की काय, असा प्रश्न प्रत्येक नागरिकाच्या मनात घर करून आहे.

ठळक मुद्देजागतिक विसरभोळे दिन विशेषभुसावळ शहरवासीयांचे विविध प्रश्न सोडविण्याची जनतेला अपेक्षा

वासेफ पटेलभुसावळ, जि.जळगाव : चार वर्षांपूर्वी पालिका निवडणुकीच्या वेळेस देण्यात आलेली आश्वासन पूर्ती लोकप्रतिनिधी विसरले की काय, असा प्रश्न प्रत्येक नागरिकाच्या मनात घर करून आहे. शहरातील रस्ते, पाणी, क्रीडा संकुल, उड्डाणपूल, प्लॅस्टिक पार्क, गटारी, दिवाबत्ती, कचरा निर्मूलन असे विषय साडेचार वर्षे उलटूनही सुटलेले नाहीत. ‘जागतिक अल्झायमर्स डे’ अर्थात ‘जागतिक विसरभोळे दिन’ २१ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो. यानिमित्त निवडणुकीनंतर आश्वासनांच्या पूर्ततेवर नजर टाकली असता विविध बाबी प्रकर्षाने समोर येतात.रेल्वे जंक्शन ओळखशहरात प्रचंड नागरी समस्या आहेत. याचा भुसावळवासीयांना पदोपदी अनुभव येत आहे. यात अमृत योजनेच्या माध्यमातून रस्त्यांची झालेली वाताहत असो, ७ दिवसाआड होणारा अशुद्ध पाणीपुरवठा, तुंबलेल्या गटारी किंवा स्वच्छतेचा प्रश्न सर्व बाबतीत आश्वासन पूर्ती झालेली नसल्याचे दिसून येते.‘अमृत’मुळे रस्त्यांची लागली वाटअमृत योजनेमुळे संपूर्ण शहरातील रस्त्यांची वाट लागली आहे. यामुळे वाहने चालवणे तर दूरच, पायी चालणेही कठीण झाले आहे. याशिवाय भरपावसाळ्यात मुबलक पाणी उपलब्ध असतानासुद्धा जीर्ण, कालबाह्य झालेल्या पाणीपुरवठा यंत्रणेमुळे सातव्या दिवशी भुसावळकरांना पाणी मिळत आहे.रेल्वे हद्दीतील अतिक्रमण उठलेरेल्वे प्रशासनाने सुमारे दीड-दोन वर्षांपूर्वी रेल्वे हद्दीतील एक जणू छोटे बसलेले शहरच उद्ध्वस्त केले. अतिक्रमण काढताना त्यावेळी याठिकाणी रेल्वे कोच फॅक्टरी होणार असून, स्थानिकांचा रोजगाराचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली लागेल, अशी आश्वासने नागरिकांना देण्यात आली होती. रोजगार तर मिळालाच नाही, घरे मात्र उद्ध्वस्त झाली.क्रीडा संकुल वनवासातक्रीडानगरी म्हणून ओळख असलेल्या भुसावळ शहरात अनेक खेळाडू प्रतिभावंत, गुणवंत आहेत. रेल्वे मैदान किंवा खासगी संस्थेच्या मैदानावर सराव करून ते खेळांमध्ये नैपुण्य दाखवत असतात, मात्र हक्काचे क्रीडा संकुल नाहीच. क्रीडा संकुलाचाही विसर पडला की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.गल्लोगल्ली ‘डॉन’शहरात गल्लोगल्ली ‘डॉन’ निर्माण झाले आहेत. गावठी कट्टे, तलवारी बाळगणे व त्याचा वापर करणे हे भुसावळमध्ये जणू फॅशन झाले आहे. भरदिवसा २०-२१ वयोगटातील मुले खून करतात; यावरही अंकुश असणे महत्त्वाचे आहे. शहरात वाढत्या गुन्हेगारीमुळे उद्योग-व्यवसाय भुसावळपासून दूर जात आहेत.अजेंड्याचा विसरउद्यान विकास , शहराच्या दोन्ही भागांना जोडणारा भुयारी मार्ग, शहरात बंदिस्त नाट्यगृह, नगरपालिकेच्या दवाखान्याचे मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये रूपांतर, शाळांना नवीन खोल्या आणि सर्वांगीण शैक्षणिक विकास हा अजेंडा देण्यात आला होता. मात्र यात यश मिळाल्याचे दिसत नाही की विसरभोळेपणा झाला हे समजत नाही.तांत्रिक अडचणीशी काय घेणे?शासकीय योजना, प्रकल्प करीत असताना यात तांत्रिक अडचणी येत असतात. किचकट कागदोपत्री प्रक्रिया करावी लागते हे सर्वश्रुत आहे, यानंतरच विकास कामांचे मार्ग मोकळे होतात. मात्र सामान्य नागरिकांना तांत्रिक अडचणीशी काही घेणेदेणे नसते. त्यांना फक्त हवी असते कृती... तीही विसरभोळेपणा ठरू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणBhusawalभुसावळ