शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
3
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
4
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
5
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
6
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
7
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
9
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
10
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
11
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
12
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
13
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
14
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
15
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
16
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
17
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
18
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
19
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या

लोकप्रतिनिधी विसरले निवडणुकीतील आश्वासन पूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 00:54 IST

चार वर्षांपूर्वी पालिका निवडणुकीच्या वेळेस देण्यात आलेली आश्वासन पूर्ती लोकप्रतिनिधी विसरले की काय, असा प्रश्न प्रत्येक नागरिकाच्या मनात घर करून आहे.

ठळक मुद्देजागतिक विसरभोळे दिन विशेषभुसावळ शहरवासीयांचे विविध प्रश्न सोडविण्याची जनतेला अपेक्षा

वासेफ पटेलभुसावळ, जि.जळगाव : चार वर्षांपूर्वी पालिका निवडणुकीच्या वेळेस देण्यात आलेली आश्वासन पूर्ती लोकप्रतिनिधी विसरले की काय, असा प्रश्न प्रत्येक नागरिकाच्या मनात घर करून आहे. शहरातील रस्ते, पाणी, क्रीडा संकुल, उड्डाणपूल, प्लॅस्टिक पार्क, गटारी, दिवाबत्ती, कचरा निर्मूलन असे विषय साडेचार वर्षे उलटूनही सुटलेले नाहीत. ‘जागतिक अल्झायमर्स डे’ अर्थात ‘जागतिक विसरभोळे दिन’ २१ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो. यानिमित्त निवडणुकीनंतर आश्वासनांच्या पूर्ततेवर नजर टाकली असता विविध बाबी प्रकर्षाने समोर येतात.रेल्वे जंक्शन ओळखशहरात प्रचंड नागरी समस्या आहेत. याचा भुसावळवासीयांना पदोपदी अनुभव येत आहे. यात अमृत योजनेच्या माध्यमातून रस्त्यांची झालेली वाताहत असो, ७ दिवसाआड होणारा अशुद्ध पाणीपुरवठा, तुंबलेल्या गटारी किंवा स्वच्छतेचा प्रश्न सर्व बाबतीत आश्वासन पूर्ती झालेली नसल्याचे दिसून येते.‘अमृत’मुळे रस्त्यांची लागली वाटअमृत योजनेमुळे संपूर्ण शहरातील रस्त्यांची वाट लागली आहे. यामुळे वाहने चालवणे तर दूरच, पायी चालणेही कठीण झाले आहे. याशिवाय भरपावसाळ्यात मुबलक पाणी उपलब्ध असतानासुद्धा जीर्ण, कालबाह्य झालेल्या पाणीपुरवठा यंत्रणेमुळे सातव्या दिवशी भुसावळकरांना पाणी मिळत आहे.रेल्वे हद्दीतील अतिक्रमण उठलेरेल्वे प्रशासनाने सुमारे दीड-दोन वर्षांपूर्वी रेल्वे हद्दीतील एक जणू छोटे बसलेले शहरच उद्ध्वस्त केले. अतिक्रमण काढताना त्यावेळी याठिकाणी रेल्वे कोच फॅक्टरी होणार असून, स्थानिकांचा रोजगाराचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली लागेल, अशी आश्वासने नागरिकांना देण्यात आली होती. रोजगार तर मिळालाच नाही, घरे मात्र उद्ध्वस्त झाली.क्रीडा संकुल वनवासातक्रीडानगरी म्हणून ओळख असलेल्या भुसावळ शहरात अनेक खेळाडू प्रतिभावंत, गुणवंत आहेत. रेल्वे मैदान किंवा खासगी संस्थेच्या मैदानावर सराव करून ते खेळांमध्ये नैपुण्य दाखवत असतात, मात्र हक्काचे क्रीडा संकुल नाहीच. क्रीडा संकुलाचाही विसर पडला की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.गल्लोगल्ली ‘डॉन’शहरात गल्लोगल्ली ‘डॉन’ निर्माण झाले आहेत. गावठी कट्टे, तलवारी बाळगणे व त्याचा वापर करणे हे भुसावळमध्ये जणू फॅशन झाले आहे. भरदिवसा २०-२१ वयोगटातील मुले खून करतात; यावरही अंकुश असणे महत्त्वाचे आहे. शहरात वाढत्या गुन्हेगारीमुळे उद्योग-व्यवसाय भुसावळपासून दूर जात आहेत.अजेंड्याचा विसरउद्यान विकास , शहराच्या दोन्ही भागांना जोडणारा भुयारी मार्ग, शहरात बंदिस्त नाट्यगृह, नगरपालिकेच्या दवाखान्याचे मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये रूपांतर, शाळांना नवीन खोल्या आणि सर्वांगीण शैक्षणिक विकास हा अजेंडा देण्यात आला होता. मात्र यात यश मिळाल्याचे दिसत नाही की विसरभोळेपणा झाला हे समजत नाही.तांत्रिक अडचणीशी काय घेणे?शासकीय योजना, प्रकल्प करीत असताना यात तांत्रिक अडचणी येत असतात. किचकट कागदोपत्री प्रक्रिया करावी लागते हे सर्वश्रुत आहे, यानंतरच विकास कामांचे मार्ग मोकळे होतात. मात्र सामान्य नागरिकांना तांत्रिक अडचणीशी काही घेणेदेणे नसते. त्यांना फक्त हवी असते कृती... तीही विसरभोळेपणा ठरू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणBhusawalभुसावळ