शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

व्यापाऱ्यांवर होणा-या अन्यायाकडे लोकप्रतिनिधींचा कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 12:17 IST

कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापाऱ्यांचा आरोप

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीची पाडलेली भिंत पुन्हा बांधून दिली जात नसल्याने व्यापाºयांनी पुकारलेल्या बंदमुळे मोठे नुकसान होत असले तरी व दबाबतंत्रामुळे होत असलेल्या अन्यायाकडे लोकप्रतिनिधी कानाडोळा करीत आहे, असा आरोप व्यापाºयांनी केला आहे. या बंदमुळे दररोज करोडो रुपयांची उलाढाल ठप्प होऊन शेतकºयांचेही नुकसान होत असल्याने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.परवानगी नसताना व्यापारी संकुलासाठी कृषी उत्त्पन्न बाजार समितीची तीनशे मीटर भिंत पाडण्यात आल्यानंतर व्यापाºयांनी बंद पुकारला. त्यानंतर भिंत बांधून देण्याचे आश्वासन मिळाल्याने व्यापाºयांनी बंद मागे घेतला. मात्र आश्वासनानुसार काम सुरू होत नसल्याने जळगाव मार्केट यार्ड आडत असोसिएशनने पुन्हा १७ जूनपासून बेमुदत बंद पुकारला आहे़ आश्वासनाची पूर्तता होत नसल्याने व्यापाºयांनी लोकप्रतिनीधींना निवेदन देऊन हा प्रश्न मार्गी लागवण्याची मागणी केली. मात्र बंदला १० दिवस झाले तरी त्याकडे कानाडोळाच होत असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे.दबावामुळे मोजक्या मंडळींसाठी शेकडो जण वेठीसया प्रकरणात काही मोजक्या मंडळींसाठी शेकडो व्यापाºयांना वेठीस धरले जात असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे. भिंत बांधून देण्याची मागणी असली तरी राजकीय दबावतंत्राचा वापर करून विकासकाला झुकते माप दिले जात असल्याचेही व्यापाºयांचे म्हणणे आहे. त्यामुळे व्यापाºयांसह शेतकरीही वेठीस धरले जात असल्याचा सूर आहे.निवडणुकांवर डोळापुढे विधानसभा निवडणुका असल्याने व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ग्रामीण भागातील अधिकाधिक संचालक असल्याने त्यांच्या विरोधात लोकप्रतिनिधी जात नसल्याचा आरोप केला जात आहे. या संचालकांच्या विरोधात भूमिका घेतल्यास निवडणुकीवेळी परिणाम होऊ शकतो, अशी भीती असल्याने निवडणुकांवर डोळा ठेवून काहीही हालचाली होत नसल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे.सहकार राज्यमंत्री संचालकांचे नेतेसहकार खात्याशी निगडीत हा विषय असला तरी व सहकार राज्यमंत्रीही जिल्ह्यातीलच असले तरी तेच संचालक मंडळाचे नेते असल्याने संचालकांना ते नाराज करू शकत नसल्याचा सूर व्यापाºयांमध्ये आहे.सर्व नियमानुसार होईलया विषयी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील व आमदार सुरेश भोळे यांना त्यांच्या भूमिकेविषयी विचारले असता सर्व नियमानुसार होईल, असे दोघांचेही म्हणणे आहे. यात हा विषय पणन संचालकांकडे पोहचल्याने जो निर्णय येईल, त्यानुसार काम होईल, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. तर परवानगी देण्याबाबत अधिकार मनपा आयुक्तांना असल्याने त्यात आपण हस्तक्षेप करीत नाही. भिंत बांधण्याविषयी निर्णय नियमानुसारच होईल, असेही आमदार भोळे म्हणाले.दहाव्या दिवशीही बंद कायमबाजार समितीतील व्यापाºयांनी पुकारलेला बंद दहाव्या दिवशीही कायम होता. त्यामुळे येथील सर्व व्यवहार ठप्पच होते.हा विषय पणन महासंघाच्या संचालकांकडे पोहचला असून त्यांच्याकडून जो निर्णय येईल, त्यानुसार काम होईल. व्यापाºयांनी आपल्या मागण्यांसाठी शेतकºयांना वेठीस धरणे योग्य नाही.- गुलाबराव पाटील, सहकार राज्यमंत्रीबाजार समितीमधील कामांना परवानगी देण्याचे अधिकार मनपा आयुक्तांना असून त्यात आपण हस्तक्षेप करीत नाही. भिंत बांधण्याबाबत काय करायचे हे कृषी उत्पन्न बाजार समितीने ठरवावे. नियमाला सोडून कोणतेच काम होणार नाही.- सुरेश भोळे, आमदार.

टॅग्स :Jalgaonजळगाव