शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

जलसंपदा मंत्र्याच्या जिल्ह्यात लोकांना पाणी नाही - खासदार अशोक चव्हाण यांची टिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 18:51 IST

रावेरची जागा सोडल्याबद्दल शरद पवार यांचे आभार

मुक्ताईनगर : डॉ. उल्हास पाटील हे नवसाचे उमेदवार असून रावेरची जागा ही राष्ट्रवादीची असताना  काँग्रेसला ही जागा सोडल्याबद्दल राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे जाहीर आभार मानत रावेर लोकसभा व जळगाव लोकसभा मतदारसंघातून आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी कुºहा येथे आयोजित प्रचार सभेत केले. तसेच जलसंपदा मंत्र्यांच्या जिल्ह्यातच लोकांना प्यायाला पाणी नाही, अशी टिकाही त्यांनी केली.याप्रसंगी ते म्हणाले की, पाच वर्षात शेतकरी हवालदिल झाला आहे. मराठवाड्यातच दोनशे शेतकऱ्यांनी चार महिन्यात आत्महत्या केल्या. तर पाच वर्षांत राज्यात पंधरा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. विकासात अग्रेसर महाराष्ट्र राज्य आता आत्महत्येत अग्रेसर झाल्याचा दुर्दैवी प्रसंग महाराष्ट्राच्या जनतेवर आला आहे. सत्तेचा फायदा भाजपने पैसा कमावण्यासाठी घेतला व त्याच पैशांच्या बळावर परत सत्ता मिळवण्याचे कारस्थान केंद्र शासन करत आहे. सर्वसामान्यांना न्याय मिळण्यासाठी काँग्रेस योग्य असून राज्य सरकारने कर्जमाफी घोषित करुन दोन वर्ष झाली मात्र अद्यापही कुणाला कर्जमाफी मिळाली नाही. केवळ अभ्यास करणारे हे सरकार सर्वच क्षेत्रात नापास झाले आहे. गेल्या पाच वर्षात दोन कोटी युवकांचे रोजगार जाऊन त्यांना भजे तळण्याचे भाजप अध्यक्ष सांगतात. हाताला काम नाही, शेतीला दाम नाही असं यापूर्वी कधी घडले नाही म्हणून या सरकारला खाली खेचण्याचे आवाहन चव्हाण यांनी केले. जनतेच्या मनातच भाजपसत्तेबद्दल राग असून त्याचे दर्शन मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान यात मतदारांनी घडवले आहे. बºयाच दिवसांनी रावेर लोकसभा मतदार संघात पंजा दिसला असून नवसाच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले. राज्यशासन राज्यातील दुष्काळाबाबत गंभीर नाही. साधा,मध्यम व गंभीर असे तीन प्रकारचे दुष्काळ राज्यशासन सांगत आहे. यापूर्वी अशा प्रकारची विभागणी कधीही झाली नाही. महाराष्ट्रल अधोगतीला नेणाºया या सरकारला लाज वाटत नाही काय ?अशा शब्दात त्यांनी घणाघाती आरोप केला. मुंबई हल्ल्यात शहीद झालेले महाराष्टÑ एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्या बद्दल वाईट शब्द बोलणाºया साध्वीला भोपाळ मधून उमेदवारी देणाºया या पक्षाची मानसिकता काय हे लक्षात येते. साध्वी प्रज्ञा सिंग यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी देखील त्यांनी केली. सैनिक व सैनिकी कारवाईचा काँग्रेसने कधीही मतांसाठी उपयोग केला नाही मात्र पुलवामा, सर्जिकल स्ट्राईक यासारख्या मुद्द्यांवरून भाजप सरकार हे लाचार झाल्यासारखे वागत आहे. त्याचा निवडणुकीसाठी फायदा करून घेत आहे.देशात यापुढे भाजपाचे चुकून सरकार जर आले तर देशात हुकुमशाही येईल आणि कधीही मतदान होणार नाही. म्हणून विचारांची लढाई असून राहुल गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे कर्जमाफी तर शेतकºयांची होणारच आहे पण कर्ज चुकवल्याबद्दल कोणत्याही शेतकºयाला पोलीस केस सामोरे जाऊ देणार नाही असा कायदा काँग्रेस सरकार निवडून आल्यानंतर करणार आहे. शेतकºयांच्या गळ्यात लाभार्थी म्हणून पाट्या घालणाºया व आरोपी प्रमाणे त्यांचे फोटो काढणाºया या शासनाला हाकलून लावा असे आवाहन त्यांनी केले. सभेदरम्यान चौकीदार चोर है च्या घोषणा दिल्या जात होत्या.

टॅग्स :Politicsराजकारण