शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

प्रलंबित अहवाल साडेपाच हजारांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचण्यांच्या प्रलंबित अहवालांची संख्या ५८६९ झाली आहे. यामुळे प्रशासनासह नागरिकांच्या चिंतेतही वाढ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचण्यांच्या प्रलंबित अहवालांची संख्या ५८६९ झाली आहे. यामुळे प्रशासनासह नागरिकांच्या चिंतेतही वाढ झाली आहे. नियमीत होणाऱ्या चाचण्या व लॅबची क्षमता यात ताळमेळ नसल्याने ही संख्या वाढल्याचे चित्र आहे.

कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्यानंतर चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली. त्यात सरसरी रोज तीन ते साडेतीन हजारांवर चाचण्या होत आहेत. दुसरीकडे लॅबची क्षमता ही ९०० चाचण्या प्रतिदिवस इतकी आहे. यात लॅब पूर्ण २४ तास सुरू ठेवल्यानंतर १२०० ते १५०० अहवालांपर्यंत ही क्षमता असते. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयातील लॅबमध्येही दिवसाला ३०० अहवालांची तपासणी होत असल्याची माहिती आहे. मात्र, तपासण्यांची संख्या वाढल्याने प्रलंबित अहवालांची संख्या आता थेट साडे पाच हजारांवर पोहोचली आहे.

आधीच सांगितले जातात चार दिवस

तपासणी केल्यानंतर अहवाल यायला चार दिवस लागतील असे केंद्रांवर आधिच सूचित केले जात आहे. त्यामुळे लक्षणे असलेल्या रुग्णांपुढे मात्र, हा पेच निर्माण झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांबाबत प्रशासनाकडून अहवाल लवकर येण्यासाठी उपाययोजना व्हाव्यात अशी मागणी यामुळे मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

गेल्यावेळी संसर्गाला काय कारणीभूत

कोरोना लॅब होण्याआधी धुळे येथे कोरोना तपासणी नमुने पाठविले जात होते. तेव्हा आठवडा ते पंधरा दिवस अहवालांना लागत होते. यामुळे संसर्गाचे प्रमाण वाढल्याचा तर्क लावला जाता होता. आता गंभीर प्रकार म्हणजे, आरटीपीसीआर टेस्ट केल्यानंतर क्वारंटाईन केले जात नाही. केवळ एक मॅसेज पाठवून संबधिताला घरी पाठविण्यात येते. मात्र, घरी क्वारंटाईन राहण्याच्या त्यांना सक्त सूचना दिल्या असतात. मात्र, या सूचनांचे पालन होईलच अशी शाश्वती मात्र, प्रशासन घेत नाही. त्यामुळेही ही बाब संसर्ग वाढविण्यात धोकादायक ठरू शकते. त्यामुळे हे अहवाल लवकर मिळावे, यासाठी नियोजनाची गरज असल्याचे बोलले जात आहे.