शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

२५ मेपर्यंत शेतकऱ्यांना विम्याचा मोबदला द्या, अन्यथा व्याज आकारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:16 IST

जळगाव : दोन वर्षांपूर्वी विम्याचा हप्ता भरूनही अद्यापपर्यंत जिल्ह्यातील ११० शेतकरी विम्यापासून वंचित असून त्यांना २५ मेपर्यंत विम्याचा मोबदला ...

जळगाव : दोन वर्षांपूर्वी विम्याचा हप्ता भरूनही अद्यापपर्यंत जिल्ह्यातील ११० शेतकरी विम्यापासून वंचित असून त्यांना २५ मेपर्यंत विम्याचा मोबदला देण्यात यावा अन्यथा १२ टक्के व्याज लावून नुकसान भरपाईची आकारणी केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी बँकांना दिला आहे.

२०१९ मध्ये काढलेल्या केळी व कापूस पीक विम्याच्या नुकसान भरपाईचे पैसे ज्या शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत अशा शेतकऱ्यांनी तक्रार केली होती.

त्यानुसार कृषी विभागाने बँकांना नोटीस बजावली व शेतकऱ्यांना पीक विम्याचा मोबदला देण्यात यावा, असे निर्देश दिले होते. याचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी हा इशारा दिला.

बैठकीला जिल्हाधिकारी राऊत यांच्यासह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांच्यासह बँक अधिकारी उपस्थित होते.

एक कोटी ६० लाख रुपये देणे

२०१९ मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विमा काढून त्याचा हप्ता भरला. मात्र ३१ जुलै २०२०नंतरही त्यांना झालेल्या नुकसानीचा विमा मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या तक्रारी सुरू झाल्या व मोबदला मिळत नसल्याने शेतकरी चिंतीत झाले आणि त्यांनी पाठपुरावा सुरू केला. जिल्ह्यातील ११० शेतकरी पिक विमाच्या लाभापासून वंचित असून त्यांना एक कोटी ६० लाख रुपयांचा मोबदला मिळणे अपेक्षित आहे. हा मोबदला देण्याविषयी बँकांना नोटीस बजावल्यानंतर केवळ महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या यावल शाखेच्यावतीने चार शेतकऱ्यांना पाच लाख ८२ हजार रुपये मोबदला देण्यात आला. इतर बँकांनी मात्र अजूनही शेतकऱ्यांना मोबदला दिला नसल्याचे बैठकीत समोर आले.

सेवा केंद्रांनाही नोटीसशेतकऱ्यांची चुकीची माहिती भरल्याने शेतकरी लाभापासून वंचित राहत आहे. याला शेतकरी जबाबदार नसून माहिती भरणारे सेवा केंद्र जबाबदार असल्याने जिल्ह्यातील ५ सेवा केंद्रांना नोटीस बजावण्यात आल्या आहे.