शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
2
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
3
“१०० टक्के माझ्या वॉर्डातून लढणार, ठाकरे बंधू १३० पेक्षा जास्त जागा जिंकणार”: किशोरी पेडणेकर
4
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
5
बापरे! करोडपती सरकारी अधिकारी, ६२ कोटींची मालमत्ता, आलिशान फ्लॅट्स अन् रोख रक्कम; तेलंगणा उपपरिवहन आयुक्तांच्या साम्राज्याचे गुपिते उघड
6
"तेव्हा बडव्यांनी घेरलं होतं, मग आता हातमिळवणी कशी?" शेलारांचा राज ठाकरेंना रोखठोक सवाल!
7
Travel : कुठे आहे सांता क्लॉजचे खरेखुरे गाव, जिथे रोजच साजरा होतो ख्रिसमस? तुम्हीही जाऊ शकता फिरायला!
8
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
9
ठाकरे बंधूंची युती घोषित; पाहा, राज-उद्धव यांच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील १० ठळक मुद्दे
10
Tata Nexon EV खरेदी करायची आहे? किती करावं लागेल डाऊनपेमेंट, पाहा EMI चं संपूर्ण गणित
11
'धुरंधर'नंतर 'दृश्यम ३'मध्ये दिसणार होता अक्षय खन्ना, पण अचानक सोडला सिनेमा? कारण...
12
“मुंबईचे लचके तोडले जातायत, गुजरातच्या दावणीला मुंबईला बांधले जातेय”: विजय वडेट्टीवार
13
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
14
BMC Election: "ते रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे..." ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर बावनकुळेंचा प्रहार!
15
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
16
Video: जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; CRPF कॅम्पमध्ये घुसून जवानावर हल्ला
17
ढासू परतावा...! : या SME स्टॉकनं ३ महिन्यांत दिला 225% हून अधिक परतावा, लोकांना केलं मालामाल; केडियालांकडे तब्बल 393100 शेअर
18
बंडखोरीच्या भीतीनं पक्षांची गुपित रणनीती, जागावाटपाचा तिढा सुटेना; भाजपात इच्छुकांची गर्दी
19
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
20
४ दिवसांपासून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय 'हा' शेअर; सरकारच्या घोषणेचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

रूग्णांना राजवाडा नकोय, जीवदान देणारी सेवा हवीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:39 IST

भंडारा येथील शासकीय रूग्णालयात इन्क्युबेटरमध्ये ठेवलेल्या १० बालकांचा शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे संपूर्ण ...

भंडारा येथील शासकीय रूग्णालयात इन्क्युबेटरमध्ये ठेवलेल्या १० बालकांचा शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देश हळहळला. या घटनेनंतर राज्यशासन व त्यापाठोपाठ प्रशासनही खडबडून जागे झाले. सर्वच रूग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र हे आदेश निघण्यापूर्वी अनेक जिल्हा रूग्णालयांचे फायर ऑडिटच झालेले नसल्याचेही या निमित्ताने उघड झाले. जळगाव जिल्हा रूग्णालयाचेही फायर ऑडिट झालेले असल्याचा दावा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांकडून केला जात असला तरी त्यात निघालेल्या त्रुटींची पूर्तता अद्यापही झालेली नसल्याचे समजते. तसेच नवजात शिशू काळजी कक्ष, बालरोग विभाग आणि या कक्षांच्या खाली आग विझविणारे असे तेरा सिलिंडर लावण्यात आले आहेत. प्रत्येकाची मुदत ही तीन वर्षांची असते, मात्र, यातील सहा सिलिंडरची मुदत संपलेली असल्याचे आढळून आले. यातील दोन सिलिंडर हे २००९ सालातील असून, त्यांना अक्षरश: जाळे लागलेले आहे. नवीन सहा सिलिंडर बसविण्यात आले आहेत. इतकी अनास्था जिल्हा रूग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाची आहे. यात तातडीने सुधारणा करण्याची गरज आहे. मात्र सध्या जिल्हा रूग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला (जीएमसी) राजवाड्याचे रूप देण्यातच प्रशासन धन्यता मानताना दिसत आहे. जीएमसी आवारात स्वच्छतेची व वातावरण प्रसन्न राहील याची काळजी घेण्याची निश्चित गरज आहेच मात्र त्याआधी रूग्ण सेवेतील त्रुटी दूर करून रूग्णांना जीवनदान देण्याच्या दृष्टीने प्राधान्याने प्रयत्न होण्याची गरज आहे. जळगाव जिल्हा रूग्णालयातील बालमृत्यूचे प्रकरण यापूर्वी गाजले असून सध्या ते न्यायप्रविष्ठ आहे.२०१२-१३ या वर्षात ३०१ बालमृत्यू झाल्याची आकडेवारी माहिती अधिकारात उघड झाली होती. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी मृत्यूदर १५.०१ टक्के का आहे? याबाबत रूग्णालय प्रशासनाला विचारणाही केली होती. त्यावर बालरोग तज्ज्ञांची नेमणूक करण्यात येईल, असे सांगत ४ बालरोगतज्ज्ञ नियुक्त करण्यात आले. मात्र २०१३-१४ मध्ये पुन्हा माहिती घेतली असता बालमृत्यूची संख्या ४४० वर पोहोचून मृत्यूदर १९.९६ टक्के झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे खळबळ उडाली होती. याबाबत गुप्ता यांनी केलेल्या तक्रारीवरून आरोग्य संचालकांची समितीही नेमण्यात आली होती. या समितीने हे नियुक्त केलेले बालरोग तज्ज्ञ ड्यूटीवर येत नसल्याचे ताशेरे ओढले होते. याबाबत अखेर कोर्टाच्या माध्यमातून गुप्ता यांनी गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले होते. त्याचे कामकाज अद्याप सुरू आहे. ही पार्श्वभूमी असतानाही रूग्णालय प्रशासनाने त्यापासून धडा घेतलेला दिसत नाही. तसे असते तर नवजात शिशू कक्षातील ६ आग विझविणारे सिलिंडर (फायर एस्टींग्युशर) कालबाह्य असलेले आढळले नसते. त्यामुळे आता भंडाऱ्याच्या घटनेनंतरही रूग्णालय प्रशासन फार काही दखल घेईल, असे चिन्ह दिसत नाही. मात्र जिल्हा प्रशासनाने यात लक्ष घालून याबाबतच्या पूर्तता होतात की नाही? याची खात्री करून घेण्याची वेळ आली आहे.