शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
3
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
4
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
7
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
8
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
9
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
10
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
11
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
12
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
13
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
14
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
15
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
16
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
17
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
18
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
19
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
20
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...

रूग्णांना राजवाडा नकोय, जीवदान देणारी सेवा हवीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:39 IST

भंडारा येथील शासकीय रूग्णालयात इन्क्युबेटरमध्ये ठेवलेल्या १० बालकांचा शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे संपूर्ण ...

भंडारा येथील शासकीय रूग्णालयात इन्क्युबेटरमध्ये ठेवलेल्या १० बालकांचा शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देश हळहळला. या घटनेनंतर राज्यशासन व त्यापाठोपाठ प्रशासनही खडबडून जागे झाले. सर्वच रूग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र हे आदेश निघण्यापूर्वी अनेक जिल्हा रूग्णालयांचे फायर ऑडिटच झालेले नसल्याचेही या निमित्ताने उघड झाले. जळगाव जिल्हा रूग्णालयाचेही फायर ऑडिट झालेले असल्याचा दावा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांकडून केला जात असला तरी त्यात निघालेल्या त्रुटींची पूर्तता अद्यापही झालेली नसल्याचे समजते. तसेच नवजात शिशू काळजी कक्ष, बालरोग विभाग आणि या कक्षांच्या खाली आग विझविणारे असे तेरा सिलिंडर लावण्यात आले आहेत. प्रत्येकाची मुदत ही तीन वर्षांची असते, मात्र, यातील सहा सिलिंडरची मुदत संपलेली असल्याचे आढळून आले. यातील दोन सिलिंडर हे २००९ सालातील असून, त्यांना अक्षरश: जाळे लागलेले आहे. नवीन सहा सिलिंडर बसविण्यात आले आहेत. इतकी अनास्था जिल्हा रूग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाची आहे. यात तातडीने सुधारणा करण्याची गरज आहे. मात्र सध्या जिल्हा रूग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला (जीएमसी) राजवाड्याचे रूप देण्यातच प्रशासन धन्यता मानताना दिसत आहे. जीएमसी आवारात स्वच्छतेची व वातावरण प्रसन्न राहील याची काळजी घेण्याची निश्चित गरज आहेच मात्र त्याआधी रूग्ण सेवेतील त्रुटी दूर करून रूग्णांना जीवनदान देण्याच्या दृष्टीने प्राधान्याने प्रयत्न होण्याची गरज आहे. जळगाव जिल्हा रूग्णालयातील बालमृत्यूचे प्रकरण यापूर्वी गाजले असून सध्या ते न्यायप्रविष्ठ आहे.२०१२-१३ या वर्षात ३०१ बालमृत्यू झाल्याची आकडेवारी माहिती अधिकारात उघड झाली होती. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी मृत्यूदर १५.०१ टक्के का आहे? याबाबत रूग्णालय प्रशासनाला विचारणाही केली होती. त्यावर बालरोग तज्ज्ञांची नेमणूक करण्यात येईल, असे सांगत ४ बालरोगतज्ज्ञ नियुक्त करण्यात आले. मात्र २०१३-१४ मध्ये पुन्हा माहिती घेतली असता बालमृत्यूची संख्या ४४० वर पोहोचून मृत्यूदर १९.९६ टक्के झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे खळबळ उडाली होती. याबाबत गुप्ता यांनी केलेल्या तक्रारीवरून आरोग्य संचालकांची समितीही नेमण्यात आली होती. या समितीने हे नियुक्त केलेले बालरोग तज्ज्ञ ड्यूटीवर येत नसल्याचे ताशेरे ओढले होते. याबाबत अखेर कोर्टाच्या माध्यमातून गुप्ता यांनी गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले होते. त्याचे कामकाज अद्याप सुरू आहे. ही पार्श्वभूमी असतानाही रूग्णालय प्रशासनाने त्यापासून धडा घेतलेला दिसत नाही. तसे असते तर नवजात शिशू कक्षातील ६ आग विझविणारे सिलिंडर (फायर एस्टींग्युशर) कालबाह्य असलेले आढळले नसते. त्यामुळे आता भंडाऱ्याच्या घटनेनंतरही रूग्णालय प्रशासन फार काही दखल घेईल, असे चिन्ह दिसत नाही. मात्र जिल्हा प्रशासनाने यात लक्ष घालून याबाबतच्या पूर्तता होतात की नाही? याची खात्री करून घेण्याची वेळ आली आहे.