शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

कोरोना झाल्यानंतर रुग्णांना येतेय रक्त गोठण्याची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरूणांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असून यामागे विविध कारणे सांगितली जात आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरूणांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असून यामागे विविध कारणे सांगितली जात आहेत. यात एक मुख्य कारण म्हणजे कोरोनानंतर शरीरात रक्तगोठण्याची समस्या निर्माण होऊन त्याने मृत्यू होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. कोरोनातील उपचारांच्या काही औषधींचाही हा परिणाम असू शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे, त्यामुळे व्यसनांपासून लांब राहणे व पौष्टीक आहार घेणे महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

कोरोना उपचारात वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिविर या इंजेक्शनमुळे रक्ताच्या गाठी होण्याची शक्यता असते. हे प्रमाण कमी रुग्णांमध्ये असले तरी यामुळे धोका संभवतो. एकत्रितच कोरोनामुळे शरीरात विविध रासायनिक घटकांची निर्मिती होऊन त्यामुळे रक्ताच्या गाठी होतात व त्यामुळे अचानक मृत्यू ओढावू शकतो, हे देखील तरूणांमधील वाढत्या मृत्यूचे एक कारण असल्याचे औषध वैद्यक शास्त्र विभागाचे डॉ. भाऊराव नाखले यांनी सांगितले आहे.

काय काळजी घ्यावी

कोरोना बाधित झाल्यानंतर अनेक वेळा उपचारांमध्ये रक्तपातळ होण्याची औषधी दिली जाते. शिवाय तरूणांनी मद्यपान, धुम्रपान या गोष्टी टाळाव्यात निरोगी आयुष्य कस जगता येईल, यावर भर ठेवावा, सी व्हिटॅमिनचे समतोल प्रमााणात सेवन करावे, आहार पाैष्टीक असावा, पुरेशी काळजी घ्यावी, असा सल्ला डॉ. नाखले यांनी दिला आहे.

पोस्ट कोविड नंतरच्या समस्या

कोरोना झाल्यानंतर बरेच दिवस रुग्णांना थकवा, अशक्तपणा, श्वास घेण्यास त्रास होणे या बाबी कायम राहतात, काहींच्या फुफ्फुसांवर परिणाम झालेला असतो, अशा स्थितीत आराम करणे, पुरेसा व्यायाम करणे, श्वासांचे व्यायाम करणे, याेग्य आहार घेणे, याबाबी कराव्यात असेही डॉक्टरांनी म्हटले आहे.