शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

वेळेवर इंजेक्शन न दिल्याने गणपती हाॅस्पिटलमध्ये रुग्णाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील गणपती हाॅस्पिटलमध्ये एका ३९ वर्षीय तरुणासाठी इंजेक्शन आणूनही ते वेळेवर दिले नाही तसेच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील गणपती हाॅस्पिटलमध्ये एका ३९ वर्षीय तरुणासाठी इंजेक्शन आणूनही ते वेळेवर दिले नाही तसेच डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप करीत डॉक्टरांवर तातडीने कारवाई करा, या मागणीसाठी नातेवाईकांनी शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन केले. डॉक्टरांवर कारवाई झाल्याशिवाय आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता.

मिळालेल्या माहितीनुसार दौलत नगरातील रहिवासी पंकज कृष्णा बाविस्कर यांना १ मे रोजी गणपती हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांचा शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. यानंतर डॉक्टरांनी दुर्लक्ष केले, हलगर्जीपणा केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. त्यांनी रुग्णालयासमोर रास्ता रोको आंदोलन सुरु केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मयताच्या नातेवाईकांचे म्हणणे ऐकून घेत त्यांची समजूत काढली. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, प्रमुख डॉक्टरांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली होती.

बहिणीचा आक्रोश अन् विनवण्या

पंकज बाविस्कर यांच्या भगिनी काजल बाविस्कर यांनी यावेळी आक्रोश केला. काहीही करा, माझ्या भावाला शॉक द्या, शेवटचे प्रयत्न करा; मात्र त्याला वाचवा अशा विनवण्या त्या यावेळी करीत हाेत्या. आम्ही ५ वाजता इंजेक्शन आणले; मात्र ते दिले गेले नव्हते, इंजेक्शन दिले असते तर भाऊ बचावला असता असा आक्रोश यावेळी त्यांनी केला. आरएमओच्या चुकीमुळे भाऊ गेल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

महापौरांची रुग्णालयात भेट

घटनेची माहिती मिळाल्यानंतर महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी रुग्णालयात धाव घेत नातेवाईकांची समजूत काढली. या सर्व प्रकाराची चौकशी करण्याचे आश्वासन महापौरांनी नातेवाईकांना दिले. यावेळी डॉ. ललित पाटील यांनी उपमहापौरांना माहिती दिली. पंकज बाविस्कर हे २६ रोजी बाधित आल्यानंतर त्यांना सुरुवातीला इकराला दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पाच दिवसांनी त्यांना १ मे रोजी गणपती हाॅस्पिटलला दाखल केले. त्यांची ऑक्सिजन पातळी ८८ टक्के असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक अमर जैन यांची उपस्थिती होती, त्यांनीही नातेवाईकांची समजूत काढली.

डॉक्टरांचे खच्चीकरण : लीना पाटील

डॉक्टरांनी पूर्ण प्रयत्न केले, डॉक्टर खूप तणावात काम करीत आहेत. मृत्यू हे विषाणूमुळे होत आहेत, डॉक्टरांमुळे नाही, तुमचा डॉक्टरांवर विश्वास राहिलेला नाहीय, यामुळे डॉक्टरांचे अशा परिस्थितीत खच्चीकरण होतेय, असे डॉ.लीना पाटील यावेळी म्हणाल्या. डॉक्टर देव नसतात, डॉक्टरांनी खूप प्रयत्न केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कोट

रुग्ण आधी इकरा सेंटरला दाखल होते. तेथे पाच ते सहा दिवस राहिल्यानंतर गंभीरावस्थेत दाखल करण्यात आले. आम्ही नातेवाईकांना पूर्ण कल्पना दिली होती. रुग्णाच्या उपचारात कुठलाच निष्काळजीपणा झालेला नाही. टास्कफोर्सचे डॉक्टर स्वत: या ठिकाणी काम करत आहेत. रुग्ण दोन दिवसांपासून व्हेंटिलेटवर होता. उपचारात हलगर्जीपणा झालेला नाही, सर्वत्रच गंभीर परिस्थिती आहे.

- डॉ. शीतल ओसवाल, गणपती हाॅस्पिटल.