शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
4
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
5
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
6
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
8
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
9
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
10
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
11
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
12
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
13
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
14
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
15
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
16
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
17
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
18
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
19
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
20
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

पहिल्या दिवशी संयम, दुसऱ्या दिवशी काहीसी वर्दळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:15 IST

जळगाव : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या जनता कर्फ्यूच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवसाच्या तुलनेत काहीसी वर्दळ वाढल्याचे शनिवारी ...

जळगाव : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या जनता कर्फ्यूच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवसाच्या तुलनेत काहीसी वर्दळ वाढल्याचे शनिवारी दिसून आले. यात काही ठिकाणी पोलिसांनी दुचाकीस्वारांना दंडुक्याचा प्रसाद दिला तर रिक्षा चालकांनाही समज देऊन विनाकारण फिरल्यास वाहन जप्त करण्यात येईल, असा इशारा दिला.

जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी चांगला संयम दाखविलेला असताना दुसऱ्या दिवशी मात्र काही नागरिकांमुळे शहराच्या विविध रस्त्यांवर दुचाकी व इतर वाहने आल्याने तुरळक वर्दळ दिसून आली. यामुळे जनता कर्फ्यूच्या उद्देशाला खीळ तर बसणार नाही ना, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. दुसऱ्या दिवशी नागरिकांनी दूध, औषधी खरेदीचे कारण सांगत दुचाकीवर बाहेर पडल्याचे चित्र शहरात दिसून आले.

दुसऱ्या दिवशी बाजारपेठ बंद, रस्त्यावर मात्र वाहने

शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने १२ ते १४ मार्च दरम्यान शहरात जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. या काळात दूध व औषधी व्यतिरिक्त इतर जीवनाश्यक वस्तूंचे व्यवहारही बंद ठेवण्याचे आदेश आहेत. तीन दिवसांच्या या जनता कर्फ्यूमध्ये पहिल्या दिवशी बाजारपेठ कडकडीत बंद राहण्यासह रस्त्यांवरही केवळ बँक, शासकीय कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, दूध विक्री केंद्र चालक, औषधी दुकानधारक यांचीच वाहने येत-जात होती. मात्र, दुसऱ्या दिवशी नागरिक दुचाकीचा वापर करून बाहेर रस्त्यांवर फिरत असल्याचे चित्र होते. यामध्ये काही कर्मचारी असले तरी इतर काही जण दुचाकी घेऊन दूध केंद्र व औषधी दुकानांवर जात असल्याचे सांगत होते. अनेक जण तर रस्त्याच्या बाजूला दुचाकी लावून गप्पा मारत असल्याचेही चित्र होते.

पोलिसांकडून दंडुका

जनता कर्फ्यूच्या दुसऱ्या दिवशी रस्त्यावर वर्दळ वाढू लागल्याने टॉवर चौकात पोलिसांनी दुचाकीस्वार, रिक्षाचालक यांना थांबवून त्यांना विचारणा केली. यात अनेकांनी कुटुंबातील सदस्याचे, नातेवाइकांचे औषधे घ्यायला जात आहे, कोणी दूध घ्यायला आलो होतो, असे कारणे सांगत होते. मात्र, या दरम्यान अनेक जण विनाकारण फिरत असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी दुचाकीस्वारांना दंडुक्याचे फटके देत घरी पाठविले. या सोबतच रिक्षा चालकांनाही समज देत विनाकारण फिरू नका, अन्यथा वाहने जप्त करू, असा इशारा दिला.

बाहेरच्या स्थितीविषयी उत्सुकता

जनता कर्फ्यूच्या दुसऱ्या दिवशीही दुकाने बंद होती, मात्र पहिल्या दिवसाच्या तुलनेत बाहेर फिरणारे वाढल्याचे चित्र शनिवारी सकाळपासून होते. या जनता कर्फ्यूमध्ये किराणा दुकान, भाजीपाला विक्रीला बंदी असल्याने मुख्य बाजारपेठेसह वेगवेगळ्या भागांमध्ये दुकाने बंद असल्याने वर्दळ कमी होती. मात्र बाहेर काय सुरू आहे, हे पाहण्यासाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढल्याचे चित्र होते.