शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

पहिल्या दिवशी संयम, दुसऱ्या दिवशी काहीसी वर्दळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:15 IST

जळगाव : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या जनता कर्फ्यूच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवसाच्या तुलनेत काहीसी वर्दळ वाढल्याचे शनिवारी ...

जळगाव : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या जनता कर्फ्यूच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवसाच्या तुलनेत काहीसी वर्दळ वाढल्याचे शनिवारी दिसून आले. यात काही ठिकाणी पोलिसांनी दुचाकीस्वारांना दंडुक्याचा प्रसाद दिला तर रिक्षा चालकांनाही समज देऊन विनाकारण फिरल्यास वाहन जप्त करण्यात येईल, असा इशारा दिला.

जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी चांगला संयम दाखविलेला असताना दुसऱ्या दिवशी मात्र काही नागरिकांमुळे शहराच्या विविध रस्त्यांवर दुचाकी व इतर वाहने आल्याने तुरळक वर्दळ दिसून आली. यामुळे जनता कर्फ्यूच्या उद्देशाला खीळ तर बसणार नाही ना, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. दुसऱ्या दिवशी नागरिकांनी दूध, औषधी खरेदीचे कारण सांगत दुचाकीवर बाहेर पडल्याचे चित्र शहरात दिसून आले.

दुसऱ्या दिवशी बाजारपेठ बंद, रस्त्यावर मात्र वाहने

शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने १२ ते १४ मार्च दरम्यान शहरात जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. या काळात दूध व औषधी व्यतिरिक्त इतर जीवनाश्यक वस्तूंचे व्यवहारही बंद ठेवण्याचे आदेश आहेत. तीन दिवसांच्या या जनता कर्फ्यूमध्ये पहिल्या दिवशी बाजारपेठ कडकडीत बंद राहण्यासह रस्त्यांवरही केवळ बँक, शासकीय कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, दूध विक्री केंद्र चालक, औषधी दुकानधारक यांचीच वाहने येत-जात होती. मात्र, दुसऱ्या दिवशी नागरिक दुचाकीचा वापर करून बाहेर रस्त्यांवर फिरत असल्याचे चित्र होते. यामध्ये काही कर्मचारी असले तरी इतर काही जण दुचाकी घेऊन दूध केंद्र व औषधी दुकानांवर जात असल्याचे सांगत होते. अनेक जण तर रस्त्याच्या बाजूला दुचाकी लावून गप्पा मारत असल्याचेही चित्र होते.

पोलिसांकडून दंडुका

जनता कर्फ्यूच्या दुसऱ्या दिवशी रस्त्यावर वर्दळ वाढू लागल्याने टॉवर चौकात पोलिसांनी दुचाकीस्वार, रिक्षाचालक यांना थांबवून त्यांना विचारणा केली. यात अनेकांनी कुटुंबातील सदस्याचे, नातेवाइकांचे औषधे घ्यायला जात आहे, कोणी दूध घ्यायला आलो होतो, असे कारणे सांगत होते. मात्र, या दरम्यान अनेक जण विनाकारण फिरत असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी दुचाकीस्वारांना दंडुक्याचे फटके देत घरी पाठविले. या सोबतच रिक्षा चालकांनाही समज देत विनाकारण फिरू नका, अन्यथा वाहने जप्त करू, असा इशारा दिला.

बाहेरच्या स्थितीविषयी उत्सुकता

जनता कर्फ्यूच्या दुसऱ्या दिवशीही दुकाने बंद होती, मात्र पहिल्या दिवसाच्या तुलनेत बाहेर फिरणारे वाढल्याचे चित्र शनिवारी सकाळपासून होते. या जनता कर्फ्यूमध्ये किराणा दुकान, भाजीपाला विक्रीला बंदी असल्याने मुख्य बाजारपेठेसह वेगवेगळ्या भागांमध्ये दुकाने बंद असल्याने वर्दळ कमी होती. मात्र बाहेर काय सुरू आहे, हे पाहण्यासाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढल्याचे चित्र होते.