शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

फौजदार परीक्षा उत्तीर्ण कर्मचा:यांची उपेक्षाच!

By admin | Updated: May 17, 2017 11:51 IST

परिणामी अनेक कर्मचारी दर महिन्याला सेवानिवृत्त होत आहेत.

सुनील पाटील / ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 17 - खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना तत्काळ नियुक्ती देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश असतानाही महासंचालक कार्यालयाकडून या कर्मचा:यांची उपेक्षा केली जात आहे. दरम्यान, नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले अनेक कर्मचारी निवृत्त झाले असून काही कर्मचा:यांचे तर निधन झाले आहे.खात्यामार्फत परीक्षा घेऊन कर्मचा:यांना फौजदार बनण्याची संधी शासनाने उपलब्ध करून दिली, 28 हजार 114 जणांनीही परीक्षा दिली. त्यात 19 हजार 384 कर्मचारी ही परीक्षा उत्तीर्ण झाले होते, त्यापैकी 1 हजार 907 जणांना पदोन्नती देण्यात आली. उर्वरित राज्यातील 17 हजार 477 पोलीस कर्मचारी तीन  वर्षापासून फौजदारपदाच्या प्रतीक्षेत आहेत. नियुक्ती मिळत नसल्याने काही कर्मचा:यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता.काय आहेत 2013 चे आदेश?पोलीस दलातील शिपाई, नाईक, हवालदार किंवा सहायक उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असलेल्या ज्या कर्मचा:यास पोलीस दलात रुजू झाल्यापासून 10 वर्षापेक्षा कमी नाही इतकी सलग सेवा झालेली आहे व जे कर्मचारी शासनाने  वेळोवेळी विहीत केलेल्या परीक्षा नियमानुसार पोलीस महासंचालकांनी घेतलेल्या विभागीय परीक्षेत अर्हता प्राप्त करतात अशा कर्मचा:यांमधून  ज्येष्ठता, निपात्रतेच्या अधिन राहून पदोन्नती देण्याचे शासनाचे आदेश आहेत. पोलीस उपनिरीक्षक (सेवाप्रवेश) नियम 1956 मधील नियम 3 मधील उपनियम (अ) मध्ये सुधारित आदेश जारी झाला आहे.साडे पाच हजार पदे रिक्तराज्यात गेल्या वर्षी साडे पाच हजार पोलीस उपनिरीक्षकांची पदे रिक्त होती.सेवानिवृत्ती व अन्य कारणामुळे दरवर्षी रिक्त पदाचा आकडा हा वाढतच जातो. लोकसंख्येच्या तुलनेत ही आकडेवारी आणखी वाढू शकते. पोलीस नियमावली भाग 1 कलम 90 नुसार पोलीस उपनिरीक्षक पदावर दरवर्षी मे/जून महिन्यात कर्मचा:यांची यादी तयार करुन पदोन्नती देण्याची स्पष्ट तरतूद आहे. सेवानिवृत्ती व पदोन्नती यामुळे दरवर्षी पदे रिक्त होतात.काय आहेत न्यायालयाचे  आदेश?खात्यांतर्गत परीक्षा होऊन चार वर्ष झाली. 1907 कर्मचा:यांना पदोन्नती दिली व उर्वरितांना लालफितीचा फटका बसल्याने राज्यातील 17 हजार 477 कर्मचा:यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात दोन वर्षापूर्वी याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका निकाली काढतांना न्या.ए.एस.गडकरी व न्या.अनुप व्ही.मोहता यांच्या खंडपीठाने 2013 च्या परीक्षेचे नियम कायम ठेवून उत्तीर्ण कर्मचा:यांना टप्प्याटप्प्याने नियुक्ती देण्याचे आदेश 27 डिसेंबर 2016 रोजी पोलीस महासंचालकांना दिले.विधानसभेत मुख्यमंत्र्यांनीही दिले होते आदेशउच्च न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ घेत आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत फौजदार नियुक्तीबाबत आवाज उठविला होता.तेव्हा गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस  यांनी या कर्मचा:यांना लवकच पदोन्नती देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आयुक्तालय व अधीक्षकांकडून कर्मचा:यांची सेवानिवृत्तीची तारीख, गोपनीय अहवाल व इतर अशी माहिती मागविण्यात आली. ही माहिती मागवितांना फक्त उत्तीर्ण कर्मचा:यांचीच यादी मागविणे अपेक्षित असताना ज्या कर्मचा:यांना आधी पदोन्नती देण्यात आली आहे. जे कर्मचारी परिक्षेला गैरहजर होते व अनुत्तीर्ण होते यांची माहिती मागविण्यात आली. त्यामुळे या प्रक्रियेला पुन्हा विलंब होत आहे. परिणामी अनेक कर्मचारी दर महिन्याला सेवानिवृत्त होत आहेत.उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन  करण्यात येईल. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कर्मचा:यांना टप्प्याटप्प्याने पदोन्नती देण्याची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. सर्व कर्मचा:यांना न्याय देण्यात येईल.-सतीश माथूर, पोलीस महासंचालक