शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

पारोळा तालुका टंचाई आढावा बैठकीत आमदारांनी धरले अधिकाऱ्यांना धारेवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 19:30 IST

पारोळा येथे शनिवारी दुपारी आयोजीत तालुकास्तरीय पाणीटंचाई आढावा बैठकीत टँकर सुरु करण्यासह विहिर अधिग्रहण आदी प्रस्ताव महिन्याभरापासून पडून असल्याचे निदर्शनास आल्याने आमदार डॉ. सतीश पाटील यांनी अधिकारी वर्गाला धारेवर धरले.

ठळक मुद्देपाणी टंचाई आढावा बैठकीत सरपंचांनी वाचला समस्यांचा पाढातक्रारीनंतर आमदारांनी केल्या कारवाईच्या सूचनागिरणेचे पाणी बोरीत टाकण्याला उशीर झाला तर रस्ता रोको व जेल भरोचा इशारा

आॅनलाईन लोकमतपारोळा : तालुक्यात ५५ गावांना पाणी टंचाईच्या तीव्र झळा बसत असून त्यावर मात करण्यासाठी अनेक गावातून टँकरची मागणी होत आहे. तसेच विहीर अधिग्रहण, विहिरीला आडवे- उभे बोर करण्याबाबतचे प्रस्ताव सादर केले आहेत, तथापि काही प्रस्ताव पंचायत समितीस्तरावर व काही प्रस्ताव ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे एक एक महिन्यापासून पडून असल्याचे समजताच आमदार डॉ. सतीश पाटील यांनी शनिवारी येथे आयोजीत तालुकास्तरीय पाणीटंचाई आढावा बैठकीत सर्वच अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले.तसेच अशा निष्क्रिय अधिकारी वर्गाला तालुक्यातून हलविल्याशिवाय तालुका पाणी टंचाईतून बाहेर निघणार नाही असेही त्यांनी बोलून दाखविले. दुपारी १ वाजता तहसील कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पाणी टंचाई आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी एरंडोलचे प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार पंकज पाटील , जि.प. सदस्य रोहन पाटील, हिंमत पाटील, उपसभापती अशोक पाटील, पं. स. सदस्य ज्ञानेश्वर पाटील, राजेंद्र पाटील, गटविकास अधिकारी आर.के. गिरासे, मुख्याधिकारी डॉ सचिन माने, माजी सभापती प्रकाश जाधव, मनोराज पाटील, बाळू पाटील, किशोर पाटील, पांडुरंग पाटील, नगरसेवक मनीष पाटील आदी उपस्थित होते.सरपंचांनी मांडल्या समस्याया वेळी आमदार पाटील यांनी गावनिहाय पाणीटंचाईची समस्या त्या गावांचे सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याकडून जाणून घेतल्या.बैठकीत सूचविले विविध उपाययावेळी तामसवाडीला तात्काळ पाणी पुरवठा योजना देण्यात यावी यासह ज्या गावात ३ दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे तेथे ४ किंवा ५ दिवसाआड पुरवठा करावा. पं. स. कार्यालयात टंचाई निवारण कक्षाची स्थापना करावी अशा सूचना गटविकास अधिकारी गिरासे यांना केल्या. बोरी धरणात मृतसाठा शिल्लक आहे, शहरासह अनेक गावांची पाणी पुरवठा योजना येथून आहेत. उन्हाळ्याचे अजून पुढील तीन महिने काढायचे आहेत. अधिकारी वर्गाने वस्तुनिष्ठ अहवाल जिल्हाधिकाºयांकडे सादर करावा म्हणजे गिरणेतून बोरी धरणात पाणी सोडले जाईल आणि पाणी टंचाईचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. जर गिरणेचे पाणी बोरीत टाकण्याच्या निर्णयास उशीर झाला तर तालुका होरपळून निघेल. लोकांना स्थलांतरित व्हावे लागेल. म्हणून सोमवारी दुपारी १२ वाजेपर्यंत गिरणेचे पाणी बोरीत टाकण्याचा निर्णय झाला नाही तर रास्ता रोकोसह जेलभरो आंदोलन केले जाईल असा इशारा आमदार डॉ. सतीश पाटील यांनी या बैठकीतून शासनाला दिला. या वेळी विविध विभागाचे अधिकारी, अभियंता, ग्रामसेवक व सरपंच उपस्थित होते.तक्रारीनंतर कारवाईच्या सूचनाया वेळी अनेक गावातील ग्रामस्थांनी ग्रामसेवक गावात येत नाही, यामुळे अडचणी निर्माण होतात अशा तक्रारी केल्या तेव्हा टिटवी येथील ग्रामसेवक सावकारे यांची बदली करण्याबाबत ठराव सभेत मांडला गेला. तसेच ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे अभियंता सुधाकर पाटील व सहायक अभियंता धिरज पाटील यांनी कामात हलगर्जीपणा केला म्हणून त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविण्याबाबत सूचना आ. डॉ. सतीश पाटील यांनी प्रांताधिकारी शर्मा यांना केल्यात. 

टॅग्स :Parolaपारोळाwater scarcityपाणी टंचाई