शहरं
Join us  
Trending Stories
1
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
2
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
3
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
4
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
5
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
6
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
7
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
9
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
10
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
11
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
12
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
13
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
14
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
15
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
16
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
17
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
18
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
19
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
Daily Top 2Weekly Top 5

पर्जन्यराजाने डोळे वटारले, बळीराजा हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:19 IST

गावोगावी पाणी मागण्यासाठी पर्जन्यराजाला साकडे लोकमत न्यूज नेटवर्क पाचोरा : गेल्या १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने ...

गावोगावी पाणी मागण्यासाठी पर्जन्यराजाला साकडे

लोकमत न्यूज नेटवर्क

पाचोरा : गेल्या १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. पर्जन्यराजाने डोळे वटारल्याने बळीराजाच्या तोंडचे पाणी पाळले आहे. गावोगावी पाणी मागण्यासाठी वरुणराजला साकडे घातले जात असून 'धोंडी धोंडी पाणी दे, साय माय पिकू दे' म्हणत महिला आबालवृद्ध धोंडी काढत आहेत.

कोरोनाच्या संकटातून सावरत नाही तोच खरीप हंगामासाठी शेतकरीवर्ग कामाला लागला. मात्र ह्या वर्षी हंगाम चांगला येईल, अशी अपेक्षा असतानाच गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी हैराण झाला आहे. ऐन बहरलेल्या हंगामाला पाण्याची गरज असताना पाऊस गायब झाल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.

पाचोरा तालुक्यात आजपर्यंत २७६ मि.मी. पाऊस पडला आहे. गेल्या वर्षी ह्याच दिवसात ४०० मि.मी.पेक्षा जास्त पाऊस झाला होता. नद्या-नाल्याना खळखळून पाणी वाहत होते. धरणात जलाशयात ५० टक्केपेक्षा जास्त पाणीसाठा झाला होता. सर्वत्र माळरान बहरलेली होती. श्रावणसरी बरसत होत्या. मात्र ह्यावर्षी हंगाम तेजीत येईल, अशी परिस्थिती असताना अचानक पाऊस गायब झाला. खरिपाची पिके कोमेजू लागली आहेत. पिकांची वाढ खुंटली असून उडीद, मूग, चवळी, सोयाबीन, मका पिकाला फटका बसला असून, आशा धुळीस मिळाल्या आहेत. यामुळे शेतकरी शेतमजूर व त्यावर आधारित व्यावसायिक चिंतेत सापडले आहे.

पाऊस ह्या आठवड्यात यायला हवा अन्यथा हंगाम वाया जाऊन दुष्काळ पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी गावोगावी धोंडी काढणे, जिवंत माणसाची प्रेतयात्रा काढणे, महादेवाचा गाभारा पाण्याने भरणे आदी कल्पना करून शेतकरी आशावादी रहात आहेत. पाऊस लवकर बरसावा, श्रावण आल्याचा आनंद वाटावा, अशी पाचोरा तालुकावासीयांची अपेक्षा आहे.