शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

पर्यावरण संवर्धनासाठी आता सृष्टीबंध राखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 17:47 IST

बांबूपासून निर्मिती : आदिवासी बांधवांच्या हातांना मिळाला रोजगार

ठळक मुद्देकोरकू, गोंड आदिवासी बांधवांचा सहभागबांबू, नैसर्गिक रंग, मणी इत्यादी साधनांचा उपयोग प्रदर्शनाला जळगावातील पर्यावरण शाळेत प्रारंभ सृष्टीबंध या नावाने बांबूच्या राख्या तयार

ऑनलाईन लोकमत जळगाव, दि.29 - भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतिक असणा:या रक्षाबंधन या पवित्र सणासाठी आता ‘सृष्टीबंध’ या पर्यावरणपूरक राखीची निर्मिती करण्यात आली आहे. बांबूपासून तयार केलेल्या या राख्यांमुळे अनेक आदिवासी बांधवांच्या हातांना काम मिळाले आहे.

जळगाव येथील समर्पण संस्था संचलित पर्यावरण शाळा अनेक वषार्पासून पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात कार्य करीत आहे. पर्यावरणाविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्याचे कार्य पर्यावरण शाळा करीत आहे. यावर्षी ‘रक्षाबंधन’ या पर्वासाठी बांबूने तयार केलेल्या आकर्षक पर्यावरणपूरक राख्या पर्यावरण शाळेकडून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

कोरकू, गोंड आदिवासी बांधवांचा सहभाग

मेळघाटातील लवादा येथील संपूर्ण बांबू केंद्रातर्फे कोरकू, गोंड आदिवासी यांच्यासह पारंपरिक कारागीर असलेल्या बुरूड समाजाच्या लोकांचाही या राखी प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे. बांबू, नैसर्गिक रंग, मणी इत्यादी साधनांचा उपयोग करून या इको-फ्रेण्डली राख्या तयार केल्या आहेत.

सृष्टीबंध नावाने राखी

सृष्टीबंध या नावाने बांबूच्या राख्या तयार केला आहे. जळगाव शहरात या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मेळघाटातील आदिवासींनी बांबूपासून तयार केलेल्या राख्या संपूर्ण इको-फ्रेण्डली पद्धतीने तयार केलेल्या आहे. सुबक स्वरुपातील या राख्यांमुळे आदिवासी बांधवाना रोजगार मिळाला आहे. या प्रकल्पांतील उत्पादनांच्या प्रदर्शनाला जळगावातील पर्यावरण शाळेत प्रारंभ केला आहे.