शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
7
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
8
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
9
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
10
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
11
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
12
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
13
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
15
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
16
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
17
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
18
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
20
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP

पपईचे भाव गडगडले, किलोला फक्त तीन रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 01:52 IST

केळी आणि कापसानंतर ज्या हुकमी पिकाकडे बघितले जाते त्या पपईचे भाव गडगडल्यामुळे उत्पादक शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे.

ठळक मुद्दे कजगाव परिसरात दुष्काळात तेरावा महिन्याची उत्पादकांना अनुभूतीपपई खरेदीदार व्यापाºयांनी भाव पाडल्याची चर्चा

कजगाव ता.भडगाव : केळी आणि कापसानंतर ज्या हुकमी पिकाकडे बघितले जाते त्या पपईचे भाव गडगडल्यामुळे उत्पादक शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे.सुरुवातीला १४ ते १६ रुपये किलो असलेले पपईचे भाव चक्क ३ रुपयांवर येऊन ठेपल्याने यात शेतकऱ्यांचा झालेला खर्चही निघत नसल्यामुळे दुष्काळात तेरावा महिना अशीच काहीशी स्थिती झाली आहे. काही वर्षांपूर्वी कजगावसह परिसरात केळी व कापसाची दरवर्षी मोठ्या प्रमाणात लागवड केली जात होती. मात्र गेल्या तीन चार वर्षांपासून दिवसेंदिवस कमी होत असलेल्या पावसामुळे शेतकºयांनी इतर पिकाकडे आपला मोर्चा वळविला आहे. यात प्रामुख्याने भाजीपाला तसेच पपई व इतर फळपिकांंच्या लागवडीकडे त्यांचा मोठा कल दिसून आला आहे. तथापि महागडे बी- बियाणे टाकून पिकवलेल्या शेती मालाचे भाव नेहमीच गडगडलेले रहात असल्याने शेतकरी पार मेटाकुटीस आला आहे. या वर्षी संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ आहे. त्यामुळे पपईसारख्या जेमतेम पाण्यावर वाचविलेले फळपीक देखील मातीमोल किमतीत विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. यात झालेल्या खर्चापेक्षा भाव कमी मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सुरुवातीला १४ ते १६ रुपये किलो विकली जाणारी पपई गेल्या आठवड्यापासून चक्क ३ रुपये किलो अशा पडेल भावात व्यापारी मागत आहेत. ते देखील आठ ते दहा दिवस उधार या पध्दतीने व्यवहार होत असून पपई उत्पादकांची पंचाईत झाली आहे.दुष्काळात तेरावा महिनाशासनाने संपूर्ण जिल्हा दुष्काळी जाहीर केला असला तरी शेतकºयांच्या नशिबी आलेले असाह्यपण कायम आहे. कजगाव भागातील नदी पूर्ण पावसाळ्यात कोरडीच होती. शेत शिवार ओस पडले होते. बागायतदार शेतकºयांच्या विहिरींनीही तळ गाठला होता. अशात जेमतेम पाण्यावर रात्रंदिवस एक करीत काहींच्या हातात पीक पडले, मात्र सारेच भाव गडगडल्याने शेतकºयांचे आर्थिक गणित देखील कोलमडले आहे. निसर्गाच्या मारानंतर शेती मालाचे भाव कोसळल्याने दुष्काळात तेरावा महिना अशीच स्थिती शेतकºयांची झाली आहे एकीकडे पाण्याअभावी पिके उपटून फेकली जात आहेत तर दुसरीकडे भाव नसल्याने शेतकºयांना मनस्ताप होत आहे. सुरुवातीला सहा हजार रुपये क्विंटलप्रमाणे कापूस विकला गेला मात्र या नंतर भाव सारखे गडगडत राहिले. ते आता पाच हजार चारशे ते पाच हजार सहाशे पर्यंत आहेत. भाव वाढीची वाट पाहणाºया शेतकºयांच्या पदरी निराशा पडत आहे. 

टॅग्स :fruitsफळे