शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

पपईचे भाव गडगडले, किलोला फक्त तीन रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 01:52 IST

केळी आणि कापसानंतर ज्या हुकमी पिकाकडे बघितले जाते त्या पपईचे भाव गडगडल्यामुळे उत्पादक शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे.

ठळक मुद्दे कजगाव परिसरात दुष्काळात तेरावा महिन्याची उत्पादकांना अनुभूतीपपई खरेदीदार व्यापाºयांनी भाव पाडल्याची चर्चा

कजगाव ता.भडगाव : केळी आणि कापसानंतर ज्या हुकमी पिकाकडे बघितले जाते त्या पपईचे भाव गडगडल्यामुळे उत्पादक शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे.सुरुवातीला १४ ते १६ रुपये किलो असलेले पपईचे भाव चक्क ३ रुपयांवर येऊन ठेपल्याने यात शेतकऱ्यांचा झालेला खर्चही निघत नसल्यामुळे दुष्काळात तेरावा महिना अशीच काहीशी स्थिती झाली आहे. काही वर्षांपूर्वी कजगावसह परिसरात केळी व कापसाची दरवर्षी मोठ्या प्रमाणात लागवड केली जात होती. मात्र गेल्या तीन चार वर्षांपासून दिवसेंदिवस कमी होत असलेल्या पावसामुळे शेतकºयांनी इतर पिकाकडे आपला मोर्चा वळविला आहे. यात प्रामुख्याने भाजीपाला तसेच पपई व इतर फळपिकांंच्या लागवडीकडे त्यांचा मोठा कल दिसून आला आहे. तथापि महागडे बी- बियाणे टाकून पिकवलेल्या शेती मालाचे भाव नेहमीच गडगडलेले रहात असल्याने शेतकरी पार मेटाकुटीस आला आहे. या वर्षी संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ आहे. त्यामुळे पपईसारख्या जेमतेम पाण्यावर वाचविलेले फळपीक देखील मातीमोल किमतीत विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. यात झालेल्या खर्चापेक्षा भाव कमी मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सुरुवातीला १४ ते १६ रुपये किलो विकली जाणारी पपई गेल्या आठवड्यापासून चक्क ३ रुपये किलो अशा पडेल भावात व्यापारी मागत आहेत. ते देखील आठ ते दहा दिवस उधार या पध्दतीने व्यवहार होत असून पपई उत्पादकांची पंचाईत झाली आहे.दुष्काळात तेरावा महिनाशासनाने संपूर्ण जिल्हा दुष्काळी जाहीर केला असला तरी शेतकºयांच्या नशिबी आलेले असाह्यपण कायम आहे. कजगाव भागातील नदी पूर्ण पावसाळ्यात कोरडीच होती. शेत शिवार ओस पडले होते. बागायतदार शेतकºयांच्या विहिरींनीही तळ गाठला होता. अशात जेमतेम पाण्यावर रात्रंदिवस एक करीत काहींच्या हातात पीक पडले, मात्र सारेच भाव गडगडल्याने शेतकºयांचे आर्थिक गणित देखील कोलमडले आहे. निसर्गाच्या मारानंतर शेती मालाचे भाव कोसळल्याने दुष्काळात तेरावा महिना अशीच स्थिती शेतकºयांची झाली आहे एकीकडे पाण्याअभावी पिके उपटून फेकली जात आहेत तर दुसरीकडे भाव नसल्याने शेतकºयांना मनस्ताप होत आहे. सुरुवातीला सहा हजार रुपये क्विंटलप्रमाणे कापूस विकला गेला मात्र या नंतर भाव सारखे गडगडत राहिले. ते आता पाच हजार चारशे ते पाच हजार सहाशे पर्यंत आहेत. भाव वाढीची वाट पाहणाºया शेतकºयांच्या पदरी निराशा पडत आहे. 

टॅग्स :fruitsफळे