शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

पपईचे भाव गडगडले, किलोला फक्त तीन रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 01:52 IST

केळी आणि कापसानंतर ज्या हुकमी पिकाकडे बघितले जाते त्या पपईचे भाव गडगडल्यामुळे उत्पादक शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे.

ठळक मुद्दे कजगाव परिसरात दुष्काळात तेरावा महिन्याची उत्पादकांना अनुभूतीपपई खरेदीदार व्यापाºयांनी भाव पाडल्याची चर्चा

कजगाव ता.भडगाव : केळी आणि कापसानंतर ज्या हुकमी पिकाकडे बघितले जाते त्या पपईचे भाव गडगडल्यामुळे उत्पादक शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे.सुरुवातीला १४ ते १६ रुपये किलो असलेले पपईचे भाव चक्क ३ रुपयांवर येऊन ठेपल्याने यात शेतकऱ्यांचा झालेला खर्चही निघत नसल्यामुळे दुष्काळात तेरावा महिना अशीच काहीशी स्थिती झाली आहे. काही वर्षांपूर्वी कजगावसह परिसरात केळी व कापसाची दरवर्षी मोठ्या प्रमाणात लागवड केली जात होती. मात्र गेल्या तीन चार वर्षांपासून दिवसेंदिवस कमी होत असलेल्या पावसामुळे शेतकºयांनी इतर पिकाकडे आपला मोर्चा वळविला आहे. यात प्रामुख्याने भाजीपाला तसेच पपई व इतर फळपिकांंच्या लागवडीकडे त्यांचा मोठा कल दिसून आला आहे. तथापि महागडे बी- बियाणे टाकून पिकवलेल्या शेती मालाचे भाव नेहमीच गडगडलेले रहात असल्याने शेतकरी पार मेटाकुटीस आला आहे. या वर्षी संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ आहे. त्यामुळे पपईसारख्या जेमतेम पाण्यावर वाचविलेले फळपीक देखील मातीमोल किमतीत विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. यात झालेल्या खर्चापेक्षा भाव कमी मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सुरुवातीला १४ ते १६ रुपये किलो विकली जाणारी पपई गेल्या आठवड्यापासून चक्क ३ रुपये किलो अशा पडेल भावात व्यापारी मागत आहेत. ते देखील आठ ते दहा दिवस उधार या पध्दतीने व्यवहार होत असून पपई उत्पादकांची पंचाईत झाली आहे.दुष्काळात तेरावा महिनाशासनाने संपूर्ण जिल्हा दुष्काळी जाहीर केला असला तरी शेतकºयांच्या नशिबी आलेले असाह्यपण कायम आहे. कजगाव भागातील नदी पूर्ण पावसाळ्यात कोरडीच होती. शेत शिवार ओस पडले होते. बागायतदार शेतकºयांच्या विहिरींनीही तळ गाठला होता. अशात जेमतेम पाण्यावर रात्रंदिवस एक करीत काहींच्या हातात पीक पडले, मात्र सारेच भाव गडगडल्याने शेतकºयांचे आर्थिक गणित देखील कोलमडले आहे. निसर्गाच्या मारानंतर शेती मालाचे भाव कोसळल्याने दुष्काळात तेरावा महिना अशीच स्थिती शेतकºयांची झाली आहे एकीकडे पाण्याअभावी पिके उपटून फेकली जात आहेत तर दुसरीकडे भाव नसल्याने शेतकºयांना मनस्ताप होत आहे. सुरुवातीला सहा हजार रुपये क्विंटलप्रमाणे कापूस विकला गेला मात्र या नंतर भाव सारखे गडगडत राहिले. ते आता पाच हजार चारशे ते पाच हजार सहाशे पर्यंत आहेत. भाव वाढीची वाट पाहणाºया शेतकºयांच्या पदरी निराशा पडत आहे. 

टॅग्स :fruitsफळे