शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
3
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

पंढरीचे वारकरी, ते अधिकारी मोक्षाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 21:26 IST

मुक्तकैवल्य तेजोनिधी संतसम्राट ज्ञानोबाराय यांच्या पालखीचे नुकतेच प्रस्थान झालेले आहे. आजमितीला सर्वजण महासंकटाला सामोरे जात आहेत. संकटे ही प्रत्येकाच्या ...

मुक्तकैवल्य तेजोनिधी संतसम्राट ज्ञानोबाराय यांच्या पालखीचे नुकतेच प्रस्थान झालेले आहे. आजमितीला सर्वजण महासंकटाला सामोरे जात आहेत. संकटे ही प्रत्येकाच्या जीवनात पदोपदी येत असतात आणि या संकटांना तोंड देण्याची शक्ती पांडुरंग परमात्मा आपल्याला क्षणाक्षणाला प्रदान करत असतात. संसाररूपी प्रपंच चालवत असताना पांडुरंगाच्या भक्तीत जीवन घालवत असताना वारकऱ्यांच्या जीवनातील सुवर्णकाळ म्हणून पंढरीच्या वारीला ओळखले जाते.वर्षभर काबाडकष्ट करणाºया माझा शेतकरीराजा व वारकऱ्यांसाठी हा सोहळा स्वर्गसुखाच्या अनुभूतीच्या कितीतरी पटीने मोठा असतो. कारण याच वारीत आम्हाला विठूरायांच्या भेटीच्या आसेबरोबर जीवनात यशस्वी वाटचाल कशी करायची याची प्रत्यक्ष अनुभूती मिळते. वारीत सहभागी होणारे प्रत्येकजण आपली संपत्ती, पद, पैसा या सर्व क्षणिक सुख देणाºया गोष्टी विसरून सहभागी झालेले असतात. वारीत प्रत्येकजण फक्त पंढरीचा वारकरी म्हणूनच सहभागी झालेला असतो. जीवनातील सर्वोच्च आनंदाची अनुभूती जर प्राप्त करायची असेल तर जीवनात एकदा तरी पंढरीची वारी करायला हवी. कारण आपण विश्वातील सर्व तीर्थ करून बसलो तरी जो आनंद पंढरीच्या वारीत प्राप्त होत तो अन्य ठिकाणी आपल्याला मिळू शकत नाही. तुकोबाराय वर्णन करतात,तीर्थे केली कोटीवरी ।नाहीदेखील पंढरी ।।आपण कोटीने तीर्थे केली असतील पण जर आपण पंढरीच्या पांडुरंगाला जर वारीतून भेटायला गेला नसाल तर तुमच्या अनेकविध केलेल्या तीर्थांना काहीही फायदा नाही त्यामुळे जीवनात आल्यानंतर प्रत्येकाने एकदातरी वारी करायला पाहिजे. वारी या शब्दातच ‘वार’ हा शब्द येतो आणि निश्चितच पंढरीच्या वारीमुळे पांडुरंग परमात्मा आपल्याला आपल्या अंगी असणाºया षड्विकारांवर वार करण्याची सद्बुद्धी देतात, सर्वजणांनी वारीचे अनन्यसाधारण असे महत्व जाणून वारी करून जीवन सार्थकी लावायला पाहिजे.तुकोबाराय म्हणतात जर जीवनात दु:खाची विरक्ती व सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल म्हणजेच मोक्षप्राप्ती करून घ्यायची असेल तर पंढरीच्या वारीत सहभागी होऊन सुवणर् पर्वकाळाचे साक्षीदार व्हायला पाहिजे, पण यावर्षी अपवादात्मक परिस्थितीमुळे कोणतेही वारकरी वारीत सहभागी होऊ शकत नाही. अशा वेळेसयावर्षी घरीच करूया वारी। तेव्हाच पळून जाईल कोरोना महामारी।।आपणा सर्वांना यावर्षी आपापल्या घरीच राहून विठूरायाला प्रार्थना करायची आहे की, आम्हाला या संकटातून मुक्त करा! निश्चितच विठूराय आपल्या सर्वांच्या हाकेला साद घालून या संकटातून आपल्याला तारेल व आपण पुढच्या वर्षीच्या पंढरीच्या वारीत सहभागी होऊन नक्कीच आनंद घेऊ...!- गजानन महाराज वरसाडेकर, पिंप्राळा.

टॅग्स :Jalgaonजळगाव