शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

पंढरीचे वारकरी, ते अधिकारी मोक्षाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 21:26 IST

मुक्तकैवल्य तेजोनिधी संतसम्राट ज्ञानोबाराय यांच्या पालखीचे नुकतेच प्रस्थान झालेले आहे. आजमितीला सर्वजण महासंकटाला सामोरे जात आहेत. संकटे ही प्रत्येकाच्या ...

मुक्तकैवल्य तेजोनिधी संतसम्राट ज्ञानोबाराय यांच्या पालखीचे नुकतेच प्रस्थान झालेले आहे. आजमितीला सर्वजण महासंकटाला सामोरे जात आहेत. संकटे ही प्रत्येकाच्या जीवनात पदोपदी येत असतात आणि या संकटांना तोंड देण्याची शक्ती पांडुरंग परमात्मा आपल्याला क्षणाक्षणाला प्रदान करत असतात. संसाररूपी प्रपंच चालवत असताना पांडुरंगाच्या भक्तीत जीवन घालवत असताना वारकऱ्यांच्या जीवनातील सुवर्णकाळ म्हणून पंढरीच्या वारीला ओळखले जाते.वर्षभर काबाडकष्ट करणाºया माझा शेतकरीराजा व वारकऱ्यांसाठी हा सोहळा स्वर्गसुखाच्या अनुभूतीच्या कितीतरी पटीने मोठा असतो. कारण याच वारीत आम्हाला विठूरायांच्या भेटीच्या आसेबरोबर जीवनात यशस्वी वाटचाल कशी करायची याची प्रत्यक्ष अनुभूती मिळते. वारीत सहभागी होणारे प्रत्येकजण आपली संपत्ती, पद, पैसा या सर्व क्षणिक सुख देणाºया गोष्टी विसरून सहभागी झालेले असतात. वारीत प्रत्येकजण फक्त पंढरीचा वारकरी म्हणूनच सहभागी झालेला असतो. जीवनातील सर्वोच्च आनंदाची अनुभूती जर प्राप्त करायची असेल तर जीवनात एकदा तरी पंढरीची वारी करायला हवी. कारण आपण विश्वातील सर्व तीर्थ करून बसलो तरी जो आनंद पंढरीच्या वारीत प्राप्त होत तो अन्य ठिकाणी आपल्याला मिळू शकत नाही. तुकोबाराय वर्णन करतात,तीर्थे केली कोटीवरी ।नाहीदेखील पंढरी ।।आपण कोटीने तीर्थे केली असतील पण जर आपण पंढरीच्या पांडुरंगाला जर वारीतून भेटायला गेला नसाल तर तुमच्या अनेकविध केलेल्या तीर्थांना काहीही फायदा नाही त्यामुळे जीवनात आल्यानंतर प्रत्येकाने एकदातरी वारी करायला पाहिजे. वारी या शब्दातच ‘वार’ हा शब्द येतो आणि निश्चितच पंढरीच्या वारीमुळे पांडुरंग परमात्मा आपल्याला आपल्या अंगी असणाºया षड्विकारांवर वार करण्याची सद्बुद्धी देतात, सर्वजणांनी वारीचे अनन्यसाधारण असे महत्व जाणून वारी करून जीवन सार्थकी लावायला पाहिजे.तुकोबाराय म्हणतात जर जीवनात दु:खाची विरक्ती व सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल म्हणजेच मोक्षप्राप्ती करून घ्यायची असेल तर पंढरीच्या वारीत सहभागी होऊन सुवणर् पर्वकाळाचे साक्षीदार व्हायला पाहिजे, पण यावर्षी अपवादात्मक परिस्थितीमुळे कोणतेही वारकरी वारीत सहभागी होऊ शकत नाही. अशा वेळेसयावर्षी घरीच करूया वारी। तेव्हाच पळून जाईल कोरोना महामारी।।आपणा सर्वांना यावर्षी आपापल्या घरीच राहून विठूरायाला प्रार्थना करायची आहे की, आम्हाला या संकटातून मुक्त करा! निश्चितच विठूराय आपल्या सर्वांच्या हाकेला साद घालून या संकटातून आपल्याला तारेल व आपण पुढच्या वर्षीच्या पंढरीच्या वारीत सहभागी होऊन नक्कीच आनंद घेऊ...!- गजानन महाराज वरसाडेकर, पिंप्राळा.

टॅग्स :Jalgaonजळगाव