शहरं
Join us  
Trending Stories
1
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
2
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
3
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
4
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
5
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
6
Travel : मन मोहून टाकतील असे भारतातील 'हिडन' हिल स्टेशन्स; ९०% लोकांना या जागांबद्दल माहितीच नाही!
7
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
8
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
9
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
10
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
11
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
12
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
13
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
14
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
15
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
16
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
17
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
18
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
19
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
20
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार

पंढरीचे वारकरी, ते अधिकारी मोक्षाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 21:26 IST

मुक्तकैवल्य तेजोनिधी संतसम्राट ज्ञानोबाराय यांच्या पालखीचे नुकतेच प्रस्थान झालेले आहे. आजमितीला सर्वजण महासंकटाला सामोरे जात आहेत. संकटे ही प्रत्येकाच्या ...

मुक्तकैवल्य तेजोनिधी संतसम्राट ज्ञानोबाराय यांच्या पालखीचे नुकतेच प्रस्थान झालेले आहे. आजमितीला सर्वजण महासंकटाला सामोरे जात आहेत. संकटे ही प्रत्येकाच्या जीवनात पदोपदी येत असतात आणि या संकटांना तोंड देण्याची शक्ती पांडुरंग परमात्मा आपल्याला क्षणाक्षणाला प्रदान करत असतात. संसाररूपी प्रपंच चालवत असताना पांडुरंगाच्या भक्तीत जीवन घालवत असताना वारकऱ्यांच्या जीवनातील सुवर्णकाळ म्हणून पंढरीच्या वारीला ओळखले जाते.वर्षभर काबाडकष्ट करणाºया माझा शेतकरीराजा व वारकऱ्यांसाठी हा सोहळा स्वर्गसुखाच्या अनुभूतीच्या कितीतरी पटीने मोठा असतो. कारण याच वारीत आम्हाला विठूरायांच्या भेटीच्या आसेबरोबर जीवनात यशस्वी वाटचाल कशी करायची याची प्रत्यक्ष अनुभूती मिळते. वारीत सहभागी होणारे प्रत्येकजण आपली संपत्ती, पद, पैसा या सर्व क्षणिक सुख देणाºया गोष्टी विसरून सहभागी झालेले असतात. वारीत प्रत्येकजण फक्त पंढरीचा वारकरी म्हणूनच सहभागी झालेला असतो. जीवनातील सर्वोच्च आनंदाची अनुभूती जर प्राप्त करायची असेल तर जीवनात एकदा तरी पंढरीची वारी करायला हवी. कारण आपण विश्वातील सर्व तीर्थ करून बसलो तरी जो आनंद पंढरीच्या वारीत प्राप्त होत तो अन्य ठिकाणी आपल्याला मिळू शकत नाही. तुकोबाराय वर्णन करतात,तीर्थे केली कोटीवरी ।नाहीदेखील पंढरी ।।आपण कोटीने तीर्थे केली असतील पण जर आपण पंढरीच्या पांडुरंगाला जर वारीतून भेटायला गेला नसाल तर तुमच्या अनेकविध केलेल्या तीर्थांना काहीही फायदा नाही त्यामुळे जीवनात आल्यानंतर प्रत्येकाने एकदातरी वारी करायला पाहिजे. वारी या शब्दातच ‘वार’ हा शब्द येतो आणि निश्चितच पंढरीच्या वारीमुळे पांडुरंग परमात्मा आपल्याला आपल्या अंगी असणाºया षड्विकारांवर वार करण्याची सद्बुद्धी देतात, सर्वजणांनी वारीचे अनन्यसाधारण असे महत्व जाणून वारी करून जीवन सार्थकी लावायला पाहिजे.तुकोबाराय म्हणतात जर जीवनात दु:खाची विरक्ती व सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल म्हणजेच मोक्षप्राप्ती करून घ्यायची असेल तर पंढरीच्या वारीत सहभागी होऊन सुवणर् पर्वकाळाचे साक्षीदार व्हायला पाहिजे, पण यावर्षी अपवादात्मक परिस्थितीमुळे कोणतेही वारकरी वारीत सहभागी होऊ शकत नाही. अशा वेळेसयावर्षी घरीच करूया वारी। तेव्हाच पळून जाईल कोरोना महामारी।।आपणा सर्वांना यावर्षी आपापल्या घरीच राहून विठूरायाला प्रार्थना करायची आहे की, आम्हाला या संकटातून मुक्त करा! निश्चितच विठूराय आपल्या सर्वांच्या हाकेला साद घालून या संकटातून आपल्याला तारेल व आपण पुढच्या वर्षीच्या पंढरीच्या वारीत सहभागी होऊन नक्कीच आनंद घेऊ...!- गजानन महाराज वरसाडेकर, पिंप्राळा.

टॅग्स :Jalgaonजळगाव