शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

जळगाव जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 12:08 IST

तातडीने मागविले अहवाल

जळगाव : जिल्ह्यात रविवारी मॉन्सूनपूर्व पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली.जिल्ह्यात रविवारी चोपडा, यावल या तालुक्यात मॉन्सूनपूर्व पावसामुळे केळीसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना मिळताच त्यांनी या नुकसानीची तातडीने पाहणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.आठ हजार शेतकऱ्यांना १५ कोटींची भरपाईजिल्ह्यात गेल्या वर्षी जून २०१८ मध्ये वादळी वारा व अवेळी पावसामुळे केळी पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी केळी उत्पादक शेतकºयांना १५ कोटी ८२ लाख रुपयांची मदत देण्यास सोमवारी मान्यता दिली आहे. ही रक्कम तातडीने जिल्हाधिकाºयांकडे वर्ग करण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.गेल्या वर्षी १ जून ते २१ जून २०१८ या कालावधीत जळगाव जिल्ह्यात वादळी वाºयासह पाऊस झाला होता. त्यामुळे केळी पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसान भरपाईपोटी शेतकºयांना १५ कोटी ८२ लाख ५३ हजार रुपयांचा निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सुमारे ८०१३ शेतकºयांंना ही रक्कम मिळणार आहे. शेतकºयांना ही रक्कम तातडीने देण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.नुकसानीची माहिती प्रपत्रात भरण्याचे आवाहनजिल्ह्यात रब्बी हंगाम २०१८ साठी फळपीकांसाठी हवामानावर आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात येत आहे. २ जून, २०१९ रोजी जळगाव, यावल व चोपडा या तालुक्यांमध्ये वादळी वाº्यांमुळे झालेल्या केळी पिकांच्या नुकसानीच्या बाबतीत कंपनीला सुचित करण्यासाठी शेतकºयांनी प्रपत्र-2 भरुन ते ईमेल आयडीवर स्कॅन करुन पाठवावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.गावात जाऊन होणार पंचनामेजिल्हाधिकाºयांनी महसूल व कृषी विभागाच्या यंत्रणेला जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सोमवार सकाळपासूनच महसूल व कृषी विभागाच्या कर्मचाºयांनी नुकसान झालेल्या गावांमध्ये जाऊन नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत.मॉन्सूनपूर्व पावसामुळे ज्या शेतकºयांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. अशा शेतकºयांंना शासनस्तरावरुन आवश्यक ती मदत करण्यात येईल तसेच ज्या शेतकºयांनी पीक विमा काढलेला असेल त्यांना नियमानुसार भरपाई मिळण्यासाठीचा प्रस्ताव संबंधितांकडे पाठविण्यात येईल, तर ज्या शेतकºयांनी पीक विमा काढलेला नाही.मात्र, त्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, अशा शेतकºयांना शासनामार्फत भरपाई मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे डॉ. ढाकणे यांनी सांगितले.सहकार राज्यमंत्र्यांनी केली पाहणीरविवारी कठोरा, सावखेडा, किनोद व गाढोदा परिसरात झालेल्या वादळी पावसामुळे केळीचे प्रचंड नुकसान झाले. सोमवारी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी या गावांमध्ये नुकसान झालेल्या केळी बागांची पाहणी केली. तसेच शेतकºयांशी चर्चा केली. नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतकºयांना आर्थिक मदतीचे आश्वासन त्यांनी दिले.

टॅग्स :Jalgaonजळगाव