शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

दिवाळीच्या सुट्टीत अडकले पिकांच्या नुकसानीचे पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 12:24 IST

पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत

जळगाव : अवकाळी पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मात्र सलग लागून आलेल्या दिवाळीच्या सुट्टीमुळे जिल्ह्यात अद्याप पंचनाम्यांना सुरुवीतदेखील झालेली नाही. त्यामुळे बळीराजा अधिकारी, कर्मचाºयांची शेताच्या बांधावर प्रतीक्षा करीत आहे.यंदा पावसाळा संपला तरी अवकाळी पाऊस सुरुच असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. उभ्या पिकांवर बुरशी लागण्यासह कोंबही फुटले आहेत. त्यामुळे शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून बळीराजा हवालदिल झाला आहे.जिल्ह्यातील या नुकसानीविषयी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकाºयांना पत्र देऊन झालेल्या नुकसानीचे विहीत प्रपत्रातील प्राथमिक अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. २७ आॅक्टोबर रोजी या विषयी पत्र काढले असले तरी दिवाळीच्या सुट्ट्या सुरू असल्याने कोठेही पंचनामे सुरू झालेले नाही. त्यामुळे पंचनामे कधी होतील व त्याचा मोबदला कधी मिळेल, याच चिंतेत बळीराजा आहे.दरम्यान, ज्या शेतकºयांनी पीकविमा काढलेला आहे, त्यांनी केवळ आॅनलाईन अर्ज दाखल करायचा असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिली. यासाठी सातबारा व इतर कागदपत्रे द्यावे, लागतील, अशी अफवा पसरलविली जात असून त्यावर विश्वास ठेवू नये, अशीही माहिती मिळाली. यासाठी आॅनलाईन अर्ज भरावा, असे आवाहन ठाकूर यांनी केले.

टॅग्स :Jalgaonजळगाव