शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

‘‘पहिली गं पूजा बाई... देवा-देवा साजे’’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:19 IST

नशिराबाद : ‘‘पहिली गं पूजा बाई... देवा-देवा साजे’’, भाद्रपदेचा महिना आला, आम्हा मुलींना आनंद झाला.... या गाण्यांचे स्वर घरोघरी ...

नशिराबाद : ‘‘पहिली गं पूजा बाई... देवा-देवा साजे’’, भाद्रपदेचा महिना आला, आम्हा मुलींना आनंद झाला.... या गाण्यांचे स्वर घरोघरी गुंजण्यास सोमवारपासून सुरुवात झाली आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या भुलाबाई या उत्सवास भाद्रपद पौर्णिमेपासून मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला.

भुलाबाई म्हणजे देवी पार्वती. एका आख्यायिकेनुसार पार्वतीकडून सारीपाटात सर्वकाही हरल्यावर शंकर कैलास सोडून रुसून निघून जातात. शंकराला परत आणायला पार्वती भिल्लीणीचे रूप घेते. ती नृत्य करून शंकराला प्रसन्न करून घेते. शंकर पार्वतीच्या रूपाला भुलले म्हणून त्यांना भुलोबा किंवा भुलोजी राणा म्हणतात. तर, पार्वतीला भुलाबाई म्हणतात. शंकर, पार्वतीला कोजागरीला तिच्या माहेरी घ्यायला जायचे आणि या दिवसात पार्वती तिच्या मैत्रिणींसोबत शंकराच्या आठवणीत गाणी म्हणायची. पूर्वीच्या काळापासून चालत आलेली ही परंपरा आज २१ व्या शतकातही कायम आहे.

भाद्रपद पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा म्हणजेच कोजागरी पौर्णिमेच्या एक महिन्याच्या कालावधीत भुलाबाईचा उत्सव साजरा केला जातो. खेळत्या वयाच्या मुली, सासुरवाशिणी भुलाबाईची घरी प्रतिष्ठापना केली जाते.

सर्जनतेचा उत्सव

भुलाबाई म्हणजे नेमकं काय? तर भुलाबाई म्हणजे पार्वती... जगन्माता... भूमीसारखी सर्जनशील... हा खेळोत्सव म्हणजे भूमीचा पार्वतीचा सर्जनोत्सव अन् शिवशक्तीची पूजा... एकप्रकारचा भक्ती विधी... भुलोबा हे शंकराचे प्रतीक... या पूजेत खेळोत्सवात शंकराची फक्त हजेरी असते.