शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

पाचोरा तालुक्याला पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 20:24 IST

पिकांचे नुकसान : हिवरा नदीला महापूर, जनजीवन झाले विस्कळीत

पाचोरा : शहरासह तालुक्यातील बहुतांश भागात १२ रोजी मध्यरात्रीनंतर मुसळधार पाऊस झाला. गाळण भागात अतिवृष्टी होऊन १२६ मिमी पावसाची नोंद झाली. नांद्रा व कुºहाड भागात मात्र पाऊस पडला नाही. तर अनेक भागात पावसाने पिकांचे नुकसान केले आहे.शहरात मुसळधार पाऊस पडूनही २२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली ती शंकास्पद असल्याची भावना शहरातील सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली.नगरदेवळा भागात ८० मिमि पिंपळगाव हरे ४२ मिमी, वरखेडी ५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. पाचोरा तालुक्यात आजपर्यंत ६२०.९९ मिमी सारसरीपावसाच नोंद झाली आहे.काही शेतांमध्ये साचले पाणीशिंदाड भागात रत्नाबाई संजय पाटील या महिलेच्या शेतात नाल्याचे पाणी घुसून कपाशीचे शेत वाहून नुकसान झाले. शिवारात बऱ्याच ठिकाणी मक्का , ज्वारी , बाजरी ही पिके आडवे पडली. तर काही ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पिके सडण्याची भीती शेतकरी वर्गात व्यक्त होत आहे.शेतीचे नुकसानीचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.आॅक्सिजन सिलिंडर पाण्यातून नेताना कसरतअत्यावश्यक सेवेसाठी असलेले व दवाखान्यात लागणारे आॅक्सिजन सिलेंडर घेऊन जाताना मोटरसायकल पाण्यातून नेताना बंद पडली. रुग्णाच्या नातेवाईकांना मोठी कसरत करत हे सिलिंडर पाणी साचलेल्या भुयारी मागार्तूनच घेऊन जावे लागेले. शहराच्या या भयानक परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये नगरपालिका प्रशासनाचे विरुद्ध संतापाची लाट उसळली. दरवेळी पाऊस पडला की, येथे पाणी साचते.जलाशये झाले ओव्हरफ्लोतालुक्यातील बहुळा, हिवरा, अग्नावती हे तीनही मध्यम प्रकल्प पूर्ण भरले आहेत. २२ लघु प्रकल्पात सार्वे पिंपरी, राजुरी, अटलगव्हाण, कोल्हे, डांभुर्णी, पिंपरी, पिंपळगाव, घोडसगाव, गाळण १ व गाळण २, खाजोळे, सारवे, दिघी१ व दिघी२, सातगाव, गहुले, म्हसळा, वाकडी, लोहारा, बांंबरुड, गारखेडा, मोहाडी आदी प्रकल्पात १०० टक्के जलसाठा झाला असून पाझर तलाव देखील ओव्हरफ्लो झाले आहेत.दोन भागांचा संपर्क तुटलामुसळधार पावसाने सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले असून सर्वच नद्यांना पूर आलेला आहे. पाचोरा शहरात रात्री ११ ते २ च्या सुमारास मुसळधार पासावने रेल्वे भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शहराचा पश्चिम भागाशी संपर्क तुटला. शहरातून जाणाºया हिवरा नदी वरील पुलावरून पुराचे मोठे प्रमाणात पाणी वाहत असून कृष्णापुरी भागाचाही पाचोरा शहराशी संपर्क तुटला. परिणामी या लोकांना खूप फेºयाने ये- जा करावी लागली. त्यातच शहरात प्रवेश करणारा एकमेव जळगाव चौफूली बस स्टँडरोड असल्याने या मार्गावर काँक्रिटीकरण कामामळे प्रचंड ट्रॅफिक जाम झाली. सुमारे दोन दोन तास नागरिकांना ताटकळावे लागले.