शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

तापमानावर मात करण्यासाठी साकारले जाताहेत ‘आॅक्सिजन पार्क’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 12:52 IST

२६ ठिकाणी होताहेत पार्क

अजय पाटील जळगाव : तापमानात होत असलेल्या बदलामुळे जळगावकरांना उन्हाळ्यात प्रचंड तापमानाचा सामना करावा लागतो. त्या तापमानाला काही प्रमाणात नियंत्रणात आणता यावे यासाठी शहरात अमृत योजनेंतर्गत २६ ठिकाणी ‘आॅक्सिजन पार्क’ तयार करण्यात येत आहेत. त्यापैकी १० ठिकाणी ‘आॅक्सिजन पार्क’ चे १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. २०२० मध्ये सर्वच पार्कचे काम पूर्ण होवून तेथे लावण्यात आलेल्या वृक्षांमुळे उन्हाळ्यात तापमान नियंत्रणात येईल.शहरात २०१५-२०१६ पासून आॅक्सिजनपार्कच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, शासकीय मंजुरी, जागांची निवड या प्रक्रियेमुळे या कामाला गती नव्हती. मात्र, मावळत्या वर्षात २६ पैकी आॅक्सिजन पार्कच्या कामांना वेग येवून ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. ५ कोटी रुपयांमध्ये हे आॅक्सिजन पार्क विकसित करण्यात येत आहे.पक्ष्यांसाठी ठरणार नंदनवनआॅक्सीजन पार्क नागरिकांसह पक्ष्यांसाठी लाभदायक ठरणार आहे. शुध्द हवेसोबतच सावली देखील मिळणार आहे.मेहरूण, निमखेडी, पिंप्राळा, जळगाव शिवार गट २८०, ६९, मेहरूण तलाव परिसर, खोटेनगर, ढाकेवाडी, रायसोनी नगर, खेडी, शिव कॉलनी, नुतन वर्षा कॉलनी, नेहरु नगर, मोहन नगर, ट्रान्सपोर्ट नगर, रिंगरोडसह अन्य ठिकाणी हे पार्क तयार करण्यात येत आहे.आॅक्सीजन देणाऱ्या वृक्षांची लागवडशासनाच्या वृक्ष लागवडीप्रमाणे या पार्क मध्ये वृक्ष लागवड करण्यात येत नाही. वृक्षांचे जगण्याचे प्रमाण अधिक असावे म्हणून ७ फुटाच्या वृक्षांची लागवड या पार्क मध्ये करण्यात आली आहे. तसेच २ ते ५ मीटरच्या अंतरावर हे वृक्ष लावण्यात आले आहेत.या पार्कमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी जागेचा विचार करण्यात आलेला नाही, केवळ जास्तीत जास्त आॅक्सीजन देणारे वृृक्ष या ठिकाणी लावण्यात आले आहेत. तसेच जॉगींग ट्रॅकची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आली आहे.या पार्कमध्ये लावण्यात वृक्षांमध्ये आॅक्सीजन देणाºयाच वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये कडूनिंब, औदुंबर, पिंपळ, बांबू व वड या वृक्षांचा समावेश आहे. पिंपळ वृक्ष २४ तासापैकी २२ तास आॅक्सीजन देतो. एका पिंपळाच्या वृक्षाच्या पानातून तासाभरातच ५ मिलीलीटर आॅक्सीजन तयार होतो. तर बांबूचे वृक्ष वेगाने वाढणारे व फ्रेश हवा देण्यासाठी ओळखले जाते. याच वृक्षांची लागवड या पार्कमध्ये करण्यात आली आहे.आॅक्सीजन पार्कचा मुळ उद्देश शहरात वाढत जाणाºया तापमानाला नियंत्रणात आणण्याचा आहे. या पार्कमध्ये जास्तीत जास्त आॅक्सीजन देणाºयाच वृक्षांची लागवड करण्यात आली असून, हे वृक्ष पुर्णपणे जगतील यासाठी ७ फुट उंची असलेल्याच वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.-योगेश बोरोले, प्रकल्प अभियंता, मनपावृक्ष पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत. जास्तीत जास्त वृक्षांची लागवड झाली तर वातावरणावर देखील परिणाम होतो. ज्या भागात‘आॅक्सीजन पार्क’ तयार करण्यात आले आहेत. त्या ठिकाणच्या तापमानावर नक्कीच फरक पडेल. वृक्षांच्या लागवडमुळे पक्ष्यांना देखील फायदा होईल.-राजेंद्र नन्नवरे, पर्यावरण अभ्यासक

टॅग्स :Jalgaonजळगाव