शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

तापमानावर मात करण्यासाठी साकारले जाताहेत ‘आॅक्सिजन पार्क’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 12:52 IST

२६ ठिकाणी होताहेत पार्क

अजय पाटील जळगाव : तापमानात होत असलेल्या बदलामुळे जळगावकरांना उन्हाळ्यात प्रचंड तापमानाचा सामना करावा लागतो. त्या तापमानाला काही प्रमाणात नियंत्रणात आणता यावे यासाठी शहरात अमृत योजनेंतर्गत २६ ठिकाणी ‘आॅक्सिजन पार्क’ तयार करण्यात येत आहेत. त्यापैकी १० ठिकाणी ‘आॅक्सिजन पार्क’ चे १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. २०२० मध्ये सर्वच पार्कचे काम पूर्ण होवून तेथे लावण्यात आलेल्या वृक्षांमुळे उन्हाळ्यात तापमान नियंत्रणात येईल.शहरात २०१५-२०१६ पासून आॅक्सिजनपार्कच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, शासकीय मंजुरी, जागांची निवड या प्रक्रियेमुळे या कामाला गती नव्हती. मात्र, मावळत्या वर्षात २६ पैकी आॅक्सिजन पार्कच्या कामांना वेग येवून ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. ५ कोटी रुपयांमध्ये हे आॅक्सिजन पार्क विकसित करण्यात येत आहे.पक्ष्यांसाठी ठरणार नंदनवनआॅक्सीजन पार्क नागरिकांसह पक्ष्यांसाठी लाभदायक ठरणार आहे. शुध्द हवेसोबतच सावली देखील मिळणार आहे.मेहरूण, निमखेडी, पिंप्राळा, जळगाव शिवार गट २८०, ६९, मेहरूण तलाव परिसर, खोटेनगर, ढाकेवाडी, रायसोनी नगर, खेडी, शिव कॉलनी, नुतन वर्षा कॉलनी, नेहरु नगर, मोहन नगर, ट्रान्सपोर्ट नगर, रिंगरोडसह अन्य ठिकाणी हे पार्क तयार करण्यात येत आहे.आॅक्सीजन देणाऱ्या वृक्षांची लागवडशासनाच्या वृक्ष लागवडीप्रमाणे या पार्क मध्ये वृक्ष लागवड करण्यात येत नाही. वृक्षांचे जगण्याचे प्रमाण अधिक असावे म्हणून ७ फुटाच्या वृक्षांची लागवड या पार्क मध्ये करण्यात आली आहे. तसेच २ ते ५ मीटरच्या अंतरावर हे वृक्ष लावण्यात आले आहेत.या पार्कमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी जागेचा विचार करण्यात आलेला नाही, केवळ जास्तीत जास्त आॅक्सीजन देणारे वृृक्ष या ठिकाणी लावण्यात आले आहेत. तसेच जॉगींग ट्रॅकची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आली आहे.या पार्कमध्ये लावण्यात वृक्षांमध्ये आॅक्सीजन देणाºयाच वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये कडूनिंब, औदुंबर, पिंपळ, बांबू व वड या वृक्षांचा समावेश आहे. पिंपळ वृक्ष २४ तासापैकी २२ तास आॅक्सीजन देतो. एका पिंपळाच्या वृक्षाच्या पानातून तासाभरातच ५ मिलीलीटर आॅक्सीजन तयार होतो. तर बांबूचे वृक्ष वेगाने वाढणारे व फ्रेश हवा देण्यासाठी ओळखले जाते. याच वृक्षांची लागवड या पार्कमध्ये करण्यात आली आहे.आॅक्सीजन पार्कचा मुळ उद्देश शहरात वाढत जाणाºया तापमानाला नियंत्रणात आणण्याचा आहे. या पार्कमध्ये जास्तीत जास्त आॅक्सीजन देणाºयाच वृक्षांची लागवड करण्यात आली असून, हे वृक्ष पुर्णपणे जगतील यासाठी ७ फुट उंची असलेल्याच वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.-योगेश बोरोले, प्रकल्प अभियंता, मनपावृक्ष पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत. जास्तीत जास्त वृक्षांची लागवड झाली तर वातावरणावर देखील परिणाम होतो. ज्या भागात‘आॅक्सीजन पार्क’ तयार करण्यात आले आहेत. त्या ठिकाणच्या तापमानावर नक्कीच फरक पडेल. वृक्षांच्या लागवडमुळे पक्ष्यांना देखील फायदा होईल.-राजेंद्र नन्नवरे, पर्यावरण अभ्यासक

टॅग्स :Jalgaonजळगाव