शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

तापमानावर मात करण्यासाठी साकारले जाताहेत ‘आॅक्सिजन पार्क’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 12:52 IST

२६ ठिकाणी होताहेत पार्क

अजय पाटील जळगाव : तापमानात होत असलेल्या बदलामुळे जळगावकरांना उन्हाळ्यात प्रचंड तापमानाचा सामना करावा लागतो. त्या तापमानाला काही प्रमाणात नियंत्रणात आणता यावे यासाठी शहरात अमृत योजनेंतर्गत २६ ठिकाणी ‘आॅक्सिजन पार्क’ तयार करण्यात येत आहेत. त्यापैकी १० ठिकाणी ‘आॅक्सिजन पार्क’ चे १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. २०२० मध्ये सर्वच पार्कचे काम पूर्ण होवून तेथे लावण्यात आलेल्या वृक्षांमुळे उन्हाळ्यात तापमान नियंत्रणात येईल.शहरात २०१५-२०१६ पासून आॅक्सिजनपार्कच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, शासकीय मंजुरी, जागांची निवड या प्रक्रियेमुळे या कामाला गती नव्हती. मात्र, मावळत्या वर्षात २६ पैकी आॅक्सिजन पार्कच्या कामांना वेग येवून ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. ५ कोटी रुपयांमध्ये हे आॅक्सिजन पार्क विकसित करण्यात येत आहे.पक्ष्यांसाठी ठरणार नंदनवनआॅक्सीजन पार्क नागरिकांसह पक्ष्यांसाठी लाभदायक ठरणार आहे. शुध्द हवेसोबतच सावली देखील मिळणार आहे.मेहरूण, निमखेडी, पिंप्राळा, जळगाव शिवार गट २८०, ६९, मेहरूण तलाव परिसर, खोटेनगर, ढाकेवाडी, रायसोनी नगर, खेडी, शिव कॉलनी, नुतन वर्षा कॉलनी, नेहरु नगर, मोहन नगर, ट्रान्सपोर्ट नगर, रिंगरोडसह अन्य ठिकाणी हे पार्क तयार करण्यात येत आहे.आॅक्सीजन देणाऱ्या वृक्षांची लागवडशासनाच्या वृक्ष लागवडीप्रमाणे या पार्क मध्ये वृक्ष लागवड करण्यात येत नाही. वृक्षांचे जगण्याचे प्रमाण अधिक असावे म्हणून ७ फुटाच्या वृक्षांची लागवड या पार्क मध्ये करण्यात आली आहे. तसेच २ ते ५ मीटरच्या अंतरावर हे वृक्ष लावण्यात आले आहेत.या पार्कमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी जागेचा विचार करण्यात आलेला नाही, केवळ जास्तीत जास्त आॅक्सीजन देणारे वृृक्ष या ठिकाणी लावण्यात आले आहेत. तसेच जॉगींग ट्रॅकची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आली आहे.या पार्कमध्ये लावण्यात वृक्षांमध्ये आॅक्सीजन देणाºयाच वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये कडूनिंब, औदुंबर, पिंपळ, बांबू व वड या वृक्षांचा समावेश आहे. पिंपळ वृक्ष २४ तासापैकी २२ तास आॅक्सीजन देतो. एका पिंपळाच्या वृक्षाच्या पानातून तासाभरातच ५ मिलीलीटर आॅक्सीजन तयार होतो. तर बांबूचे वृक्ष वेगाने वाढणारे व फ्रेश हवा देण्यासाठी ओळखले जाते. याच वृक्षांची लागवड या पार्कमध्ये करण्यात आली आहे.आॅक्सीजन पार्कचा मुळ उद्देश शहरात वाढत जाणाºया तापमानाला नियंत्रणात आणण्याचा आहे. या पार्कमध्ये जास्तीत जास्त आॅक्सीजन देणाºयाच वृक्षांची लागवड करण्यात आली असून, हे वृक्ष पुर्णपणे जगतील यासाठी ७ फुट उंची असलेल्याच वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.-योगेश बोरोले, प्रकल्प अभियंता, मनपावृक्ष पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत. जास्तीत जास्त वृक्षांची लागवड झाली तर वातावरणावर देखील परिणाम होतो. ज्या भागात‘आॅक्सीजन पार्क’ तयार करण्यात आले आहेत. त्या ठिकाणच्या तापमानावर नक्कीच फरक पडेल. वृक्षांच्या लागवडमुळे पक्ष्यांना देखील फायदा होईल.-राजेंद्र नन्नवरे, पर्यावरण अभ्यासक

टॅग्स :Jalgaonजळगाव