शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ओव्हरलोड आणि अवैध प्रवासी वाहतूक पुन्हा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:27 IST

आरटीओचा ‘अर्थ’पूर्ण कानाडोळा : निष्पापांच्या जीवाला जबाबदार कोण? सुनील पाटील जळगाव : दोन दिवसापूर्वी किनगावनजीक पपईचा ट्रक पलटी होऊन ...

आरटीओचा ‘अर्थ’पूर्ण कानाडोळा : निष्पापांच्या जीवाला जबाबदार कोण?

सुनील पाटील

जळगाव : दोन दिवसापूर्वी किनगावनजीक पपईचा ट्रक पलटी होऊन त्यात १५ जणांचा बळी गेला. या अपघाताने समाजमन सुन्न झाले असून जिल्ह्यातून होत असलेली ओव्हरलोड व अवैध प्रवासी वाहतूक यामुळेच हे जीव गेल्याचे बोलले जात असून हे दोन्ही मुद्दे यानिमित्ताने ऐरणीवर आले आहेत, त्यामुळे या अपघाताला जबाबदार नेमके कोण? हा देखील तितकाच महत्वाचा प्रश्न आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या आरटीओच्या यंत्रणेचा याकडे अर्थपूर्ण कानाडोळा होत असल्याचे अधोरेखित झाले आहे.

ट्रक, कंटेनर व इतर अवजड वाहनांमधून जिल्ह्यातील प्रमुख राष्ट्रीय व राज्यमार्गावरुन ओव्हरलोड वाहतूक सर्रासपणे होत आहे. त्याशिवाय मुंबई, पुणे, नागपूरसह गुजरात व मध्य प्रदेशात जिल्ह्यातून मोठ्या ट्रॅव्हल्स बसमधून प्रवासी वाहतूक केली जाते. या वाहनांची तपासणी केली तर त्यात अनेक प्रकाराच्या त्रुटी दिसून येतील, मात्र ही एक साखळी असल्याने या बसेसकडे आरटीओ कधी ढुंकून पाहत नाही. या उलट हातावर पोट असलेल्या लोकांच्या जिल्हातंर्गत प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करुन शासनदरबारी कारवाई व दंडाचा आकडा फुगवून दाखविला जातो. त्याशिवाय तालुका पातळीवर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या परमीटधारक वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. महिन्याचे कारवाईचे टार्गेट पूर्ण झाले की स्वत:च्या टार्गेटकडे मोर्चा वळविला जात असल्याची ओरड होऊ लागली आहे.

कार्ड दाखवातच, ओव्हरलोड वाहन ठरते वैध

जिल्ह्यातून ओव्हरलोड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे, मात्र अशा वाहनांवर कारवाई करताना कार्ड पद्धत आरटीओने सुरू केलेली आहे, अर्थात ही पद्धत वर्षानुवर्ष सुरुच असून यासाठी स्वतंत्र खासगी पंटर नेमलेले आहेत. आरटीओच्या भरारी पथकाने ओव्हरलोड वाहन अडविले की संबंधित चालकाकडून कार्ड दाखविले जाते. या कार्डावरुन पंटर, वाहनाचा प्रकार व रक्कम याची ओळख पटते. पथकातील अधिकाऱ्यांकडे असलेल्या यादीत कार्डधारकाचा वाहन क्रमांक आला की ते ओव्हरलोड वाहन वैध होते, क्रमांक नसला तर मग कारवाई केली जाते, किंवा जागेवरच अर्थपूर्ण व्यवहार करुन मामला मिटविला जातो.

शासनाचा महसूल अधिकाऱ्यांच्या खिशात

ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करुन त्याची दंडाची रक्कम शासन दरबारी जमा होते, मात्र आरटीओकडून कार्ड स्वरुपात दरमहा लाखो रुपयांचा मलिदा गोळा केला जातो. कोट्यवधी रुपयांचा हा महसूल शासन ऐवजी अधिकाऱ्यांच्या खिशात जात असून शासनाचे मोठे नुकसान होत आहे. भरारी पथक तसेच चेक नाक्यांवर ड्यूटी लावण्यासाठी निरीक्षक लाखो रुपये मोजतात, तर बाहेर जिल्ह्यातून येथे बदलून येण्यासाठी देखील मोठी बोली लागते. या साऱ्या अर्थकारणाच्या मोहापायी कारवाईकडे कानाडोळा होतो अन‌् अपघातात अशा निष्पाप लोकांचा जीव जातो.

--