शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

अतिपावसाने उडीद, मुगाचे ५० टक्के नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 12:34 IST

शेतात पाणी साचल्याने कापसाचे उत्पन्न घटणार

जळगाव : जिल्हाभरात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पाणी प्रश्न मिटला आहे़ मात्र, बऱ्याच ठिकाणी अति पावसामुळे व शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे़ जिल्हाभरात ४० ते ५० टक्के उडिद व मूग खराब झाला आहे तर किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने कापसाच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे़जिल्हाभरात कापासाची सुमोर ५ लाख दहा हजार हेक्टरवर लागवड होत असते.तर उडिद ३२ हजार व मुगाची सुमारे २५ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाने हजेरी लावली़ धरणे ओव्हरफ्लो झाली मात्र, कमी कालावधीत अधिक पाऊस झाल्याने शेतांमध्ये पाणी साचून याचा पिकांवर परिणाम झाला आहे़ ज्वारी काळी पडली आहे़ जूनमध्ये लागवड केलेल्या बागायती कापसाची बोंडे सडली आहेत़ जिरायती कापसाची वाढ व्यवस्थित झालेली नाही़ त्यातच विविध प्रकारच्या किडींच्या प्रादूर्भाव वाढल्यामुळे कापसाच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होण्याची यंदा शक्यता आहे़जिथे-जिथे पाणी साचले आहे त्या ठिकाणी कापसाची वाढ खुंटली आहे़ याशिवाय रस शोषणाºया किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे़मुक्ताईनगरला पाहणी केल्यानंतर ज्वारीच्या कणसांमध्ये पाणीसाचून ते काळे पडत असल्याचे निदर्शनास आले. अनेक ठिकाणी उडिदाचे ४० ते ५० टक्के नुकसान झाले आहे. उडीदाची गुणवत्ता खराब झाली आहे़ शेतकऱ्यांनी काही ठिकाणी पीक काढणेही सोडून दिले आहे़ मात्र, हा पाऊस तुरीसाठी फायदेशीर आहे. -अनिल भोकरे, कृषी उपसंचालक, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव