शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकी १६७ कोटी

By admin | Updated: July 28, 2014 13:56 IST

वीज वितरण कंपनीच्या शहादा उपविभागांतर्गत चार तालुक्यातील शेतकर्‍यांकडे कृषिपंपांची १६७ कोटी रुपयांची थकबाकी राज्य शासनाने माफ करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

बोरद : शेतकर्‍यांकडून माफीची अपेक्षा
बोरद :वीज वितरण कंपनीच्या शहादा उपविभागांतर्गत चार तालुक्यातील शेतकर्‍यांकडे कृषिपंपांची १६७ कोटी रुपयांची थकबाकी राज्य शासनाने माफ करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 
राज्य शासनाने कृषी संजीवनी योजनेत कृषिपंपधारकांना निम्मे वीज बिल व त्यावरील वीज बिल माफ करण्याची नुकतीच घोषणा केली आहे. परंतु नंदुरबार जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीच्या अखत्यारीतील शहादा, अक्कलकुवा, धडगाव व तळोदा तालुक्यातील २0 कृषिपंपधारक शेतकर्‍यांनी वीज कंपनीकडून देण्यात आलेली १00 टक्के रक्कम माफ करून शेतकर्‍यांना आर्थिक दिलासा द्यावा, या बिलांच्या माफीनंतर शेतकर्‍यांना नियमित कृषिपंप बिल द्यावे, अशी मागणी शेतकर्‍यांची आहे. वीज कंपनीने दर महिन्याला बिले देऊन शेतकर्‍यांकडून रितसर बिल वसुलीची मागणी करूनही कारवाई करण्यात आलेली नाही. 
वीज वितरण कंपनीने बिले दिलेल्या शहादा, धडगाव, तळोदा व अक्कलकुवा या चारही तालुक्यातील शेतकर्‍यांकडे १६७ कोटी रुपयांची वीज बिले थकलेली आहेत. शहादा तालुक्यात सर्वात जास्त १२0 कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी आहे. परंतु शेतकर्‍यांच्या म्हणण्यानुसार तालुक्यात गेल्या काही काळात खालावलेल्या पाणी पातळीमुळे शेतकर्‍यांनी आपले पंप या काळात बंद ठेवले होते. परंतु वीज कंपनीने बंद काळातील बिले देऊन बिलाची रक्कम फुगवली आहे. शहादा, तळोदा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील शेतकर्‍यांना गेल्या तीन वर्षात गारपीट, अवकाळी व अतवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. परिणामी शेतकर्‍यांच्या खरीप व रब्बी हंगामाच्या शेती उत्पादनांना र्मयादा आलेली आहे. यंदाही लांबलेल्या पावसाळ्यात सहा तास चालणार्‍या वीजपंपांद्वारे शेतकर्‍यांनी कापूस, केळी, पपई, सोयाबीन व उसाचे संगोपन केले आहे. यामुळे शेतकर्‍यांचे वीज बिल वाढीव येण्याची चिन्हे आहेत. परंतु पावसाचा लपंडाव सुरू असल्याने शेतकर्‍यांना उत्पन्नाची शाश्‍वती नाही.
राज्य शासनाने शेतकर्‍यांच्या समस्या लक्षात घेऊन चारही तालुक्यातील कृषिपंपधारक शेतकर्‍यांकडे थकीत असलेली रक्कम निवडणूक आचारसंहितेच्या आधी माफ करावी, अशी अपेक्षा चारही तालुक्यातील शेतकर्‍यांकडून व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
तीन वर्षांपासून उत्पन्न घटले
■ शहादा विद्युत वितरण कंपनीच्या उपविभागीय क्षेत्रात शहादा, तळोदा, धडगाव व अक्कलकुवा या तालुक्यांचा समावेश आहे. यात २0 हजार ३८४ कृषिपंपधारक शेतकरी आहेत. या शेतकर्‍यांकडे १६७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. शहादा तालुक्यात १२0 कोटी, तळोदा तालुक्यात १९ कोटी, धडगाव तालुक्यात १२ कोटी, अक्कलकुवा तालुक्यात १६ कोटी रुपये शेतकर्‍यांकडे थकीत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी शहादा तालुक्यात पाणी पातळी खालावली होती. परिणामी शेतकर्‍यांचे कृषिपंप बंद झाल्यामुळे वीज वापर बंद झाला होता. तरीही वीज बिलात जादा वापर दाखवल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. चारही तालुक्यात गेल्या तीन वर्षात पर्जन्यमानाची अनियमितता, पाणीपातळी, भारनियमन यामुळे शेती उत्पन्नात घट आली आहे. शेतकर्‍यांकडे थकलेल्या वीज बिलांचा भरणा न झाल्यास वीज कंपनी कर्मचारी व शेतकरी यांच्यात वाद होतात. यातून अनेकवेळा मोठी भांडणे झाली आहेत.