शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकी १६७ कोटी

By admin | Updated: July 28, 2014 13:56 IST

वीज वितरण कंपनीच्या शहादा उपविभागांतर्गत चार तालुक्यातील शेतकर्‍यांकडे कृषिपंपांची १६७ कोटी रुपयांची थकबाकी राज्य शासनाने माफ करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

बोरद : शेतकर्‍यांकडून माफीची अपेक्षा
बोरद :वीज वितरण कंपनीच्या शहादा उपविभागांतर्गत चार तालुक्यातील शेतकर्‍यांकडे कृषिपंपांची १६७ कोटी रुपयांची थकबाकी राज्य शासनाने माफ करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 
राज्य शासनाने कृषी संजीवनी योजनेत कृषिपंपधारकांना निम्मे वीज बिल व त्यावरील वीज बिल माफ करण्याची नुकतीच घोषणा केली आहे. परंतु नंदुरबार जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीच्या अखत्यारीतील शहादा, अक्कलकुवा, धडगाव व तळोदा तालुक्यातील २0 कृषिपंपधारक शेतकर्‍यांनी वीज कंपनीकडून देण्यात आलेली १00 टक्के रक्कम माफ करून शेतकर्‍यांना आर्थिक दिलासा द्यावा, या बिलांच्या माफीनंतर शेतकर्‍यांना नियमित कृषिपंप बिल द्यावे, अशी मागणी शेतकर्‍यांची आहे. वीज कंपनीने दर महिन्याला बिले देऊन शेतकर्‍यांकडून रितसर बिल वसुलीची मागणी करूनही कारवाई करण्यात आलेली नाही. 
वीज वितरण कंपनीने बिले दिलेल्या शहादा, धडगाव, तळोदा व अक्कलकुवा या चारही तालुक्यातील शेतकर्‍यांकडे १६७ कोटी रुपयांची वीज बिले थकलेली आहेत. शहादा तालुक्यात सर्वात जास्त १२0 कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी आहे. परंतु शेतकर्‍यांच्या म्हणण्यानुसार तालुक्यात गेल्या काही काळात खालावलेल्या पाणी पातळीमुळे शेतकर्‍यांनी आपले पंप या काळात बंद ठेवले होते. परंतु वीज कंपनीने बंद काळातील बिले देऊन बिलाची रक्कम फुगवली आहे. शहादा, तळोदा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील शेतकर्‍यांना गेल्या तीन वर्षात गारपीट, अवकाळी व अतवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. परिणामी शेतकर्‍यांच्या खरीप व रब्बी हंगामाच्या शेती उत्पादनांना र्मयादा आलेली आहे. यंदाही लांबलेल्या पावसाळ्यात सहा तास चालणार्‍या वीजपंपांद्वारे शेतकर्‍यांनी कापूस, केळी, पपई, सोयाबीन व उसाचे संगोपन केले आहे. यामुळे शेतकर्‍यांचे वीज बिल वाढीव येण्याची चिन्हे आहेत. परंतु पावसाचा लपंडाव सुरू असल्याने शेतकर्‍यांना उत्पन्नाची शाश्‍वती नाही.
राज्य शासनाने शेतकर्‍यांच्या समस्या लक्षात घेऊन चारही तालुक्यातील कृषिपंपधारक शेतकर्‍यांकडे थकीत असलेली रक्कम निवडणूक आचारसंहितेच्या आधी माफ करावी, अशी अपेक्षा चारही तालुक्यातील शेतकर्‍यांकडून व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
तीन वर्षांपासून उत्पन्न घटले
■ शहादा विद्युत वितरण कंपनीच्या उपविभागीय क्षेत्रात शहादा, तळोदा, धडगाव व अक्कलकुवा या तालुक्यांचा समावेश आहे. यात २0 हजार ३८४ कृषिपंपधारक शेतकरी आहेत. या शेतकर्‍यांकडे १६७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. शहादा तालुक्यात १२0 कोटी, तळोदा तालुक्यात १९ कोटी, धडगाव तालुक्यात १२ कोटी, अक्कलकुवा तालुक्यात १६ कोटी रुपये शेतकर्‍यांकडे थकीत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी शहादा तालुक्यात पाणी पातळी खालावली होती. परिणामी शेतकर्‍यांचे कृषिपंप बंद झाल्यामुळे वीज वापर बंद झाला होता. तरीही वीज बिलात जादा वापर दाखवल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. चारही तालुक्यात गेल्या तीन वर्षात पर्जन्यमानाची अनियमितता, पाणीपातळी, भारनियमन यामुळे शेती उत्पन्नात घट आली आहे. शेतकर्‍यांकडे थकलेल्या वीज बिलांचा भरणा न झाल्यास वीज कंपनी कर्मचारी व शेतकरी यांच्यात वाद होतात. यातून अनेकवेळा मोठी भांडणे झाली आहेत.