शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

मक्तेदाराने आणलेली चोरीची वाळू दुसऱ्या माफियांनी पळवली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 21:34 IST

जळगाव : सध्या वाळू ठेके बंद असल्याने बांधकामासाठी नदीपात्रातून बेकायदेशिर पध्दतीने वाळू उपसा सुरु आहे. आव्हाणे येथे रस्त्यांचे काम ...

जळगाव : सध्या वाळू ठेके बंद असल्याने बांधकामासाठी नदीपात्रातून बेकायदेशिर पध्दतीने वाळू उपसा सुरु आहे. आव्हाणे येथे रस्त्यांचे काम सुरु करण्यात आले. मात्र, वाळूअभावी हे काम देखील संथ गतीने सुरु आहे. मक्तेदाराने काम सुरु व्हावे यासाठी काही वाळू व्यावसायिकांच्या मदतीने बेकायदेशिर पध्दतीने आणलेली वाळू देखील रात्रीच्या वेळेस वाळू माफियांनी चोरून नेल्याचा प्रकार आव्हाणे येथे घडला आहे.३० सप्टेंबरपर्यंतच जिल्ह्यातील वाळूच्या ठेक्यांची मुदत होती. ही मुदत संपली असून नवीन ठेक्यांचे लिलाव अद्याप प्रशासनाकडून सुरुकरण्यात आलेले नाही. शासनाकडून सुरु असलेल्या रस्त्यांचे काम देखील बंद आहेत. दरम्यान, आव्हाणे येथे सिमेंट कॉँक्रीटच्या रस्त्यांचे कामे गेल्या तीन महिन्यांपासून सुरु आहे. २०० मीटरच्या रस्त्याचे काम तीन महिन्यांपासून सुरु असल्याने ग्रामस्थांनी संबधित मक्तेदाराला हे काम लवकर करण्याबाबत सूचना दिल्या. त्यानंतर मक्तेदाराने काही वाळू व्यावसायिकांकडून वाळू खरेदी केली. शुक्रवारी दुपारी पाच ते सहा डंपर वाळू काम सुरु असल्याचा ठिकाणी टाकण्यात आली होती. मात्र, रात्रभरातच काही माफियांनी रस्त्याचा कामासाठी टाकण्यात आलेली वाळू देखील लांबवली. त्यामुळे ‘चोरावर मोर शिरजोर’ असल्याचा प्रकार आव्हाणे येथे घडला आहे.तेरी भी चूप मेरी भी चूपसध्या वाळू ठेके बंद असल्याने आणलेली वाळू ही बेकायदेशिरच समजली जाणार आहे. त्यामुळे मक्तेदाराने चोरलेल्या वाळू बाबत तक्रार देखील केली नाही. या प्रकरणात मक्तेदारालाही चुप्पी साधतच बसावे लागले. दरम्यान, वाळू ठेके बंद असले तरी तरीही बांधकामे सुरु असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. गिरणा व तापी नदीला काही महिन्यांपासून प्रचंड पूर असल्याने वाळू उपसा पुर्णपणे बंद होता. मात्र, आता गिरणेतील पुराचे पाणी कमी झाल्यामुळे वाळू माफियांनी गिरणेचे पुन्हा लचके तोडायला सुरुवात झाली आहे.रात्रीच्या वेळेस कानळदा रस्त्यावरून जाणेही कठीणरात्री १० वाजेनंतर वाळू माफियांकडून वाळू उपसा करायला सुरुवात होते. पहाटे ६ वाजेपर्यंत प्रशासनाच्या नाकावर टीच्चून वाळू माफियांकडून सर्रासपणे वाळू उपसा केला जात आहे. आव्हाणे व निमखेडी भागातील गिरणा नदीपात्रात सर्वाधिक उपसा होत आहे. रात्री १० वाजेनंतर कानळदा रस्त्यालगत भरधाव वेगाने वाळूचे डंपर व ट्रॅक्टर धावत असल्याने सामान्य नागरिकांना या रस्त्यावरून वाहतूक करणे देखील मोठे जिकरीचे झाले आहे. महसूल प्रशासन मात्र या प्रकरणी आंधळेपणाचीच भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव