शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मक्तेदाराने आणलेली चोरीची वाळू दुसऱ्या माफियांनी पळवली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 21:34 IST

जळगाव : सध्या वाळू ठेके बंद असल्याने बांधकामासाठी नदीपात्रातून बेकायदेशिर पध्दतीने वाळू उपसा सुरु आहे. आव्हाणे येथे रस्त्यांचे काम ...

जळगाव : सध्या वाळू ठेके बंद असल्याने बांधकामासाठी नदीपात्रातून बेकायदेशिर पध्दतीने वाळू उपसा सुरु आहे. आव्हाणे येथे रस्त्यांचे काम सुरु करण्यात आले. मात्र, वाळूअभावी हे काम देखील संथ गतीने सुरु आहे. मक्तेदाराने काम सुरु व्हावे यासाठी काही वाळू व्यावसायिकांच्या मदतीने बेकायदेशिर पध्दतीने आणलेली वाळू देखील रात्रीच्या वेळेस वाळू माफियांनी चोरून नेल्याचा प्रकार आव्हाणे येथे घडला आहे.३० सप्टेंबरपर्यंतच जिल्ह्यातील वाळूच्या ठेक्यांची मुदत होती. ही मुदत संपली असून नवीन ठेक्यांचे लिलाव अद्याप प्रशासनाकडून सुरुकरण्यात आलेले नाही. शासनाकडून सुरु असलेल्या रस्त्यांचे काम देखील बंद आहेत. दरम्यान, आव्हाणे येथे सिमेंट कॉँक्रीटच्या रस्त्यांचे कामे गेल्या तीन महिन्यांपासून सुरु आहे. २०० मीटरच्या रस्त्याचे काम तीन महिन्यांपासून सुरु असल्याने ग्रामस्थांनी संबधित मक्तेदाराला हे काम लवकर करण्याबाबत सूचना दिल्या. त्यानंतर मक्तेदाराने काही वाळू व्यावसायिकांकडून वाळू खरेदी केली. शुक्रवारी दुपारी पाच ते सहा डंपर वाळू काम सुरु असल्याचा ठिकाणी टाकण्यात आली होती. मात्र, रात्रभरातच काही माफियांनी रस्त्याचा कामासाठी टाकण्यात आलेली वाळू देखील लांबवली. त्यामुळे ‘चोरावर मोर शिरजोर’ असल्याचा प्रकार आव्हाणे येथे घडला आहे.तेरी भी चूप मेरी भी चूपसध्या वाळू ठेके बंद असल्याने आणलेली वाळू ही बेकायदेशिरच समजली जाणार आहे. त्यामुळे मक्तेदाराने चोरलेल्या वाळू बाबत तक्रार देखील केली नाही. या प्रकरणात मक्तेदारालाही चुप्पी साधतच बसावे लागले. दरम्यान, वाळू ठेके बंद असले तरी तरीही बांधकामे सुरु असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. गिरणा व तापी नदीला काही महिन्यांपासून प्रचंड पूर असल्याने वाळू उपसा पुर्णपणे बंद होता. मात्र, आता गिरणेतील पुराचे पाणी कमी झाल्यामुळे वाळू माफियांनी गिरणेचे पुन्हा लचके तोडायला सुरुवात झाली आहे.रात्रीच्या वेळेस कानळदा रस्त्यावरून जाणेही कठीणरात्री १० वाजेनंतर वाळू माफियांकडून वाळू उपसा करायला सुरुवात होते. पहाटे ६ वाजेपर्यंत प्रशासनाच्या नाकावर टीच्चून वाळू माफियांकडून सर्रासपणे वाळू उपसा केला जात आहे. आव्हाणे व निमखेडी भागातील गिरणा नदीपात्रात सर्वाधिक उपसा होत आहे. रात्री १० वाजेनंतर कानळदा रस्त्यालगत भरधाव वेगाने वाळूचे डंपर व ट्रॅक्टर धावत असल्याने सामान्य नागरिकांना या रस्त्यावरून वाहतूक करणे देखील मोठे जिकरीचे झाले आहे. महसूल प्रशासन मात्र या प्रकरणी आंधळेपणाचीच भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव