शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

अन् अनुभवांनी लिहिते झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 16:08 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘माझी लेखन प्रेरणा’ या सदरात लेखिका प्रा.डॉ.सुषमा तायडे (अहिरे) सांगताहेत आपल्या लिखाणामागील प्रेरणा...

असं म्हणतात की, वाचन, लेखन केल्याने आपले विचार सुधारतात. नवीन काही करण्याची प्रेरणा मिळते आणि मला असं वाटतं की, हे खरं आहे. ज्याचा त्याचा अनुभव वेगवेगळा असतो. जीवनात अनेक अनुभव येत असतात आणि त्यातून आपण खूप काही शिकत असतो. असे काही अनुभव माझ्याही आयुष्यात आले आणि मी लिहिते झाले.माझं शिक्षण मुंबईतलं. त्यामुळे जे शिक्षक आम्हाला शिकवायला होते, त्यांचा शिकवण्याचा प्रभाव माझ्यावर पडत होता. तसेच माझे आई-वडील दोन्ही सुशिक्षित असल्यामुळे वेळात वेळ काढून दोघं आम्हाला वाढण्याबरोबरच वाचनही करायचे. माझ्या वडिलांना विविध पुस्तकं वाचण्याचा छंद तर होताच; त्याचबरोबर वर्तमानपत्रातील शब्दकोडे सोडवण्याचा, ताबडतोब उत्तरे लिहिण्याचा छंद होता. त्यामुळे वेगवेगळी अनेक वर्तमानपत्रं घरी आणलेली असायची. साहजिकच आमच्या डोळ्याखालून ती पुस्तकं, वर्तमानपत्र जायची.पुढे महाविद्यायाचे शिक्षण सुरू झाल्यानंतर अभ्यासाला ‘रानातल्या कविता’ हा कविता संग्रह आणि ‘नटसम्राट’ हे नाटक होतं. त्या पुस्तकांनी तर मला जणू वेडच लावलं. कॉलेजमधील शिक्षकसुद्धा खूप छान शिकवायचे. तेथील शिक्षक शिंदे अािण शिक्षिका जोशी अजूनही माझ्या स्मरणात आहेत. ते काय शिकवायचे ते उतरवून घ्यायची मला सवय होती. त्यामुळे अतिशय लक्षपूर्वक मी ते ऐकत असायचे आणि घरी आल्यावर आणखीन सविस्तर लिहून काढायचे. त्यामुळे आपोआपच वाचनाची, लिखाणाची सवय जडली.पण खरी सवय लिखाणाची जी जडली ती लग्नानंतर ग्रॅज्युएशन पण पूर्ण झाले नाही आणि लग्न झाले. बऱ्याच वेळेला मी घरात एकटीच असायचे. एकत्र कुटुंब होतं. सर्व जण ज्याच्या त्याच्या कामासाठी बाहेर पडायचे. मी मग मला आलेले अनुभव कागदावर उतरवू लागले. असे लिहिता लिहिता एक डायरी पूर्ण भरली आणि एके दिवशी नकळत माझ्या पतीने ती वाचली. पुढे एक दिवसही कॉलेजला न जाता एम.ए. घरीच अभ्यास करून पूर्ण केले. एम.एड.केले. माझे पती म्हणाले, तुझ्या नावापुढे ‘डॉक्टर’ असे पाहायचे आहे. पीएच.डी.चा अभ्यास सुरू झाला. त्यानिमित्ताने अनेक पुस्तके वाचनात येऊन लिखाण सुरू झाले. सहा वर्षांचा कालावधी लागला पीएच.डी.ला. त्याच कालावधीत आम्ही काश्मीरला फिरायला गेलो, तेथील काही प्रसंग, त्या लोकांचे जीवन, सैनिकांचे श्रम ते माझ्या लक्षातच राहिले आणि आम्ही दोघांनी त्यावर खूप चर्चा केली. तेव्हा माझे पती म्हणाले, तू छान लिहितेस, मला माहीत आहे. हे प्रवासवर्णनही तू छान लिहू शकशील. त्यांच्या प्रोत्साहनाने मी ते प्रवासवर्णन लिहिले.ते एक प्रकारचे माझ्या लिखाणासाठी माझे पती, आई-वडिलांसोबत, शिक्षकांसोबत एक प्रेरणाच ठरली आणि अशाप्रकारे माझा लेखन प्रवास सुरू झाला....- प्रा.डॉ.सुषमा तायडे (अहिरे)

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव