शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

अन् अनुभवांनी लिहिते झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 16:08 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘माझी लेखन प्रेरणा’ या सदरात लेखिका प्रा.डॉ.सुषमा तायडे (अहिरे) सांगताहेत आपल्या लिखाणामागील प्रेरणा...

असं म्हणतात की, वाचन, लेखन केल्याने आपले विचार सुधारतात. नवीन काही करण्याची प्रेरणा मिळते आणि मला असं वाटतं की, हे खरं आहे. ज्याचा त्याचा अनुभव वेगवेगळा असतो. जीवनात अनेक अनुभव येत असतात आणि त्यातून आपण खूप काही शिकत असतो. असे काही अनुभव माझ्याही आयुष्यात आले आणि मी लिहिते झाले.माझं शिक्षण मुंबईतलं. त्यामुळे जे शिक्षक आम्हाला शिकवायला होते, त्यांचा शिकवण्याचा प्रभाव माझ्यावर पडत होता. तसेच माझे आई-वडील दोन्ही सुशिक्षित असल्यामुळे वेळात वेळ काढून दोघं आम्हाला वाढण्याबरोबरच वाचनही करायचे. माझ्या वडिलांना विविध पुस्तकं वाचण्याचा छंद तर होताच; त्याचबरोबर वर्तमानपत्रातील शब्दकोडे सोडवण्याचा, ताबडतोब उत्तरे लिहिण्याचा छंद होता. त्यामुळे वेगवेगळी अनेक वर्तमानपत्रं घरी आणलेली असायची. साहजिकच आमच्या डोळ्याखालून ती पुस्तकं, वर्तमानपत्र जायची.पुढे महाविद्यायाचे शिक्षण सुरू झाल्यानंतर अभ्यासाला ‘रानातल्या कविता’ हा कविता संग्रह आणि ‘नटसम्राट’ हे नाटक होतं. त्या पुस्तकांनी तर मला जणू वेडच लावलं. कॉलेजमधील शिक्षकसुद्धा खूप छान शिकवायचे. तेथील शिक्षक शिंदे अािण शिक्षिका जोशी अजूनही माझ्या स्मरणात आहेत. ते काय शिकवायचे ते उतरवून घ्यायची मला सवय होती. त्यामुळे अतिशय लक्षपूर्वक मी ते ऐकत असायचे आणि घरी आल्यावर आणखीन सविस्तर लिहून काढायचे. त्यामुळे आपोआपच वाचनाची, लिखाणाची सवय जडली.पण खरी सवय लिखाणाची जी जडली ती लग्नानंतर ग्रॅज्युएशन पण पूर्ण झाले नाही आणि लग्न झाले. बऱ्याच वेळेला मी घरात एकटीच असायचे. एकत्र कुटुंब होतं. सर्व जण ज्याच्या त्याच्या कामासाठी बाहेर पडायचे. मी मग मला आलेले अनुभव कागदावर उतरवू लागले. असे लिहिता लिहिता एक डायरी पूर्ण भरली आणि एके दिवशी नकळत माझ्या पतीने ती वाचली. पुढे एक दिवसही कॉलेजला न जाता एम.ए. घरीच अभ्यास करून पूर्ण केले. एम.एड.केले. माझे पती म्हणाले, तुझ्या नावापुढे ‘डॉक्टर’ असे पाहायचे आहे. पीएच.डी.चा अभ्यास सुरू झाला. त्यानिमित्ताने अनेक पुस्तके वाचनात येऊन लिखाण सुरू झाले. सहा वर्षांचा कालावधी लागला पीएच.डी.ला. त्याच कालावधीत आम्ही काश्मीरला फिरायला गेलो, तेथील काही प्रसंग, त्या लोकांचे जीवन, सैनिकांचे श्रम ते माझ्या लक्षातच राहिले आणि आम्ही दोघांनी त्यावर खूप चर्चा केली. तेव्हा माझे पती म्हणाले, तू छान लिहितेस, मला माहीत आहे. हे प्रवासवर्णनही तू छान लिहू शकशील. त्यांच्या प्रोत्साहनाने मी ते प्रवासवर्णन लिहिले.ते एक प्रकारचे माझ्या लिखाणासाठी माझे पती, आई-वडिलांसोबत, शिक्षकांसोबत एक प्रेरणाच ठरली आणि अशाप्रकारे माझा लेखन प्रवास सुरू झाला....- प्रा.डॉ.सुषमा तायडे (अहिरे)

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव