शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

चाचण्या वाढविण्याचे आदेश, मात्र एकाच लॅबवर भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. यात विशेषत: शहरात अधिक रुग्णवाढ गेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. यात विशेषत: शहरात अधिक रुग्णवाढ गेल्या आठवडाभरापासून समोर येत असताना आता चाचण्या वाढविण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत. मात्र, यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील एकाच तपासणी प्रयोगशाळेवर याचा भार येत असल्याने अहवालांना विलंब होत आहे.

रुग्णसंख्येच्या वीसपट चाचण्या करण्याचे आदेश आहेत. याचा अर्थ नियमित शंभर रुग्ण आढळून आल्यास किमान २००० चाचण्या होणे अपेक्षित आहेत. मात्र, जीएमसीतील प्रयोगशाळेतची क्षमता दिवसाला सरासरी ८०० स्वॅब तपासणीची आहे. त्यामुळे २००० चाचण्या नियमीत झाल्यास उर्वरित १२०० अहवाल प्रलंबित राहून पुढे हा आकडा वाढतच राहणार आहे. सद्यस्थितीत खासगी यंत्रणेची यात मदत घेतली जात नाही, एकमेव प्रयोगशाळेवर हा भार आहे. आरटीपीसीआरचे अहवाल येण्यास तीन दिवसांचा अवधी लागत आहे.

आठवडाभरात झालेल्या चाचण्या

जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ४५ हजार ७४९ कोरोना चाचण्या झालेल्या आहेत. यात गेल्या आठवडाभरात ६ हजार ८३८ चाचण्या झाल्या आहे. म्हणजे दिवसाला सरासरी ९३६ चाचण्या होत आहेत. हे प्रमाण वाढवून बाधितांना लवकर विलग करणे हे प्रशासनासमोरील मोठे आव्हान आहे. चाचण्या वाढल्या मात्र, प्रलंबित अहवालांची संख्याही ९४० वर गेलेली आहे. दिवसाला किमान पंधराशे चाचण्या करण्याचे नियोजन असल्याचे प्रशासनाकडून आधी सांगण्यात आले होते.

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर प्रश्नचिन्ह

कोरेानाचा पुन्हा संसर्ग वाढण्यामागे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व्यवस्थित होत नसल्याचे कारणही सांगितले जात आहे. आधी एका रुग्णामागे किमान ८ हायरिस्क कॉन्टॅक्टच्या तपासण्या होत होत्या. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून याकडे तेवढ्या गांभिर्याने लक्ष दिले गेले नाही. कुटुंबिय वगळता अन्य हायरिस्क कॉन्टॅक्टची सद्यस्थितीत टेस्ट होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव वाढतोय, असाही एक तर्क काढला जात आहे.