शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
2
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
3
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
4
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
5
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
6
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
7
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
8
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
12
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
13
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
14
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
15
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
16
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
17
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
18
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
19
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
20
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 

दीपनगरातील बंद संच सुरू करण्याचे आदेश

By admin | Updated: February 15, 2017 00:26 IST

राज्यातील विजेची मागणी वाढली : संच क्रमांक तीनमधून बुधवारपासून वीजनिर्मिती

भुसावळ : महाजेनकोच्या  दीपनगरातील जुन्या प्रकल्पातील सुमारे सहा-सात महिन्यांपासून बंद असलेला संच क्रमांक तीन तातडीने कार्यान्वित करून त्यातून वीजनिर्मिती करण्याचे आदेश शासनाच्या महावीज वितरण कंपनीकडून मंगळवारी प्राप्त झाले, अशी माहिती दीपनगर वीजनिर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता अभय हरणे यांनी दिली.दीपनगरातील जुन्या प्रकल्पातील बंद असलेले 210 मेगाव्ॉट क्षमतेचे दोन्ही संच वीजनिर्मितीसाठी सज्ज ठेवण्यात आले होते.   महावीज निर्मितीकडील  आदेशाची प्रतीक्षा होती. मंगळवारी महावीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयाकडून संच सुरू करण्याचे आदेश आले आहेत असे हरणे यांनी सांगितले.दरम्यान, तापमानात वाढ होत असल्याने राज्यातील विजेची मागणी सतत वाढत आहे. संच क्रमांक तीन हा आरएसडी स्थितीत गेल्या सहा महिन्यांपासून होता.  शासनाच्या महावीज निर्मितीची वीज केंद्र आणि खासगी उद्योगांपेक्षा स्वस्त आहे. ती 2 रुपये 91 पैसे युनिट या दराने उपलब्ध असता आपण एनटीपीसीची वीज 3 रुपये 24 पैसे युनिट या दराने खरेदी करीत असल्याची स्थिती आहे.वहन होताना नुकसानदरम्यान, एनटीपीसीची वीज घेताना व तिचे वहन होताना सुमारे 30 ते 35 टक्के विजेचे नुकसान होत असल्याची  जाणकारांची माहिती आहे.स्थापित क्षमतामहावीज निर्मितीची दररोजची वीज निर्मितीची स्थापित क्षमता 11 हजार 500 मेगाव्ॉट इतकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाराष्ट्रातील महाजेनकोची सात वीज निर्मिती केंद्र आणि जल, वायू आणि सौर ऊज्रेवरील सर्व वीजनिर्मिती प्रकल्प सुरू राहिल्यास महाराष्ट्रात स्वत:च्या मालकीची 11 हजार 500 मेगाव्ॉट वीज निर्मिती होऊ शकते. मात्र यासाठी सर्व संच सुरू असणे गरजेचे आहे.मुबलक पाण्याची सोयदीपनगर वीज निर्मिती केंद्रच मुळात तापीनदीच्या काठावर वसले आहे. पाण्याचा अहोरात्र स्त्रोत आहे. दीपनगरचा स्वत:चा बंधारा आहे शिवाय हे केंद्र आशिया महामार्गावर आहे. निवासांची सोय आहे. पुरेशा प्रमाणात कोळसा आहे. वीज केंद्रा र्पयत रेल्वे लाईनचे जाळे आहे आणि वीजेची मागणी आहे,असे असताना वीज निर्मिती संच बंद ठेवू नये,अशी भावना या भागातील रहिवाशांनी व्यक्त केली आहे. वीज संच बंदमुळे     रोजगाराचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे, अशीही कामगारांची भावना आहे.दीपनगर वीज निर्मिती प्रकल्पावर सुमारे पाच हजार कुटुंबीयांचा चरितार्थ अवलंबून आहे. संच पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याची गरज आहे.  (प्रतिनिधी)महावितरणकडून मिळाली सूचना4आरएसडी (रिझव्र्ह शटडाऊन) स्थितीत गेल्या सात-आठ महिन्यांपासून असलेला जुन्या प्रकल्पातील संच क्रमांक 3 तातडीने सुरू करण्याची सूचना मंगळवारी दीपनगर येथील प्रशासनाला प्राप्त झाली. त्यामुळे हा संच वीजनिर्मितीसाठी सुरू करण्यात आला. बुधवारी दुपारी 12 वाजेर्पयत या संचातून वीजनिर्मिती सुरू होईल, असे सूत्रांनी सांगितले. आता हा संच कार्यान्वित करण्यात आला आहे.बुधवार्पयत तो सुरळीत होईल, असेही सूत्र म्हणाले.मंगळवारी राज्याची विजेची मागणी तब्बल 20 हजार  मेगाव्ॉट इतकी असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.  शासनाच्या महावीज निर्मितीची मंगळवारी  6 हजार 854 इतकी वीज निर्मिती होती. यात  खाजगी उद्योगांची  3 हजार 146 आणि केंद्राची (एनटीपीसी)  6 हजार 791 मेगाव्ॉट अशी वीज वापरुन महाराष्ट्राची विजेची मागणी पूर्ण केली जात आहे.2.75 लाख मे.टन कोळशाचा साठा.. दीपनगरातील नवीन प्रकल्पातील 500 मेगाव्ॉट क्षमतेच्या दोन्ही संचातून मंगळवारी 508 आणि 509 मेगाव्ॉट म्हणजे 117 मेगाव्ॉट वीजनिर्मिती सुरू आहे. दरम्यान, दीपनगर प्रशासनाकडे मंगळवारी 2.75 लाख मे.टन इतका कोळसा शिल्लक असल्याची माहिती दीपनगरातील अधिकृत सूत्रांनी दिली.दीपनगरातील संच क्रमांक तीन कार्यान्वित करण्याचा आदेश महावीज वितरणकडून प्राप्त झाला आहे. त्यानुसार हा संच सुरू करण्याची प्रक्रिया मंगळवारपासूनच सुरू करण्यात आली आहे. बुधवारपासून वीजनिर्मिती सुरू होईल. राज्यातील विजेची मागणी वाढली आहे.- अभय हरणे, मुख्य अभियंता, दीपनगर, वीजनिर्मिती केंद्र.