शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

दीपनगरातील बंद संच सुरू करण्याचे आदेश

By admin | Updated: February 15, 2017 00:26 IST

राज्यातील विजेची मागणी वाढली : संच क्रमांक तीनमधून बुधवारपासून वीजनिर्मिती

भुसावळ : महाजेनकोच्या  दीपनगरातील जुन्या प्रकल्पातील सुमारे सहा-सात महिन्यांपासून बंद असलेला संच क्रमांक तीन तातडीने कार्यान्वित करून त्यातून वीजनिर्मिती करण्याचे आदेश शासनाच्या महावीज वितरण कंपनीकडून मंगळवारी प्राप्त झाले, अशी माहिती दीपनगर वीजनिर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता अभय हरणे यांनी दिली.दीपनगरातील जुन्या प्रकल्पातील बंद असलेले 210 मेगाव्ॉट क्षमतेचे दोन्ही संच वीजनिर्मितीसाठी सज्ज ठेवण्यात आले होते.   महावीज निर्मितीकडील  आदेशाची प्रतीक्षा होती. मंगळवारी महावीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयाकडून संच सुरू करण्याचे आदेश आले आहेत असे हरणे यांनी सांगितले.दरम्यान, तापमानात वाढ होत असल्याने राज्यातील विजेची मागणी सतत वाढत आहे. संच क्रमांक तीन हा आरएसडी स्थितीत गेल्या सहा महिन्यांपासून होता.  शासनाच्या महावीज निर्मितीची वीज केंद्र आणि खासगी उद्योगांपेक्षा स्वस्त आहे. ती 2 रुपये 91 पैसे युनिट या दराने उपलब्ध असता आपण एनटीपीसीची वीज 3 रुपये 24 पैसे युनिट या दराने खरेदी करीत असल्याची स्थिती आहे.वहन होताना नुकसानदरम्यान, एनटीपीसीची वीज घेताना व तिचे वहन होताना सुमारे 30 ते 35 टक्के विजेचे नुकसान होत असल्याची  जाणकारांची माहिती आहे.स्थापित क्षमतामहावीज निर्मितीची दररोजची वीज निर्मितीची स्थापित क्षमता 11 हजार 500 मेगाव्ॉट इतकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाराष्ट्रातील महाजेनकोची सात वीज निर्मिती केंद्र आणि जल, वायू आणि सौर ऊज्रेवरील सर्व वीजनिर्मिती प्रकल्प सुरू राहिल्यास महाराष्ट्रात स्वत:च्या मालकीची 11 हजार 500 मेगाव्ॉट वीज निर्मिती होऊ शकते. मात्र यासाठी सर्व संच सुरू असणे गरजेचे आहे.मुबलक पाण्याची सोयदीपनगर वीज निर्मिती केंद्रच मुळात तापीनदीच्या काठावर वसले आहे. पाण्याचा अहोरात्र स्त्रोत आहे. दीपनगरचा स्वत:चा बंधारा आहे शिवाय हे केंद्र आशिया महामार्गावर आहे. निवासांची सोय आहे. पुरेशा प्रमाणात कोळसा आहे. वीज केंद्रा र्पयत रेल्वे लाईनचे जाळे आहे आणि वीजेची मागणी आहे,असे असताना वीज निर्मिती संच बंद ठेवू नये,अशी भावना या भागातील रहिवाशांनी व्यक्त केली आहे. वीज संच बंदमुळे     रोजगाराचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे, अशीही कामगारांची भावना आहे.दीपनगर वीज निर्मिती प्रकल्पावर सुमारे पाच हजार कुटुंबीयांचा चरितार्थ अवलंबून आहे. संच पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याची गरज आहे.  (प्रतिनिधी)महावितरणकडून मिळाली सूचना4आरएसडी (रिझव्र्ह शटडाऊन) स्थितीत गेल्या सात-आठ महिन्यांपासून असलेला जुन्या प्रकल्पातील संच क्रमांक 3 तातडीने सुरू करण्याची सूचना मंगळवारी दीपनगर येथील प्रशासनाला प्राप्त झाली. त्यामुळे हा संच वीजनिर्मितीसाठी सुरू करण्यात आला. बुधवारी दुपारी 12 वाजेर्पयत या संचातून वीजनिर्मिती सुरू होईल, असे सूत्रांनी सांगितले. आता हा संच कार्यान्वित करण्यात आला आहे.बुधवार्पयत तो सुरळीत होईल, असेही सूत्र म्हणाले.मंगळवारी राज्याची विजेची मागणी तब्बल 20 हजार  मेगाव्ॉट इतकी असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.  शासनाच्या महावीज निर्मितीची मंगळवारी  6 हजार 854 इतकी वीज निर्मिती होती. यात  खाजगी उद्योगांची  3 हजार 146 आणि केंद्राची (एनटीपीसी)  6 हजार 791 मेगाव्ॉट अशी वीज वापरुन महाराष्ट्राची विजेची मागणी पूर्ण केली जात आहे.2.75 लाख मे.टन कोळशाचा साठा.. दीपनगरातील नवीन प्रकल्पातील 500 मेगाव्ॉट क्षमतेच्या दोन्ही संचातून मंगळवारी 508 आणि 509 मेगाव्ॉट म्हणजे 117 मेगाव्ॉट वीजनिर्मिती सुरू आहे. दरम्यान, दीपनगर प्रशासनाकडे मंगळवारी 2.75 लाख मे.टन इतका कोळसा शिल्लक असल्याची माहिती दीपनगरातील अधिकृत सूत्रांनी दिली.दीपनगरातील संच क्रमांक तीन कार्यान्वित करण्याचा आदेश महावीज वितरणकडून प्राप्त झाला आहे. त्यानुसार हा संच सुरू करण्याची प्रक्रिया मंगळवारपासूनच सुरू करण्यात आली आहे. बुधवारपासून वीजनिर्मिती सुरू होईल. राज्यातील विजेची मागणी वाढली आहे.- अभय हरणे, मुख्य अभियंता, दीपनगर, वीजनिर्मिती केंद्र.