शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
3
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
4
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
5
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
6
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
7
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
8
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
9
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
11
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
12
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
13
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
14
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
15
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
16
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
17
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
18
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
19
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
20
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

दीपनगरातील बंद संच सुरू करण्याचे आदेश

By admin | Updated: February 15, 2017 00:26 IST

राज्यातील विजेची मागणी वाढली : संच क्रमांक तीनमधून बुधवारपासून वीजनिर्मिती

भुसावळ : महाजेनकोच्या  दीपनगरातील जुन्या प्रकल्पातील सुमारे सहा-सात महिन्यांपासून बंद असलेला संच क्रमांक तीन तातडीने कार्यान्वित करून त्यातून वीजनिर्मिती करण्याचे आदेश शासनाच्या महावीज वितरण कंपनीकडून मंगळवारी प्राप्त झाले, अशी माहिती दीपनगर वीजनिर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता अभय हरणे यांनी दिली.दीपनगरातील जुन्या प्रकल्पातील बंद असलेले 210 मेगाव्ॉट क्षमतेचे दोन्ही संच वीजनिर्मितीसाठी सज्ज ठेवण्यात आले होते.   महावीज निर्मितीकडील  आदेशाची प्रतीक्षा होती. मंगळवारी महावीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयाकडून संच सुरू करण्याचे आदेश आले आहेत असे हरणे यांनी सांगितले.दरम्यान, तापमानात वाढ होत असल्याने राज्यातील विजेची मागणी सतत वाढत आहे. संच क्रमांक तीन हा आरएसडी स्थितीत गेल्या सहा महिन्यांपासून होता.  शासनाच्या महावीज निर्मितीची वीज केंद्र आणि खासगी उद्योगांपेक्षा स्वस्त आहे. ती 2 रुपये 91 पैसे युनिट या दराने उपलब्ध असता आपण एनटीपीसीची वीज 3 रुपये 24 पैसे युनिट या दराने खरेदी करीत असल्याची स्थिती आहे.वहन होताना नुकसानदरम्यान, एनटीपीसीची वीज घेताना व तिचे वहन होताना सुमारे 30 ते 35 टक्के विजेचे नुकसान होत असल्याची  जाणकारांची माहिती आहे.स्थापित क्षमतामहावीज निर्मितीची दररोजची वीज निर्मितीची स्थापित क्षमता 11 हजार 500 मेगाव्ॉट इतकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाराष्ट्रातील महाजेनकोची सात वीज निर्मिती केंद्र आणि जल, वायू आणि सौर ऊज्रेवरील सर्व वीजनिर्मिती प्रकल्प सुरू राहिल्यास महाराष्ट्रात स्वत:च्या मालकीची 11 हजार 500 मेगाव्ॉट वीज निर्मिती होऊ शकते. मात्र यासाठी सर्व संच सुरू असणे गरजेचे आहे.मुबलक पाण्याची सोयदीपनगर वीज निर्मिती केंद्रच मुळात तापीनदीच्या काठावर वसले आहे. पाण्याचा अहोरात्र स्त्रोत आहे. दीपनगरचा स्वत:चा बंधारा आहे शिवाय हे केंद्र आशिया महामार्गावर आहे. निवासांची सोय आहे. पुरेशा प्रमाणात कोळसा आहे. वीज केंद्रा र्पयत रेल्वे लाईनचे जाळे आहे आणि वीजेची मागणी आहे,असे असताना वीज निर्मिती संच बंद ठेवू नये,अशी भावना या भागातील रहिवाशांनी व्यक्त केली आहे. वीज संच बंदमुळे     रोजगाराचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे, अशीही कामगारांची भावना आहे.दीपनगर वीज निर्मिती प्रकल्पावर सुमारे पाच हजार कुटुंबीयांचा चरितार्थ अवलंबून आहे. संच पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याची गरज आहे.  (प्रतिनिधी)महावितरणकडून मिळाली सूचना4आरएसडी (रिझव्र्ह शटडाऊन) स्थितीत गेल्या सात-आठ महिन्यांपासून असलेला जुन्या प्रकल्पातील संच क्रमांक 3 तातडीने सुरू करण्याची सूचना मंगळवारी दीपनगर येथील प्रशासनाला प्राप्त झाली. त्यामुळे हा संच वीजनिर्मितीसाठी सुरू करण्यात आला. बुधवारी दुपारी 12 वाजेर्पयत या संचातून वीजनिर्मिती सुरू होईल, असे सूत्रांनी सांगितले. आता हा संच कार्यान्वित करण्यात आला आहे.बुधवार्पयत तो सुरळीत होईल, असेही सूत्र म्हणाले.मंगळवारी राज्याची विजेची मागणी तब्बल 20 हजार  मेगाव्ॉट इतकी असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.  शासनाच्या महावीज निर्मितीची मंगळवारी  6 हजार 854 इतकी वीज निर्मिती होती. यात  खाजगी उद्योगांची  3 हजार 146 आणि केंद्राची (एनटीपीसी)  6 हजार 791 मेगाव्ॉट अशी वीज वापरुन महाराष्ट्राची विजेची मागणी पूर्ण केली जात आहे.2.75 लाख मे.टन कोळशाचा साठा.. दीपनगरातील नवीन प्रकल्पातील 500 मेगाव्ॉट क्षमतेच्या दोन्ही संचातून मंगळवारी 508 आणि 509 मेगाव्ॉट म्हणजे 117 मेगाव्ॉट वीजनिर्मिती सुरू आहे. दरम्यान, दीपनगर प्रशासनाकडे मंगळवारी 2.75 लाख मे.टन इतका कोळसा शिल्लक असल्याची माहिती दीपनगरातील अधिकृत सूत्रांनी दिली.दीपनगरातील संच क्रमांक तीन कार्यान्वित करण्याचा आदेश महावीज वितरणकडून प्राप्त झाला आहे. त्यानुसार हा संच सुरू करण्याची प्रक्रिया मंगळवारपासूनच सुरू करण्यात आली आहे. बुधवारपासून वीजनिर्मिती सुरू होईल. राज्यातील विजेची मागणी वाढली आहे.- अभय हरणे, मुख्य अभियंता, दीपनगर, वीजनिर्मिती केंद्र.