शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
3
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
4
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
5
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
6
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
7
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
8
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
9
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
10
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
11
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
12
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
13
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
14
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
15
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
16
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
17
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
18
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
19
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
20
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

... तरच भाजपासोबत जाण्याचा विचार करेल, अबू आझमी यांचा दावा

By अमित महाबळ | Updated: March 7, 2024 14:31 IST

भाजपाकडून कधी सोबत येण्याविषयी आमंत्रण आले नाही का ? यावरील प्रश्नावर बोलताना अबू आझमी म्हणाले, की एकदा नव्हे दोनदा बोलावणे आले आले आहे.

जळगाव : भाजपाने त्यांच्यासोबत येण्याचे एकदा नव्हे दोनदा मला आमंत्रण दिले मात्र, ते जेव्हा आमच्या अटी-शर्ती मान्य करतील तेव्हाच त्यांच्या सोबत जाण्याचा विचार करता येईल, असे प्रतिपादन समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार आबू आझमी यांनी गुरुवारी (दि.७) जळगावच्या अजिंठा विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.

भाजपाकडून कधी सोबत येण्याविषयी आमंत्रण आले नाही का ? यावरील प्रश्नावर बोलताना अबू आझमी म्हणाले, की एकदा नव्हे दोनदा बोलावणे आले आले आहे. मात्र, त्यांनी सर्वात आधी महात्मा गांधींबद्दल चुकीचे बोलणे, त्यांच्या खुन्याचे कौतुक करणे बंद करावे. त्यांच्या सरकारमध्ये एकही मंत्री मुस्लिम नाही, मुस्लिमांनाही त्यांचा हिस्सा मिळायला हवा. त्यांनाही आपला परिवार म्हणून माना. या अटी-शर्ती मानल्या तरच सोबत जाण्याचा प्रस्तावावर विचार केला जाईल, असेही आझमी म्हणाले.

पक्षाच्या वतीने संविधान बचाव, देश बचाव मोहीम राबविली जात आहे. त्याची शेवटची सभा गुरुवारी जामनेरला होती. याशिवाय पक्षाच्या कार्यालयाचे व शाखांचे उद्घाटन आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आदींचेही आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी आझमी हे जळगावला आले होते. त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना देशातील सध्याच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. जुलै २०२३ पासून ३ हजार शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. दुसरीकडे कॉर्पोरट कंपन्यांना १४ लाख कोटी रुपये माफ करण्यात आले आहेत. हा पैसा शेतकऱ्यांना दिला असता, तर त्यांची स्थिती सुधारली असती पण सरकार लक्ष देत नाही. देशात प्रत्येक तासाला महिलांबाबत ५ तर लहान मुलांबाबत २ गुन्हे घडतात. सरकार हेट स्पीचचे प्रकार रोखू शकलेले नाही, असेही आझमी म्हणाले.

१८ व्या वर्षी सरकार निवडतात मग लग्न का नाही?

देशातील १८ वर्षे पूर्ण मुले, मुली मतदानाद्वारे आपले सरकार निवडून आणतात. मग त्यांना लग्नाचा अधिकार का नसावा ? त्यासाठी २१ वर्षे वयाची अट कशासाठी हवी ? यातून उद्भवलेली लिव्ह इनची समस्या संपायला हवी असाही मुद्दा आझमी यांनी मांडला.