शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

... तरच भाजपासोबत जाण्याचा विचार करेल, अबू आझमी यांचा दावा

By अमित महाबळ | Updated: March 7, 2024 14:31 IST

भाजपाकडून कधी सोबत येण्याविषयी आमंत्रण आले नाही का ? यावरील प्रश्नावर बोलताना अबू आझमी म्हणाले, की एकदा नव्हे दोनदा बोलावणे आले आले आहे.

जळगाव : भाजपाने त्यांच्यासोबत येण्याचे एकदा नव्हे दोनदा मला आमंत्रण दिले मात्र, ते जेव्हा आमच्या अटी-शर्ती मान्य करतील तेव्हाच त्यांच्या सोबत जाण्याचा विचार करता येईल, असे प्रतिपादन समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार आबू आझमी यांनी गुरुवारी (दि.७) जळगावच्या अजिंठा विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.

भाजपाकडून कधी सोबत येण्याविषयी आमंत्रण आले नाही का ? यावरील प्रश्नावर बोलताना अबू आझमी म्हणाले, की एकदा नव्हे दोनदा बोलावणे आले आले आहे. मात्र, त्यांनी सर्वात आधी महात्मा गांधींबद्दल चुकीचे बोलणे, त्यांच्या खुन्याचे कौतुक करणे बंद करावे. त्यांच्या सरकारमध्ये एकही मंत्री मुस्लिम नाही, मुस्लिमांनाही त्यांचा हिस्सा मिळायला हवा. त्यांनाही आपला परिवार म्हणून माना. या अटी-शर्ती मानल्या तरच सोबत जाण्याचा प्रस्तावावर विचार केला जाईल, असेही आझमी म्हणाले.

पक्षाच्या वतीने संविधान बचाव, देश बचाव मोहीम राबविली जात आहे. त्याची शेवटची सभा गुरुवारी जामनेरला होती. याशिवाय पक्षाच्या कार्यालयाचे व शाखांचे उद्घाटन आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आदींचेही आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी आझमी हे जळगावला आले होते. त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना देशातील सध्याच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. जुलै २०२३ पासून ३ हजार शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. दुसरीकडे कॉर्पोरट कंपन्यांना १४ लाख कोटी रुपये माफ करण्यात आले आहेत. हा पैसा शेतकऱ्यांना दिला असता, तर त्यांची स्थिती सुधारली असती पण सरकार लक्ष देत नाही. देशात प्रत्येक तासाला महिलांबाबत ५ तर लहान मुलांबाबत २ गुन्हे घडतात. सरकार हेट स्पीचचे प्रकार रोखू शकलेले नाही, असेही आझमी म्हणाले.

१८ व्या वर्षी सरकार निवडतात मग लग्न का नाही?

देशातील १८ वर्षे पूर्ण मुले, मुली मतदानाद्वारे आपले सरकार निवडून आणतात. मग त्यांना लग्नाचा अधिकार का नसावा ? त्यासाठी २१ वर्षे वयाची अट कशासाठी हवी ? यातून उद्भवलेली लिव्ह इनची समस्या संपायला हवी असाही मुद्दा आझमी यांनी मांडला.