शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

नद्यांचे ‘काठ’वाचले, तरच नद्या जिवंत राहतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 12:55 IST

-दिग्दर्शक संदीप सावंत

ठळक मुद्देसमाजप्रबोधन करणाऱ्या चांगल्या चित्रपटांच्या निर्मितीसाठी शासनाने अनुदान द्यावे

सचिन देव ।जळगाव : नद्या शेजारी असणाऱ्या नागरिकांचे जीवन आजही नद्यावरच अवलंबून आहे. मात्र कालांतराने नवीन वसाहती किंवा शहरांच्या विकासासाठी नद्यांमध्ये अतिक्रमण केले जात आहे. नद्यांचे काठच शिल्लक राहिलेले नाहीत. यामुळे भविष्यात उद्भवणाºया गंभीर परिणामांना मानवालाच सामोरे जावे लागणार आहे. हे परिणाम टाळण्यासाठी नद्यांचे काठ वाचले पाहिजे, तरच नद्या जिवंत राहतील, असे मत ‘नदी वाहते’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप सावंत यांनी ‘लोकमत’शी बोलतांना व्यक्त केले.शासनाने समाज प्रबोधन करणाºया चित्रपटांच्या निर्मितीसाठी अनुदान देण्याची अपेक्षाही सावंत यांनी यावेळी व्यक्त केली. जळगावात समर्पण संस्था, आयोजित पहिल्या आशियाई चित्रपट महोत्सवाला १ फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली. या महोत्सवाचे उद्घाटन करण्यासाठी आॅस्कर पुरस्काराने गौरविलेल्या ‘श्वास’ चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप सावंत जळगावी आले असता, ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.प्रश्न : मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत, हा बदल कशामुळे घडला.उत्तर : हिंदी चित्रपटांप्रमाणे मराठी चित्रपटांमध्ये वेगवेगळे बदल व संशोधन घडत आहे. विशेष म्हणजे माझ्या ‘श्वास’ या चित्रपटाला आॅस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर हा बदल झाला.दिग्दर्शकांतर्फे प्रेक्षकांच्या अभिरुचीला उतरतील असे चित्रपट येत असल्यामुळे, सध्या मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत.प्रश्न : ‘श्वास’ चित्रपटाचे कथानक कसे सुचले.उत्तर : पुण्याच्या माधवी घारपुरे यांनी लिहलेली १० त १२ पुस्तके मला वाचायला दिली होती. त्यातील एका पुस्तकामध्ये माधवी घारपुरे यांनी सत्य घटनेवर आधारीत एका प्रसंगाची कथा लिहली आहे. ती कथा वाचल्यानंतर, डॉ.शैलेश पुणतांबेकर यांच्या रुग्णालयातील घडलेला तो प्रसंग होता. त्यांच्याकडुन सविस्तर माहिती घेऊन,‘श्वास ’ हा चित्रपट तयार केला.प्रश्न : चित्रपटासाठी लागणारा खर्च पाहता, शासनाकडुन पुरेसे अनुदान मिळते का.उत्तर : शासनाने अलीकडेच मराठी चित्रपटांच्या अनुदानात वाढ केली आहे. ३० ते ४० लाखांपर्यंत अनुदान मिळते.विशेष म्हणजे त्या-त्या चित्रपटाच्या बजेटनुसार अनुदान मिळत असते. त्यामुळे शासनाचे अनुदान खर्च पाहता योग्य आहे. मात्र, शासनाने निव्वळ टाईमपास चित्रपटांना अनुदान देणे बंद करावे. जे चित्रपट खरोखर चांगले आहेत, समाजप्रबोधन करणारे आहेत, अशा चित्रपटांच्या निर्मितीसाठी शासनाने मदत करावी.प्रश्न : ‘नदी वाहते’ या चित्रपटात कुठल्याही नायिकेचे पात्र नाही, तरी हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे, याचे वैशिष्य काय.उत्तर : या चित्रपटाच्या मुख्य भुमिकेत आहे ती ‘अंती’ नावाची नदी. नदी बोलू तर शकत नाही, मात्र तिच्या खळखळत्या पात्रांचे दिसणारे दर्शन प्रेक्षकांशी संवाद साधत राहते. या नदी भोवतीचा सारी कथा फिरत असल्याने, हा चित्रपट खºया अर्थाने प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे.

टॅग्स :interviewमुलाखत