शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
3
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
4
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
5
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
6
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
7
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
8
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
9
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
10
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
11
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
12
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
13
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
14
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
15
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
16
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
17
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
18
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
19
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
20
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!

नद्यांचे ‘काठ’वाचले, तरच नद्या जिवंत राहतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 12:55 IST

-दिग्दर्शक संदीप सावंत

ठळक मुद्देसमाजप्रबोधन करणाऱ्या चांगल्या चित्रपटांच्या निर्मितीसाठी शासनाने अनुदान द्यावे

सचिन देव ।जळगाव : नद्या शेजारी असणाऱ्या नागरिकांचे जीवन आजही नद्यावरच अवलंबून आहे. मात्र कालांतराने नवीन वसाहती किंवा शहरांच्या विकासासाठी नद्यांमध्ये अतिक्रमण केले जात आहे. नद्यांचे काठच शिल्लक राहिलेले नाहीत. यामुळे भविष्यात उद्भवणाºया गंभीर परिणामांना मानवालाच सामोरे जावे लागणार आहे. हे परिणाम टाळण्यासाठी नद्यांचे काठ वाचले पाहिजे, तरच नद्या जिवंत राहतील, असे मत ‘नदी वाहते’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप सावंत यांनी ‘लोकमत’शी बोलतांना व्यक्त केले.शासनाने समाज प्रबोधन करणाºया चित्रपटांच्या निर्मितीसाठी अनुदान देण्याची अपेक्षाही सावंत यांनी यावेळी व्यक्त केली. जळगावात समर्पण संस्था, आयोजित पहिल्या आशियाई चित्रपट महोत्सवाला १ फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली. या महोत्सवाचे उद्घाटन करण्यासाठी आॅस्कर पुरस्काराने गौरविलेल्या ‘श्वास’ चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप सावंत जळगावी आले असता, ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.प्रश्न : मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत, हा बदल कशामुळे घडला.उत्तर : हिंदी चित्रपटांप्रमाणे मराठी चित्रपटांमध्ये वेगवेगळे बदल व संशोधन घडत आहे. विशेष म्हणजे माझ्या ‘श्वास’ या चित्रपटाला आॅस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर हा बदल झाला.दिग्दर्शकांतर्फे प्रेक्षकांच्या अभिरुचीला उतरतील असे चित्रपट येत असल्यामुळे, सध्या मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत.प्रश्न : ‘श्वास’ चित्रपटाचे कथानक कसे सुचले.उत्तर : पुण्याच्या माधवी घारपुरे यांनी लिहलेली १० त १२ पुस्तके मला वाचायला दिली होती. त्यातील एका पुस्तकामध्ये माधवी घारपुरे यांनी सत्य घटनेवर आधारीत एका प्रसंगाची कथा लिहली आहे. ती कथा वाचल्यानंतर, डॉ.शैलेश पुणतांबेकर यांच्या रुग्णालयातील घडलेला तो प्रसंग होता. त्यांच्याकडुन सविस्तर माहिती घेऊन,‘श्वास ’ हा चित्रपट तयार केला.प्रश्न : चित्रपटासाठी लागणारा खर्च पाहता, शासनाकडुन पुरेसे अनुदान मिळते का.उत्तर : शासनाने अलीकडेच मराठी चित्रपटांच्या अनुदानात वाढ केली आहे. ३० ते ४० लाखांपर्यंत अनुदान मिळते.विशेष म्हणजे त्या-त्या चित्रपटाच्या बजेटनुसार अनुदान मिळत असते. त्यामुळे शासनाचे अनुदान खर्च पाहता योग्य आहे. मात्र, शासनाने निव्वळ टाईमपास चित्रपटांना अनुदान देणे बंद करावे. जे चित्रपट खरोखर चांगले आहेत, समाजप्रबोधन करणारे आहेत, अशा चित्रपटांच्या निर्मितीसाठी शासनाने मदत करावी.प्रश्न : ‘नदी वाहते’ या चित्रपटात कुठल्याही नायिकेचे पात्र नाही, तरी हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे, याचे वैशिष्य काय.उत्तर : या चित्रपटाच्या मुख्य भुमिकेत आहे ती ‘अंती’ नावाची नदी. नदी बोलू तर शकत नाही, मात्र तिच्या खळखळत्या पात्रांचे दिसणारे दर्शन प्रेक्षकांशी संवाद साधत राहते. या नदी भोवतीचा सारी कथा फिरत असल्याने, हा चित्रपट खºया अर्थाने प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे.

टॅग्स :interviewमुलाखत