शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

केवळ गट-तट वाढले, शहर आहे तिथेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 11:57 IST

मनपात भाजपची द्विवर्षपूर्ती : वर्षभरात चेहरा बदलण्याचे आश्वासन विरले हवेत

जळगाव : मनपात सत्तेवर असलेल्या भाजपला गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत शहराला विकासाच्या वाटेवर नेता आले नाही. भाजपला एक हाती सत्ता मिळवूनही शहराला त्याचा काहीच फायदा झाला नाही. उलट सत्ताधारी भाजपतच गट- तट निर्माण झाले आहे आणि त्याचा फटका शहर विकासला बसला. अनेक कोटींचा निधी आला पण त्याचा साधा विनियोगही सत्ताधाऱ्यांना करता आला नाही. परिणामी दोन वर्षापूर्वी जी परिस्थिती होती ती आजही कायम आहे.

भाजपने जळगाव मनपात मिळविलेल्या ऐतिहासिक आणि एकहाती विजयास ३ आॅगस्ट रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपला सत्ता दिल्यास एक वर्षात शहराचा चेहरामोहरा बदलून दाखवू, अशी गर्जना केली होती. परंतु राज्यात त्यांचीच असलेली सत्ता गेली त्यामुळे हे नेहमीप्रमाणे केवळ आश्वासनच ठरले.

२०१८ मध्ये झालेल्या मनपा निवडणुकीत भाजपचे पहिल्यांदाच ५७ नगरसेवक विजयी झाले होते. यापूर्वी भाजपचा काही काळ सत्तेत सहभाग राहिला आहे. यापूर्वी भाजपचे डॉ. के.डी.पाटील लोकनियुक्त नगराध्यक्ष झाले. दोन वर्षापूर्वी राज्यात भाजपच्या बाजूने जोरदार वारे वाहत होते. त्यात जळगाव मनपाची जबाबदारी तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपविण्यात आली. सर्व सुकाणू आपल्या हातात घेऊन महाजन यांनी हा ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

सुरुवातीला महापौरपदासाठी ११ महिन्याचा कालावधी ठरविण्यात आला. पहिल्या वर्षी महापौर म्हणून आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे यांची निवड झाली. यानंतर आता भारती कैलास सोनवणे ह्या महापौर आहेत. निवडणुकीपूर्वी जळगावात अनेकांनी भाजपची वाट धरली. अनेक नगरसेवकांना इतर पक्षातून भाजपात आणले गेले. काही जण स्वत:हून आले. यामुळे भाजप नगरसेवकांची संख्या थेट ५७ वर पोहचली. सत्ता मिळाली पण आज याच नगरसेवकांचे आता गट- तट निर्माण झाले आहेत. या सर्वाची तोंडे वेगवेगळ्या दिशेला असल्याची टीका होत असते.यामुळेच की काय शासनाने दिलेले १०० कोटी रुपये अजूनही खर्च होवू शकले नाहीत. यासाठी निविदांचा बाजार मांडला जात आहे. या निविदाही आपल्याला मिळाव्यात, यासाठी खटाटोप केला जात आहे. तिसºयाला मिळाल्या तर निविदा पुन्हा काढल्या जात आहेत. पण हा सर्व खेळ नागरिकांच्या जीवाशी सुरु आहे.एक वर्ष कशासाठी-निवडणुकीपूर्वी गिरीश महाजन यांनी एक वर्षात शहराचा चेहरा- मोहरा बदलून दाखवेल, असे आश्वासन दिले होते. यानंतर गेल्या वर्षी ३ आॅगस्ट २०१९ रोजी रोटरीतर्फे आयोजित चर्चासत्रात आमदार सुरेश भोळे यांनी शहरच्या विकासासाठी आपणास एक वर्ष द्या म्हणून अट घातली. दोघांनीही एक-एक वर्ष मागितले, यात दोन वर्षे गेली पण शहराचा विकास जैथे थेच आहे. किमान आता पुढच्या एक वर्षात तरी सत्ताधाऱ्यांना जाग यावी, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. शहरात सुरु असलेली विकास कामे थांबली आहेत. पण त्याविषयी सत्ताधारी काहीच बोलायला आणि कार्यवाही करण्यासाठी तयार नाहीत, शहरासाठी ही दुर्देवाची बाब आहे. या दोन वर्षाच्या पार्श्वभूमीवर आता सोशल मीडीयावरही सत्ताधाºयांविषयी टिंगलटवाळी सुरु झाली आहे.‘क्या हुआ तेरा वादा...’शिवसेनेने तर क्या हुआ तेरा वादा असा फलक सोशल मीडीयावर झळकविला आहे. यात वर्षभरात विकास केला नाही तर विधानसभेत मते मागणार नाही, असे गिरीश महाजन म्हणाल्याचा त्यात उल्लेख आहे. भाऊ, मामा जरा यावरही बोला असे सांगत कामांची जंत्रीच देण्यात आली आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव