शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

८० तासाच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात फडणवीस यांचा एकच निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 22:37 IST

जळगाव : राज्यात देवेंद्र फडणवीस सरकारने ८० तासांच्या कालावधीत केवळ अधिवेशन बोलविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. जळगावातील ...

जळगाव : राज्यात देवेंद्र फडणवीस सरकारने ८० तासांच्या कालावधीत केवळ अधिवेशन बोलविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. जळगावातील माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता यांना माहिती अधिकारात ही माहिती देण्यात आली आहे.राष्टÑवादीचे अजित पवार यांनी पाठिंबा दिल्यानंतर पहाटेच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र हे सरकार केवळ ८० तास टिकले. मात्र या ८० तासांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात फडणवीस यांनी केंद्राकडून आलेला हजारो कोटींचा निधी परत केल्याचा आरोप सुरू झाला होता. तर फडणवीस यांनी त्याचा इन्कार केला होता. याबाबत दीपक गुप्ता यांनी १२ डिसेंबर २०१९ रोजी आॅनलाईन माहिती अधिकार अर्ज सादर केला होता.यात राज्याच्या मुख्य सचिव कार्यालयाकडून या ८० तासांच्या कालावधीत काय निर्णय घेतले, अथवा आदेश दिलेत? याची माहिती मागविली होती.त्यास अवर सचिव विवेक पाटील यांनी त्यात २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत मंत्रीमंडळाची एकच बैठक झाली असून त्यातील निर्णय हा संसदीय कार्य विभागाशी संबंधीत होता, असे उत्तर देत हा अर्ज संसदीय कार्य विभागाकडे वर्ग केला.मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या चेकवरील सहीचे काय ?मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या चेकवर सही करून कामकाजाला सुरूवात केली होती. त्याची माहितीही दिलेली नाही. तर संसदीय कार्य मंत्रालयाने ६ जानेवारी २०२० रोजी पाठविलेल्या उत्तरात फडणवीस हे मुख्यमंत्री असताना २६ नोव्हेंबर २०१९ रोजी मंत्रीमंडळाची बैठक झाली. या बैठकीत संसदीय कार्य विभागाशी संबंधीत केवळ एकच निर्णय झाला. तो म्हणजे ‘विधानसभेचे आगामी विशेष अधिवेशन बुधवार, २७ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ८.३० वाजता विधानभवन मुंबई येथे घेण्यात यावे, त्यानुसार राज्यपालांना शिफारस करण्यात यावी’ असा निर्णय झाल्याचे कळविले आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव