शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

हमी भावाची केवळ घोषणा, शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:13 IST

जळगाव : शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनाचा योग्य भाव मिळावा यासाठी सरकारकडून कृषी मालासाठी हमी भावाची घोषणा होत असली तरी प्रत्यक्षात ...

जळगाव : शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनाचा योग्य भाव मिळावा यासाठी सरकारकडून कृषी मालासाठी हमी भावाची घोषणा होत असली तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरी हे भाव पडतच नसल्याचे चित्र आहे. हमी भाव व शेतकऱ्यास प्रत्यक्षास मिळणारा भाव यात निम्म्याचा फरक असून हमी भावाची केवळ घोषणा होते, त्याची अंमलबजावणीदेखील व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

कृषी विधेयकाला विरोध व विविध मागण्यांसाठी दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून मंगळवारी विविध संघटनांच्यावतीने भारत बंदची हाक देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खरच हमी भावाचा लाभ होत आहे का, या विषयी माहिती घेतली असता शेतकरी या हमी भावापासून कोसो दूर असल्याचे सांगण्यात आले.

अटींच्या भोवऱ्यात अडकला कृषी माल

शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनाचा योग्य भाव मिळावा म्हणून सरकारने यंदा हमी भावात वाढ केली. ही वाढ पाहता ती किरकोळ असल्याचेच चित्र असून वाढ तर सोडा पूर्वीचा हमी भावदेखील शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मुळात शेतकऱ्यांनी हमी भावाची मागणी केली तरी त्याला दर्जाची अट घालून केवळ एफएक्यू दर्जाचा माल हमी भावाने घेतला जाईल, असे सांगितले जात असल्याचे चित्र आहे.

हमी भावापेक्षा खरेदी दर निम्मे

सोमवारी खरेदी दर व हमी भाव पाहिले तर मोठी तफावत त्यात दिसून आली. कापसाला पाच हजार ८०० रुपयांचा दर घोषित केला असताना प्रत्यक्षात शेतकऱ्यांना चार हजार २०० ते चार हजार ५०० रुपयांचाच भाव दिला जात आहे. अशाच प्रकारे उडीदासाठी सहा हजार हमी भाव जाहीर झाला असताना शेतकऱ्यांच्या हाती तीन ते साडे तीन हजार रुपयांचाच दर पडला. मुगाला सात हजाराचा भाव असताना तीन हजार ५०० ते चार हजार रुपयेच भाव दिला जात आहे. मक्याला एक हजार ८५० रुपये हमी भाव घोषित असताना शेतकऱ्यांना ९०० ते एक हजार रुपये भाव मिळाला. एवढी मोठी तफावत प्रत्येक कृषी मालात असून शेतकऱ्यांसाठी हमी भाव म्हणजे केवळ घोषणाच ठरत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

अनंत अडचणींचा सामना

कृषी मालाचा विचार केला तर मोजक्याच पिकांना हमी भाव दिला जातो. अजूनही ९० ते ९५ टक्के पिकांना हमी भावाची घोषणाच होत नाही. उडीद, मूग, मका, कापूस, सोयबीन, हरभरा व इतर मोजक्याच पिकांना हमी भावाची घोषणा होते. मात्र या कृषी मालाचीही पूर्ण खरेदीच होत नाही त्यामुळे हमी भाव दूरच राहतो. खरेदी केंद्रावरदेखील विक्रीचा विचार केला तरी तेथे एकतर गोदामात जागा नसते, बारदाण नसतात, अशा अनेक अडचणींचाही सामना शेतकऱ्यांना करावा लागतो.

—————————-

कृषी मालासाठी हमी भावाची केवळ घोषणा केली जाते. प्रत्यक्षात अजूनही शेतकऱ्यांना घोषित झालेला भाव मि‌ळत नाही. हमी भावासाठी घालण्यात येणाऱ्या अटी यामुळे शेतकरी मेटाकुटीस येतो.

- किशोर चौधरी, शेतकरी तथा अध्यक्ष, नवनिर्मिती शेतकरी मंडळ, असोदा.

केंद्र सरकार स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार हमी भाव देते. तो अजून वाढविला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार सकारात्मक आहे. मात्र अजून पाचच टक्के काम झाले असू ९५ टक्के काम सरकारने मार्गी लावावे.

- हर्षल चौधरी, शेतकरी.