शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

शेतकर्‍यांसाठी फक्त घोषणा

By admin | Updated: July 3, 2014 14:56 IST

मुख्यमंत्र्यांनी २0१२ मध्ये कापूस संशोधन केंद्रासंबंधी केलेली घोषणा हवेत विरली आहे.

 
जळगाव : मुख्यमंत्र्यांनी २0१२ मध्ये कापूस संशोधन केंद्रासंबंधी केलेली घोषणा हवेत विरली आहे. अगदी तशीच केंद्रीय कृषिमंत्र्यांनी केळी संशोधन केंद्रात टिश्यू प्रयोगशाळा उभारण्यासंबंधी केलेली घोषणा दिशाभूल करणारी व पुढे फसवी ठरेल की काय? असा प्रश्न आहे. 
सध्या निमखेडी शिवारामध्ये कार्यरत केळी संशोधन केंद्रात २00७ मध्ये टिश्यू प्रयोगशाळा सुरू झाली होती. परंतु वीज आणि मजुरांचा तुटवडा यामुळे हे काम तीन वर्षांपूर्वीच बंद पडले. शासनानेही दुर्लक्ष केले. याचा अर्थ या केंद्रात टिश्यू प्रयोगशाळा आहे, पण ती सुरू राहावी यासाठी प्रयत्न नाहीत. यात आणखी नवीन टिश्यू प्रयोगशाळेची गरज काय? असा प्रश्न आहे. यामुळे भाजपाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय कृषिमंत्र्यांकडून मंजूर करून आणलेली प्रयोगशाळा किती लाभाची व उपयोगाची राहील? हा मुद्दा आहे.
कर्मचारी, संशोधक केले कमी
केळी संशोधन केंद्रात पहारेकरीपासून वरिष्ठांपर्यंत १४ अधिकारी, कर्मचार्‍यांची पदे मंजूर होती. पैकी सात पदे कमी केली असून, येत्या १ ऑगस्टपासून हा निर्णय लागू होईल. कमी केलेल्या पदांमध्ये कनिष्ठ उद्यानविद्यावेत्ता, कनिष्ठ किटकशास्त्रज्ञ, वरिष्ठ संशोधन सहायक, दोन कृषी सहायक आणि दोन पहारेकरी या पदांचा समावेश आहे. यामुळे या केंद्रातील संशोधनाचे काम किती वेगात व प्रभावीपणे होईल हादेखील प्रश्न आहे. 
आघाडीचे अनुकरण?
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तत्कालीन आमदार मनीष जैन यांनी घेतलेल्या कापूस परिषदेनिमित्त आले होते. त्यांनी जिल्ह्यात स्वतंत्र कापूस संशोधन केंद्र उभारण्याची घोषणा केली होती. अजूनही हे संशोधन केंद्र सुरू झालेले नाही. महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत तेलबिया संशोधन केंद्राचा भाग म्हणून कापूस पैदासकार हे पद पूर्वीप्रमाणेच कायम आहे. या केंद्रात कृषीविद्यावेत्ता, किडरोगशास्त्रज्ञ व वनस्पती विद्याशास्त्रज्ञ ही पदे अजूनही मंजूर नाहीत. 
कापूस संशोधनात भरीव काम शक्यच नाही
यामुळे कापूस संशोधनासंबंधीचे कोणतेही भरीव काम सुरू होऊ शकलेले नाही. पूर्वी प्रमाणे फक्त जाती विकसित करण्याचे कार्य सुरू आहे. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांची घोषणा ही हवेतच विरली. याचेच अनुकरण आता भाजपाची मंडळी करीत आहे, हा नवा मुद्दाही पुढे आला आहे.
-------------
जिल्हाभरात कापूस उत्पादकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यांच्यासाठी टेक्सटाईल पार्कची घोषणा मुख्यमत्र्यांनी केली होती. ही घोषणादेखील फक्त घोषणाच राहिली आहे. १0 हेक्टर क्षेत्र
केळी संशोधन केंद्राकडे प्रयोग करण्यासह संशोधनाच्या कार्यासाठी १0 हेक्टर क्षेत्र आहे. या क्षेत्रात शेतकर्‍यांना टिश्यूची रोपे वितरित करण्यासाठी सक्षम अशी भव्य आणि अधिक क्षमतेची प्रयोगशाळा उभारणे किती शक्य आहे? हा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे. 
■ आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर घोषणाबाजी, श्रेय लाटण्याचा हा प्रकार सुरू केला आहे, असा आरोप होऊलागला आहे.
■ केळी उत्पादकांचा कळवळा आहे तर २00८ ते आतापर्यंत १४ वेळेस वादळाचा तडाखा बसलेल्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाईद्या, अशी मागणीदेखील आहे.