शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

5 लाखांच्या शहरासाठी फक्त 4 बंब, जळगाव मनपा प्रशासनाची अनास्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 13:22 IST

4 पैकी 2 बंबांचा वापर शौचालयांमध्ये पाणी टाकण्यासाठी

ठळक मुद्देपूर्वी 14 बंब, आता फक्त 2नवीन केंद्राचे प्रस्ताव थंडबस्त्यात

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 6 -  सुमारे पाच लाख लोकसंख्या असलेल्या जळगाव शहरासाठी फक्त 4 अगिAशमन दलाचे बंब आहेत. त्यापैकी 2 बंबांचा वापर शौचालयांमध्ये पाणी भरण्यासाठी प्रशासनाकडून केला जात आहे. सध्या उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात जळगावात अनेक आगी लागतात, त्या नियंत्रणात आणणे जिकिरीचे जाते. एकीकडे अगिAशमन दलाकडे दीड कोटीचा निधी यऊन पडला आहे, त्याचा विनियोग करण्यात आलेला नाही. 2 फेब्रुवारी रोजी मनपा स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर चार वाहने खरेदी करण्यात येतील, अशी माहिती प्रभारी आयुक्तांनी दिली. मात्र हे नवीन बंब उन्हाळा संपल्यानंतर शहरात दाखल होतील. त्यामुळे  आतार्पयत प्रशासन करीत तरी काय होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.वर्षभरात 157 आगीच्या घटनागतवर्षात शहरात आगीच्या तब्बल 157 घटना घडल्या. यात सर्वाधिक 76 आगी उन्हाळ्यात लागल्या. तरीही महापालिकेचा अगिAशमन विभाग सक्षम करण्याबाबत प्रशासनाकडून दुर्लक्षच होत आहे. दोन ते अडीच कोटींचा निधी खर्च करण्यासाठी सदस्यांनी तब्बल तीन वर्षे पाठपुरावा केला तरीही अनेक प्रस्ताव अद्यापही प्रलंबित आहेत. आजही या विभागाकडे दीड कोटीपेक्षा अधिक निधी पडून आहे. प्रशासनाची चालढकलमहापालिकेच्या अगिAशमन विभागाबद्दल प्रत्येक महासभा व स्थायी समितीच्या सभेत सदस्य नाराजी व्यक्त करीत असतात. दरवर्षी शासनाकडूनही अगिAशमन विभाग बळकटीकरणासाठी निधी मिळत असतो. गेल्या वर्षी या विभागाकडे सुमारे तीन ते साडेतीन कोटींचा निधी पडून होता. मात्र या विभागाच्या दुर्दशेबाबत प्रशासन गंभीर  नव्हतेच.नवीन केंद्राचे प्रस्ताव थंडबस्त्यातशहरातील कालिंकामाता मंदिर परिसर व सुरक्षानगर भागात नवीन अगिAशमन केंद्र सुरू करणे प्रस्तावित होते. यासाठी जागाही गेल्या वर्षी निश्चित झाली. मात्र नगररचना विभागाकडे हा प्रस्ताव प्रलंबित आहे. जागेवर आरक्षणाच्या गोंधळामुळे हे काम अद्याप होऊ शकलेले नाही. या भागात आग लागल्यास शहरातून बंब पाठवावे लागतात. तोवर आग लागलेल्या ठिकाणाची राखरांगोळी झालेली असते. त्यामुळे केंद्रांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. पूर्वी 14 बंब, आता फक्त 2महापालिकेकडे पूर्वी 14 अगिAशमन बंब होते. त्यातील बहुतांश निर्लेखित झाले. ही वाहने अनेक ठिकाणी भंगारमध्ये पडून आहेत. आजच्या स्थितीत महापालिकेकडे केवळ 4 बंब आहेत. त्यातील दोन बंबांचा वापर रोज शौचालयांमध्ये पाणी टाकण्यासाठी प्रशासनाकडून केला जात असतो. गेल्या वर्षी शिल्लक असलेल्या दोन ते अडीच कोटींच्या निधीतून किमान वाहने व विविध साहित्य खरेदी करावे यासाठी नगरसेवक नितीन बरडे, अनंत जोशी यांनी सातत्याने पाठपुरावा केला.  चार बंब खरेदीचा प्रस्ताव मान्यतेसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. यात दोन मोठे व दोन लहान अगिAशमन बंब येतील. मात्र त्याला अजूनही तीन ते चार महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. आठ वर्षानंतर मिळाले 35 लाखांचे साहित्य अगिAशमन दलातील जवानांकडे साधे ड्रेस नव्हते. तसेच आगीच्या क्षेत्रात जायचे असेल तर आगीचा प्रतिकार करू  शकतील असे साहित्य फारसे नव्हते. जानेवारीच्या प्रारंभी हे साहित्य या विभागास मिळाले. तब्बल 8 वर्षानंतर अगिAशमन दलास हे साहित्य प्राप्त झाले.