शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

5 लाखांच्या शहरासाठी फक्त 4 बंब, जळगाव मनपा प्रशासनाची अनास्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 13:22 IST

4 पैकी 2 बंबांचा वापर शौचालयांमध्ये पाणी टाकण्यासाठी

ठळक मुद्देपूर्वी 14 बंब, आता फक्त 2नवीन केंद्राचे प्रस्ताव थंडबस्त्यात

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 6 -  सुमारे पाच लाख लोकसंख्या असलेल्या जळगाव शहरासाठी फक्त 4 अगिAशमन दलाचे बंब आहेत. त्यापैकी 2 बंबांचा वापर शौचालयांमध्ये पाणी भरण्यासाठी प्रशासनाकडून केला जात आहे. सध्या उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात जळगावात अनेक आगी लागतात, त्या नियंत्रणात आणणे जिकिरीचे जाते. एकीकडे अगिAशमन दलाकडे दीड कोटीचा निधी यऊन पडला आहे, त्याचा विनियोग करण्यात आलेला नाही. 2 फेब्रुवारी रोजी मनपा स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर चार वाहने खरेदी करण्यात येतील, अशी माहिती प्रभारी आयुक्तांनी दिली. मात्र हे नवीन बंब उन्हाळा संपल्यानंतर शहरात दाखल होतील. त्यामुळे  आतार्पयत प्रशासन करीत तरी काय होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.वर्षभरात 157 आगीच्या घटनागतवर्षात शहरात आगीच्या तब्बल 157 घटना घडल्या. यात सर्वाधिक 76 आगी उन्हाळ्यात लागल्या. तरीही महापालिकेचा अगिAशमन विभाग सक्षम करण्याबाबत प्रशासनाकडून दुर्लक्षच होत आहे. दोन ते अडीच कोटींचा निधी खर्च करण्यासाठी सदस्यांनी तब्बल तीन वर्षे पाठपुरावा केला तरीही अनेक प्रस्ताव अद्यापही प्रलंबित आहेत. आजही या विभागाकडे दीड कोटीपेक्षा अधिक निधी पडून आहे. प्रशासनाची चालढकलमहापालिकेच्या अगिAशमन विभागाबद्दल प्रत्येक महासभा व स्थायी समितीच्या सभेत सदस्य नाराजी व्यक्त करीत असतात. दरवर्षी शासनाकडूनही अगिAशमन विभाग बळकटीकरणासाठी निधी मिळत असतो. गेल्या वर्षी या विभागाकडे सुमारे तीन ते साडेतीन कोटींचा निधी पडून होता. मात्र या विभागाच्या दुर्दशेबाबत प्रशासन गंभीर  नव्हतेच.नवीन केंद्राचे प्रस्ताव थंडबस्त्यातशहरातील कालिंकामाता मंदिर परिसर व सुरक्षानगर भागात नवीन अगिAशमन केंद्र सुरू करणे प्रस्तावित होते. यासाठी जागाही गेल्या वर्षी निश्चित झाली. मात्र नगररचना विभागाकडे हा प्रस्ताव प्रलंबित आहे. जागेवर आरक्षणाच्या गोंधळामुळे हे काम अद्याप होऊ शकलेले नाही. या भागात आग लागल्यास शहरातून बंब पाठवावे लागतात. तोवर आग लागलेल्या ठिकाणाची राखरांगोळी झालेली असते. त्यामुळे केंद्रांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. पूर्वी 14 बंब, आता फक्त 2महापालिकेकडे पूर्वी 14 अगिAशमन बंब होते. त्यातील बहुतांश निर्लेखित झाले. ही वाहने अनेक ठिकाणी भंगारमध्ये पडून आहेत. आजच्या स्थितीत महापालिकेकडे केवळ 4 बंब आहेत. त्यातील दोन बंबांचा वापर रोज शौचालयांमध्ये पाणी टाकण्यासाठी प्रशासनाकडून केला जात असतो. गेल्या वर्षी शिल्लक असलेल्या दोन ते अडीच कोटींच्या निधीतून किमान वाहने व विविध साहित्य खरेदी करावे यासाठी नगरसेवक नितीन बरडे, अनंत जोशी यांनी सातत्याने पाठपुरावा केला.  चार बंब खरेदीचा प्रस्ताव मान्यतेसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. यात दोन मोठे व दोन लहान अगिAशमन बंब येतील. मात्र त्याला अजूनही तीन ते चार महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. आठ वर्षानंतर मिळाले 35 लाखांचे साहित्य अगिAशमन दलातील जवानांकडे साधे ड्रेस नव्हते. तसेच आगीच्या क्षेत्रात जायचे असेल तर आगीचा प्रतिकार करू  शकतील असे साहित्य फारसे नव्हते. जानेवारीच्या प्रारंभी हे साहित्य या विभागास मिळाले. तब्बल 8 वर्षानंतर अगिAशमन दलास हे साहित्य प्राप्त झाले.