शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
4
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
5
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
6
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
7
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
8
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
9
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
10
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
11
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
12
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
13
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
14
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
15
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
16
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
17
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
18
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
19
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
20
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?

चारठाणा तलावात केवळ ३० टक्के साठा

By admin | Updated: March 2, 2017 00:14 IST

२०१५-२०१६ : इंदिरा आवास योजना; ९० दिवसांच्या रोजगाराचीही हमी

मुक्ताईनगर : तालुक्यातील चारठाणा वनविभागात येणाºया भवानी तलाव व भाटी  धरणातील  पाणीसाठा फेब्रुवारी महिन्याच्या १५ तारखेपासूनच अतिशय कमी झाल्याने उन्हाळ्यापूर्वीच जलाशयांना लागलेल्या ओहोटीमुळे भविष्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह वन्यजीव प्राण्यांनादेखील तहानलेले राहावे लागणार असल्याचे काहीसे भयावह चित्र निर्माण झाले आहे. २०१६ च्या पावसाळ्यात पावसाची जोरदार सुरुवात झाली  असली तरी पावसाचा जोर मात्र शेवटपर्यंत टिकला नाही. सुरुवात व नंतरच्या काळात सर्वाधिक काळ वातावरण ढगाळ राहिले. केवळ हलक्या सरींमुळेच जलाशये भरलीच नाहीत. पावसाळाअखेर चारठाणा वनविभागाच्या हद्दीत येणाºया भवानी परिसरातील तलावात केवळ  ६० टक्केच पाणी साचले तर त्यापेक्षा मोठ्या असलेल्या भाटीच्या धरणात क्षमतेच्या केवळ ७० ते ७५ टक्के एवढेच पाणी तलावात साचले. मध्यंतरी हिवाळ्यात पाण्याची उपलब्धता चांगली असली तरी फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच पाण्याची पातळी खालावली आहे. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत पाणी पातळी पूर्णपणे खालावली असून सद्य:स्थितीत भवानी धरणात केवळ ३० टक्के तर भाटीच्या धरणात केवळ ४० टक्के एवढाच जलसाठा शिल्लक आहे. उन्हाळा सुरू होण्याआधीच जलाशये आटल्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे चारठाणा वनहद्दीत जवळपास सात पट्टेदार वाघांचे अस्तित्व असून प्राणी पाण्यासाठी या दोन्ही तलावावर आधारित असतात. उन्हाळ्यात तलावांचे पाणी आटल्यास वन्यजीव प्राण्यांना पाण्यासाठी मानवी वस्तीकडे जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे वन्यजीव प्राण्यांचे जीव धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. नागरिकांसाठी शासन पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी विविध योजनांद्वारे पाणी पुरवले जाईल, मात्र वन्यजीव प्राण्यांचे काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील.सातपुड्याच्या कुशीतील निसर्गरम्य चारठाणा तलाव आणि भाटीचे धरण यातील पाणीसाठा कमी झाला. हा परिसर पट्टेदार वाघांच्या अस्तित्वाचा आहे. या शिवाय अन्य वन्य प्राण्यांचा या परिसरात मोठ्या प्रमाणात वावर आहे. जंगलातील धरणांमधील पाणीसाठे कमी झाले.त्यामुळे               पिण्याच्या पाण्याच्या योजनांनादेखील याची झळ  बसणार असल्याचे चित्र आहे. वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची आतापासूनच व्यवस्था करणे वनविभागासाठी गरजेचे आहे. तसे नियोजन केल्यास समस्या कमी होईल. यासाठी पुढाकार घेणे क्रमपात्र आहे.