शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
3
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
4
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
5
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
6
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
7
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
8
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
9
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
10
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
11
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
12
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
13
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
14
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
15
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
16
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
17
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
18
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
19
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
20
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर

चारठाणा तलावात केवळ ३० टक्के साठा

By admin | Updated: March 2, 2017 00:14 IST

२०१५-२०१६ : इंदिरा आवास योजना; ९० दिवसांच्या रोजगाराचीही हमी

मुक्ताईनगर : तालुक्यातील चारठाणा वनविभागात येणाºया भवानी तलाव व भाटी  धरणातील  पाणीसाठा फेब्रुवारी महिन्याच्या १५ तारखेपासूनच अतिशय कमी झाल्याने उन्हाळ्यापूर्वीच जलाशयांना लागलेल्या ओहोटीमुळे भविष्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह वन्यजीव प्राण्यांनादेखील तहानलेले राहावे लागणार असल्याचे काहीसे भयावह चित्र निर्माण झाले आहे. २०१६ च्या पावसाळ्यात पावसाची जोरदार सुरुवात झाली  असली तरी पावसाचा जोर मात्र शेवटपर्यंत टिकला नाही. सुरुवात व नंतरच्या काळात सर्वाधिक काळ वातावरण ढगाळ राहिले. केवळ हलक्या सरींमुळेच जलाशये भरलीच नाहीत. पावसाळाअखेर चारठाणा वनविभागाच्या हद्दीत येणाºया भवानी परिसरातील तलावात केवळ  ६० टक्केच पाणी साचले तर त्यापेक्षा मोठ्या असलेल्या भाटीच्या धरणात क्षमतेच्या केवळ ७० ते ७५ टक्के एवढेच पाणी तलावात साचले. मध्यंतरी हिवाळ्यात पाण्याची उपलब्धता चांगली असली तरी फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच पाण्याची पातळी खालावली आहे. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत पाणी पातळी पूर्णपणे खालावली असून सद्य:स्थितीत भवानी धरणात केवळ ३० टक्के तर भाटीच्या धरणात केवळ ४० टक्के एवढाच जलसाठा शिल्लक आहे. उन्हाळा सुरू होण्याआधीच जलाशये आटल्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे चारठाणा वनहद्दीत जवळपास सात पट्टेदार वाघांचे अस्तित्व असून प्राणी पाण्यासाठी या दोन्ही तलावावर आधारित असतात. उन्हाळ्यात तलावांचे पाणी आटल्यास वन्यजीव प्राण्यांना पाण्यासाठी मानवी वस्तीकडे जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे वन्यजीव प्राण्यांचे जीव धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. नागरिकांसाठी शासन पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी विविध योजनांद्वारे पाणी पुरवले जाईल, मात्र वन्यजीव प्राण्यांचे काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील.सातपुड्याच्या कुशीतील निसर्गरम्य चारठाणा तलाव आणि भाटीचे धरण यातील पाणीसाठा कमी झाला. हा परिसर पट्टेदार वाघांच्या अस्तित्वाचा आहे. या शिवाय अन्य वन्य प्राण्यांचा या परिसरात मोठ्या प्रमाणात वावर आहे. जंगलातील धरणांमधील पाणीसाठे कमी झाले.त्यामुळे               पिण्याच्या पाण्याच्या योजनांनादेखील याची झळ  बसणार असल्याचे चित्र आहे. वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची आतापासूनच व्यवस्था करणे वनविभागासाठी गरजेचे आहे. तसे नियोजन केल्यास समस्या कमी होईल. यासाठी पुढाकार घेणे क्रमपात्र आहे.