शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
5
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
6
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
7
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
8
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
9
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
10
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
11
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
12
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
13
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
14
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
15
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
16
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
17
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
18
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
19
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी

चारठाणा तलावात केवळ ३० टक्के साठा

By admin | Updated: March 2, 2017 00:14 IST

२०१५-२०१६ : इंदिरा आवास योजना; ९० दिवसांच्या रोजगाराचीही हमी

मुक्ताईनगर : तालुक्यातील चारठाणा वनविभागात येणाºया भवानी तलाव व भाटी  धरणातील  पाणीसाठा फेब्रुवारी महिन्याच्या १५ तारखेपासूनच अतिशय कमी झाल्याने उन्हाळ्यापूर्वीच जलाशयांना लागलेल्या ओहोटीमुळे भविष्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह वन्यजीव प्राण्यांनादेखील तहानलेले राहावे लागणार असल्याचे काहीसे भयावह चित्र निर्माण झाले आहे. २०१६ च्या पावसाळ्यात पावसाची जोरदार सुरुवात झाली  असली तरी पावसाचा जोर मात्र शेवटपर्यंत टिकला नाही. सुरुवात व नंतरच्या काळात सर्वाधिक काळ वातावरण ढगाळ राहिले. केवळ हलक्या सरींमुळेच जलाशये भरलीच नाहीत. पावसाळाअखेर चारठाणा वनविभागाच्या हद्दीत येणाºया भवानी परिसरातील तलावात केवळ  ६० टक्केच पाणी साचले तर त्यापेक्षा मोठ्या असलेल्या भाटीच्या धरणात क्षमतेच्या केवळ ७० ते ७५ टक्के एवढेच पाणी तलावात साचले. मध्यंतरी हिवाळ्यात पाण्याची उपलब्धता चांगली असली तरी फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच पाण्याची पातळी खालावली आहे. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत पाणी पातळी पूर्णपणे खालावली असून सद्य:स्थितीत भवानी धरणात केवळ ३० टक्के तर भाटीच्या धरणात केवळ ४० टक्के एवढाच जलसाठा शिल्लक आहे. उन्हाळा सुरू होण्याआधीच जलाशये आटल्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे चारठाणा वनहद्दीत जवळपास सात पट्टेदार वाघांचे अस्तित्व असून प्राणी पाण्यासाठी या दोन्ही तलावावर आधारित असतात. उन्हाळ्यात तलावांचे पाणी आटल्यास वन्यजीव प्राण्यांना पाण्यासाठी मानवी वस्तीकडे जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे वन्यजीव प्राण्यांचे जीव धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. नागरिकांसाठी शासन पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी विविध योजनांद्वारे पाणी पुरवले जाईल, मात्र वन्यजीव प्राण्यांचे काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील.सातपुड्याच्या कुशीतील निसर्गरम्य चारठाणा तलाव आणि भाटीचे धरण यातील पाणीसाठा कमी झाला. हा परिसर पट्टेदार वाघांच्या अस्तित्वाचा आहे. या शिवाय अन्य वन्य प्राण्यांचा या परिसरात मोठ्या प्रमाणात वावर आहे. जंगलातील धरणांमधील पाणीसाठे कमी झाले.त्यामुळे               पिण्याच्या पाण्याच्या योजनांनादेखील याची झळ  बसणार असल्याचे चित्र आहे. वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची आतापासूनच व्यवस्था करणे वनविभागासाठी गरजेचे आहे. तसे नियोजन केल्यास समस्या कमी होईल. यासाठी पुढाकार घेणे क्रमपात्र आहे.