शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
2
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
4
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
5
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
6
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
7
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
8
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
9
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
10
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
11
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
12
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
13
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
14
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
15
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
16
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
17
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
18
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
19
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
20
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
Daily Top 2Weekly Top 5

फळपीक विमा योजनेत ८६ पैकी ३ महसूलमंडळेच ठरली पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:21 IST

अजय पाटील लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या निकषात सन २०२०-२०२१ या वर्षासाठी केलेल्या बदलाचा ...

अजय पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या निकषात सन २०२०-२०२१ या वर्षासाठी केलेल्या बदलाचा फटका जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता आहे. हवामान आधारित फळपीक विमा योजनेत यावर्षी जिल्ह्यातील ८६ पैकी केवळ ३ महसूल मंडळेच निकषांमध्ये पात्र ठरली आहेत. इतर महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीकविम्यासाठी भरलेली रक्कम देखील मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊन विमा कंपनीला मात्र मोठा फायदा होणार आहे.

सन २०२०-२०२१ या वर्षासाठी राज्य शासनाने निकषांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, जाचक निकषांचा फटका यावर्षी जिल्ह्यातील हजारो केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. कारण बदललेल्या निकषांमध्ये अनेक महसूल मंडळे पात्रच ठरू शकलेली नाही. जिल्ह्यात एकूण ८६ महसूल मंडळे असून, यामधील जळगाव तालुक्यातील भोकर, चोपडा तालुक्यातील अडावद व यावल तालुक्यातील भालोद ही तीनच महसूल मंडळे पात्र ठरली आहेत. त्यामुळे या महसूल मंडळातील ६ हजार शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम मिळण्याची शक्यता आहे.

तीनच महसूल मंडळात तापमान ४५ डिग्रीपेक्षा जास्त राहिले

यावर्षीच्या निकषांमध्ये ज्या भागात १ एप्रिल ते ३१ मे दरम्यान सलग ८ ते १४ दिवस ४५ किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिले असाच भाग विम्याचा नुकसान भरपाईसाठी पात्र ठरणार होता. त्यानुसार केवळ तीनच महसूल मंडळे पात्र ठरली आहेत. इतर ८३ महसूल मंडळांमध्ये ४५ पेक्षा अधिक तापमानाचा निकष पूर्ण होऊ शकलेला नाही. जुन्या निकषांमध्ये ४५ पेक्षा अधिक तापमान राहिल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम ही हेक्टरी ४१ हजार रुपयांपर्यंत मिळत होती. मात्र, यावर्षी नुकसान होऊन देखील शेतकऱ्यांना केवळ १३ हजार रुपयांची नुकसानभरपाईची मिळणार आहे.

पात्र असलेल्यांनाही मिळणार नाममात्र रक्कम

१. राज्य शासनाने बदल केलेल्या निकषांमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यातील ४२ हजार शेतकऱ्यांनीच विमा काढला होता. २०१९-२०२० या वर्षासाठी जिल्ह्यातील ५२ हजार शेतकऱ्यांनी विमा काढला होता. त्यातच तीनच महसूल मंडळे निकष पार करू शकली असल्याने या मंडळांतील ६ हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळणार आहे.

२. नुकसान भरपाईची रक्कमदेखील कमी असल्याने शेतकऱ्यांना नाममात्रच रक्कम मिळणार आहे. तर इतर ३६ हजार शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी हेक्टरी ७ हजार रुपयांप्रमाणे भरलेली विम्याची रक्कम देखील मिळणे कठीण होणार आहे. दरम्यान, रावेर, यावल व मुक्ताईनगर तालुक्यात झालेल्या वादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वादळामुळे नुकसान झाल्याची रक्कम मिळणार आहे.

गेल्यावर्षी जिल्ह्याला मिळाली होती ३६० कोटींची भरपाई

२०१९-२०२० मध्ये जाचक निकष नसल्याने जिल्ह्यातील ८६ पैकी जवळपास सर्वच महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी सुमारे ३६० कोटी रुपयांची रक्कम मिळाली होती. मात्र, यावर्षी ३० ते ४० कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळण्याची शक्यता आहे.

पुढील वर्षासाठी मात्र शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

शेतकऱ्यांच्या विरोधानंतर राज्य शासनाने फळपीक विमा योजनेच्या निकषात बदल करून, पूर्वीप्रमाणेच २०२१-२०२२ या वर्षासाठीचे निकष लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील वर्षी शेतकऱ्यांना नुकसान झाल्यास त्याच तोडीची नुकसानभरपाई मिळणार आहे. यावर्षी जरी शेतकऱ्यांना फटका बसला असला तरी पुढील तीन वर्षांसाठी मात्र शेतकऱ्यांना लाभ होईल अशी माहिती करंज येथील शेतकरी कृषीभूषण अनिल जीवराम सपकाळे यांनी दिली.