शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

फळपीक विमा योजनेत ८६ पैकी ३ महसूलमंडळेच ठरली पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:21 IST

अजय पाटील लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या निकषात सन २०२०-२०२१ या वर्षासाठी केलेल्या बदलाचा ...

अजय पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या निकषात सन २०२०-२०२१ या वर्षासाठी केलेल्या बदलाचा फटका जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता आहे. हवामान आधारित फळपीक विमा योजनेत यावर्षी जिल्ह्यातील ८६ पैकी केवळ ३ महसूल मंडळेच निकषांमध्ये पात्र ठरली आहेत. इतर महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीकविम्यासाठी भरलेली रक्कम देखील मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊन विमा कंपनीला मात्र मोठा फायदा होणार आहे.

सन २०२०-२०२१ या वर्षासाठी राज्य शासनाने निकषांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, जाचक निकषांचा फटका यावर्षी जिल्ह्यातील हजारो केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. कारण बदललेल्या निकषांमध्ये अनेक महसूल मंडळे पात्रच ठरू शकलेली नाही. जिल्ह्यात एकूण ८६ महसूल मंडळे असून, यामधील जळगाव तालुक्यातील भोकर, चोपडा तालुक्यातील अडावद व यावल तालुक्यातील भालोद ही तीनच महसूल मंडळे पात्र ठरली आहेत. त्यामुळे या महसूल मंडळातील ६ हजार शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम मिळण्याची शक्यता आहे.

तीनच महसूल मंडळात तापमान ४५ डिग्रीपेक्षा जास्त राहिले

यावर्षीच्या निकषांमध्ये ज्या भागात १ एप्रिल ते ३१ मे दरम्यान सलग ८ ते १४ दिवस ४५ किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिले असाच भाग विम्याचा नुकसान भरपाईसाठी पात्र ठरणार होता. त्यानुसार केवळ तीनच महसूल मंडळे पात्र ठरली आहेत. इतर ८३ महसूल मंडळांमध्ये ४५ पेक्षा अधिक तापमानाचा निकष पूर्ण होऊ शकलेला नाही. जुन्या निकषांमध्ये ४५ पेक्षा अधिक तापमान राहिल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम ही हेक्टरी ४१ हजार रुपयांपर्यंत मिळत होती. मात्र, यावर्षी नुकसान होऊन देखील शेतकऱ्यांना केवळ १३ हजार रुपयांची नुकसानभरपाईची मिळणार आहे.

पात्र असलेल्यांनाही मिळणार नाममात्र रक्कम

१. राज्य शासनाने बदल केलेल्या निकषांमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यातील ४२ हजार शेतकऱ्यांनीच विमा काढला होता. २०१९-२०२० या वर्षासाठी जिल्ह्यातील ५२ हजार शेतकऱ्यांनी विमा काढला होता. त्यातच तीनच महसूल मंडळे निकष पार करू शकली असल्याने या मंडळांतील ६ हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळणार आहे.

२. नुकसान भरपाईची रक्कमदेखील कमी असल्याने शेतकऱ्यांना नाममात्रच रक्कम मिळणार आहे. तर इतर ३६ हजार शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी हेक्टरी ७ हजार रुपयांप्रमाणे भरलेली विम्याची रक्कम देखील मिळणे कठीण होणार आहे. दरम्यान, रावेर, यावल व मुक्ताईनगर तालुक्यात झालेल्या वादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वादळामुळे नुकसान झाल्याची रक्कम मिळणार आहे.

गेल्यावर्षी जिल्ह्याला मिळाली होती ३६० कोटींची भरपाई

२०१९-२०२० मध्ये जाचक निकष नसल्याने जिल्ह्यातील ८६ पैकी जवळपास सर्वच महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी सुमारे ३६० कोटी रुपयांची रक्कम मिळाली होती. मात्र, यावर्षी ३० ते ४० कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळण्याची शक्यता आहे.

पुढील वर्षासाठी मात्र शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

शेतकऱ्यांच्या विरोधानंतर राज्य शासनाने फळपीक विमा योजनेच्या निकषात बदल करून, पूर्वीप्रमाणेच २०२१-२०२२ या वर्षासाठीचे निकष लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील वर्षी शेतकऱ्यांना नुकसान झाल्यास त्याच तोडीची नुकसानभरपाई मिळणार आहे. यावर्षी जरी शेतकऱ्यांना फटका बसला असला तरी पुढील तीन वर्षांसाठी मात्र शेतकऱ्यांना लाभ होईल अशी माहिती करंज येथील शेतकरी कृषीभूषण अनिल जीवराम सपकाळे यांनी दिली.