शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुंबईतील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर
2
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
3
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
4
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
5
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
6
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
7
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
8
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
9
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
10
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
12
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
13
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
14
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
15
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
16
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
17
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
18
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
19
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
20
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले

फळपीक विमा योजनेत ८६ पैकी ३ महसूलमंडळेच ठरली पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:21 IST

अजय पाटील लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या निकषात सन २०२०-२०२१ या वर्षासाठी केलेल्या बदलाचा ...

अजय पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या निकषात सन २०२०-२०२१ या वर्षासाठी केलेल्या बदलाचा फटका जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता आहे. हवामान आधारित फळपीक विमा योजनेत यावर्षी जिल्ह्यातील ८६ पैकी केवळ ३ महसूल मंडळेच निकषांमध्ये पात्र ठरली आहेत. इतर महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीकविम्यासाठी भरलेली रक्कम देखील मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊन विमा कंपनीला मात्र मोठा फायदा होणार आहे.

सन २०२०-२०२१ या वर्षासाठी राज्य शासनाने निकषांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, जाचक निकषांचा फटका यावर्षी जिल्ह्यातील हजारो केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. कारण बदललेल्या निकषांमध्ये अनेक महसूल मंडळे पात्रच ठरू शकलेली नाही. जिल्ह्यात एकूण ८६ महसूल मंडळे असून, यामधील जळगाव तालुक्यातील भोकर, चोपडा तालुक्यातील अडावद व यावल तालुक्यातील भालोद ही तीनच महसूल मंडळे पात्र ठरली आहेत. त्यामुळे या महसूल मंडळातील ६ हजार शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम मिळण्याची शक्यता आहे.

तीनच महसूल मंडळात तापमान ४५ डिग्रीपेक्षा जास्त राहिले

यावर्षीच्या निकषांमध्ये ज्या भागात १ एप्रिल ते ३१ मे दरम्यान सलग ८ ते १४ दिवस ४५ किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिले असाच भाग विम्याचा नुकसान भरपाईसाठी पात्र ठरणार होता. त्यानुसार केवळ तीनच महसूल मंडळे पात्र ठरली आहेत. इतर ८३ महसूल मंडळांमध्ये ४५ पेक्षा अधिक तापमानाचा निकष पूर्ण होऊ शकलेला नाही. जुन्या निकषांमध्ये ४५ पेक्षा अधिक तापमान राहिल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम ही हेक्टरी ४१ हजार रुपयांपर्यंत मिळत होती. मात्र, यावर्षी नुकसान होऊन देखील शेतकऱ्यांना केवळ १३ हजार रुपयांची नुकसानभरपाईची मिळणार आहे.

पात्र असलेल्यांनाही मिळणार नाममात्र रक्कम

१. राज्य शासनाने बदल केलेल्या निकषांमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यातील ४२ हजार शेतकऱ्यांनीच विमा काढला होता. २०१९-२०२० या वर्षासाठी जिल्ह्यातील ५२ हजार शेतकऱ्यांनी विमा काढला होता. त्यातच तीनच महसूल मंडळे निकष पार करू शकली असल्याने या मंडळांतील ६ हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळणार आहे.

२. नुकसान भरपाईची रक्कमदेखील कमी असल्याने शेतकऱ्यांना नाममात्रच रक्कम मिळणार आहे. तर इतर ३६ हजार शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी हेक्टरी ७ हजार रुपयांप्रमाणे भरलेली विम्याची रक्कम देखील मिळणे कठीण होणार आहे. दरम्यान, रावेर, यावल व मुक्ताईनगर तालुक्यात झालेल्या वादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वादळामुळे नुकसान झाल्याची रक्कम मिळणार आहे.

गेल्यावर्षी जिल्ह्याला मिळाली होती ३६० कोटींची भरपाई

२०१९-२०२० मध्ये जाचक निकष नसल्याने जिल्ह्यातील ८६ पैकी जवळपास सर्वच महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी सुमारे ३६० कोटी रुपयांची रक्कम मिळाली होती. मात्र, यावर्षी ३० ते ४० कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळण्याची शक्यता आहे.

पुढील वर्षासाठी मात्र शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

शेतकऱ्यांच्या विरोधानंतर राज्य शासनाने फळपीक विमा योजनेच्या निकषात बदल करून, पूर्वीप्रमाणेच २०२१-२०२२ या वर्षासाठीचे निकष लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील वर्षी शेतकऱ्यांना नुकसान झाल्यास त्याच तोडीची नुकसानभरपाई मिळणार आहे. यावर्षी जरी शेतकऱ्यांना फटका बसला असला तरी पुढील तीन वर्षांसाठी मात्र शेतकऱ्यांना लाभ होईल अशी माहिती करंज येथील शेतकरी कृषीभूषण अनिल जीवराम सपकाळे यांनी दिली.