शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

जिल्ह्यात केवळ १८ टक्के पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:12 IST

जळगाव : जिल्ह्यात मान्सून दाखल झाला असला तरी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. आतापर्यंत पाहिजे तसा ...

जळगाव : जिल्ह्यात मान्सून दाखल झाला असला तरी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. आतापर्यंत पाहिजे तसा पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील पेरण्या देखील खोळंबल्या असून, २० जूनपर्यंत जिल्ह्यात केवळ १८ टक्के पेरण्या झाल्या असल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. अजून पावसाचा खंड राहिला तर दुबार पेरणीचे संकट निर्माण होवू शकते अशी भिती जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.

जिल्ह्यात गेल्यावर्षी २० जूनपर्यंत सुमारे ४० टक्के पेरण्या पुर्ण झाल्या होत्या. मात्र, यावर्षी मान्सून वेळेवर दाखल झाल्यावर देखील अनेक भागात पावसाने दडी मारल्यामुळे पेरण्या थांबल्या आहेत. १८ टक्के पेरण्या झाल्या असल्या तरी यामध्ये कापसाचे जवळपास ९० टक्के क्षेत्राचा समावेश आहे. हंगामपूर्व कापसाची लागवड वगळली तर जिल्ह्यात एकूण केवळ ५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पुर्ण झाल्या आहेत. उडीद, मूग, सोयाबीन अद्याप पेरणी झाली नसून, आता या पेरण्या जुलै महिन्याचा पहिल्या आठवड्यापर्यंत पुर्ण होण्याची शक्यता आहे.

कापसाची १ लाख १३ हेक्टर क्षेत्रावर लागवड

गेल्यावर्षाच्या तुलनेत कापसाची लागवड यंदा २० जूनपर्यंत कमीच झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे १ लाख ३३ हजार ३६० हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. जिल्ह्यात यंदा ५ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड होण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाकडून ठेवण्यात आले होते. मात्र, पावसाने दडी मारल्याने अद्यापही मान्सूननंतरच्या कापसाची लागवड झालेली नाही.१ लाख ३३ हजार हेक्टरपैकी जवळपास १ लाख २० हजार हेक्टर कापसाची लागवड ही मान्सूनपुर्व आहे. पाऊस लांबल्यास कापसाच्या लागवड क्षेत्रावर देखील यंदा परिणाम होण्याची शक्यता आहे.

सोयाबीन,मूग, उडीदची पेरणीच नाही

जिल्ह्यात खरीप हंगामात कापूस व मक्यानंतर सर्वाधिक लागवड ही मूग, उडीद व सोयाबीन य पीकांची होत असते. मात्र, यावर्षी दमदार पाऊस झाला नसल्याने जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंतदेखील या पीकांच्या पेरण्यांना सुरुवात झालेली नाही. सोयाबीनची केवळ १८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर उडीद व मूगची देखील शुन्य टक्के पेरणी आहे. उसाची जवळपास २ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. तर मक्याची २ हजार ६४३ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

अजून आठवडाभर पावसाचा खंड ?

राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी अद्याप कोकण किनारपट्टीलगतच पावसाने दमदार हजेरी लावली असून, जिल्ह्यात अद्याप पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही. दरम्यान, अजून आठवडाभर जिल्ह्यात तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर काही तालुक्यांमध्ये कमी व जास्त प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पेरण्यांची तालुकानिहाय स्थिती

तालुका - लागवड क्षेत्र - टक्केवारी

जळगाव - ५ हजार २४२ - ९ टक्के

भुसावळ - ८ हजार ९२५ - ३४ टक्के

बोदवड - १ हजार ३४९ - ४

यावल - ४ हजार २०६ -९

रावेर - १३ हजार ४३५ - ४६

मुक्ताईनगर - ९ हजार ३१६१ - ८

अमळनेर - ५ हजार ३८६ - ८

चोपडा - १० हजार ४२४ - १७

एरंडोल -५ हजार ७५० - १५

धरणगाव - ५ हजार १२० - १२

पारोळा - ६ हजार २०० - १२

चाळीसगाव - २२ हजार ०३७ - २५

जामनेर - १६ हजार ८४० - १७

पाचोरा - १९ हजार २२१ - ३३

भडगाव - ६ हजार ३१ - १८