शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात केवळ १८ टक्के पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:12 IST

जळगाव : जिल्ह्यात मान्सून दाखल झाला असला तरी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. आतापर्यंत पाहिजे तसा ...

जळगाव : जिल्ह्यात मान्सून दाखल झाला असला तरी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. आतापर्यंत पाहिजे तसा पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील पेरण्या देखील खोळंबल्या असून, २० जूनपर्यंत जिल्ह्यात केवळ १८ टक्के पेरण्या झाल्या असल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. अजून पावसाचा खंड राहिला तर दुबार पेरणीचे संकट निर्माण होवू शकते अशी भिती जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.

जिल्ह्यात गेल्यावर्षी २० जूनपर्यंत सुमारे ४० टक्के पेरण्या पुर्ण झाल्या होत्या. मात्र, यावर्षी मान्सून वेळेवर दाखल झाल्यावर देखील अनेक भागात पावसाने दडी मारल्यामुळे पेरण्या थांबल्या आहेत. १८ टक्के पेरण्या झाल्या असल्या तरी यामध्ये कापसाचे जवळपास ९० टक्के क्षेत्राचा समावेश आहे. हंगामपूर्व कापसाची लागवड वगळली तर जिल्ह्यात एकूण केवळ ५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पुर्ण झाल्या आहेत. उडीद, मूग, सोयाबीन अद्याप पेरणी झाली नसून, आता या पेरण्या जुलै महिन्याचा पहिल्या आठवड्यापर्यंत पुर्ण होण्याची शक्यता आहे.

कापसाची १ लाख १३ हेक्टर क्षेत्रावर लागवड

गेल्यावर्षाच्या तुलनेत कापसाची लागवड यंदा २० जूनपर्यंत कमीच झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे १ लाख ३३ हजार ३६० हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. जिल्ह्यात यंदा ५ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड होण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाकडून ठेवण्यात आले होते. मात्र, पावसाने दडी मारल्याने अद्यापही मान्सूननंतरच्या कापसाची लागवड झालेली नाही.१ लाख ३३ हजार हेक्टरपैकी जवळपास १ लाख २० हजार हेक्टर कापसाची लागवड ही मान्सूनपुर्व आहे. पाऊस लांबल्यास कापसाच्या लागवड क्षेत्रावर देखील यंदा परिणाम होण्याची शक्यता आहे.

सोयाबीन,मूग, उडीदची पेरणीच नाही

जिल्ह्यात खरीप हंगामात कापूस व मक्यानंतर सर्वाधिक लागवड ही मूग, उडीद व सोयाबीन य पीकांची होत असते. मात्र, यावर्षी दमदार पाऊस झाला नसल्याने जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंतदेखील या पीकांच्या पेरण्यांना सुरुवात झालेली नाही. सोयाबीनची केवळ १८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर उडीद व मूगची देखील शुन्य टक्के पेरणी आहे. उसाची जवळपास २ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. तर मक्याची २ हजार ६४३ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

अजून आठवडाभर पावसाचा खंड ?

राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी अद्याप कोकण किनारपट्टीलगतच पावसाने दमदार हजेरी लावली असून, जिल्ह्यात अद्याप पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही. दरम्यान, अजून आठवडाभर जिल्ह्यात तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर काही तालुक्यांमध्ये कमी व जास्त प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पेरण्यांची तालुकानिहाय स्थिती

तालुका - लागवड क्षेत्र - टक्केवारी

जळगाव - ५ हजार २४२ - ९ टक्के

भुसावळ - ८ हजार ९२५ - ३४ टक्के

बोदवड - १ हजार ३४९ - ४

यावल - ४ हजार २०६ -९

रावेर - १३ हजार ४३५ - ४६

मुक्ताईनगर - ९ हजार ३१६१ - ८

अमळनेर - ५ हजार ३८६ - ८

चोपडा - १० हजार ४२४ - १७

एरंडोल -५ हजार ७५० - १५

धरणगाव - ५ हजार १२० - १२

पारोळा - ६ हजार २०० - १२

चाळीसगाव - २२ हजार ०३७ - २५

जामनेर - १६ हजार ८४० - १७

पाचोरा - १९ हजार २२१ - ३३

भडगाव - ६ हजार ३१ - १८