शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात केवळ १८ टक्के पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:12 IST

जळगाव : जिल्ह्यात मान्सून दाखल झाला असला तरी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. आतापर्यंत पाहिजे तसा ...

जळगाव : जिल्ह्यात मान्सून दाखल झाला असला तरी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. आतापर्यंत पाहिजे तसा पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील पेरण्या देखील खोळंबल्या असून, २० जूनपर्यंत जिल्ह्यात केवळ १८ टक्के पेरण्या झाल्या असल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. अजून पावसाचा खंड राहिला तर दुबार पेरणीचे संकट निर्माण होवू शकते अशी भिती जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.

जिल्ह्यात गेल्यावर्षी २० जूनपर्यंत सुमारे ४० टक्के पेरण्या पुर्ण झाल्या होत्या. मात्र, यावर्षी मान्सून वेळेवर दाखल झाल्यावर देखील अनेक भागात पावसाने दडी मारल्यामुळे पेरण्या थांबल्या आहेत. १८ टक्के पेरण्या झाल्या असल्या तरी यामध्ये कापसाचे जवळपास ९० टक्के क्षेत्राचा समावेश आहे. हंगामपूर्व कापसाची लागवड वगळली तर जिल्ह्यात एकूण केवळ ५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पुर्ण झाल्या आहेत. उडीद, मूग, सोयाबीन अद्याप पेरणी झाली नसून, आता या पेरण्या जुलै महिन्याचा पहिल्या आठवड्यापर्यंत पुर्ण होण्याची शक्यता आहे.

कापसाची १ लाख १३ हेक्टर क्षेत्रावर लागवड

गेल्यावर्षाच्या तुलनेत कापसाची लागवड यंदा २० जूनपर्यंत कमीच झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे १ लाख ३३ हजार ३६० हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. जिल्ह्यात यंदा ५ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड होण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाकडून ठेवण्यात आले होते. मात्र, पावसाने दडी मारल्याने अद्यापही मान्सूननंतरच्या कापसाची लागवड झालेली नाही.१ लाख ३३ हजार हेक्टरपैकी जवळपास १ लाख २० हजार हेक्टर कापसाची लागवड ही मान्सूनपुर्व आहे. पाऊस लांबल्यास कापसाच्या लागवड क्षेत्रावर देखील यंदा परिणाम होण्याची शक्यता आहे.

सोयाबीन,मूग, उडीदची पेरणीच नाही

जिल्ह्यात खरीप हंगामात कापूस व मक्यानंतर सर्वाधिक लागवड ही मूग, उडीद व सोयाबीन य पीकांची होत असते. मात्र, यावर्षी दमदार पाऊस झाला नसल्याने जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंतदेखील या पीकांच्या पेरण्यांना सुरुवात झालेली नाही. सोयाबीनची केवळ १८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर उडीद व मूगची देखील शुन्य टक्के पेरणी आहे. उसाची जवळपास २ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. तर मक्याची २ हजार ६४३ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

अजून आठवडाभर पावसाचा खंड ?

राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी अद्याप कोकण किनारपट्टीलगतच पावसाने दमदार हजेरी लावली असून, जिल्ह्यात अद्याप पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही. दरम्यान, अजून आठवडाभर जिल्ह्यात तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर काही तालुक्यांमध्ये कमी व जास्त प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पेरण्यांची तालुकानिहाय स्थिती

तालुका - लागवड क्षेत्र - टक्केवारी

जळगाव - ५ हजार २४२ - ९ टक्के

भुसावळ - ८ हजार ९२५ - ३४ टक्के

बोदवड - १ हजार ३४९ - ४

यावल - ४ हजार २०६ -९

रावेर - १३ हजार ४३५ - ४६

मुक्ताईनगर - ९ हजार ३१६१ - ८

अमळनेर - ५ हजार ३८६ - ८

चोपडा - १० हजार ४२४ - १७

एरंडोल -५ हजार ७५० - १५

धरणगाव - ५ हजार १२० - १२

पारोळा - ६ हजार २०० - १२

चाळीसगाव - २२ हजार ०३७ - २५

जामनेर - १६ हजार ८४० - १७

पाचोरा - १९ हजार २२१ - ३३

भडगाव - ६ हजार ३१ - १८