शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

जळगाव जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये फक्त १३ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 12:27 IST

तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये १४.७४ टक्के साठा, ८ मध्यम प्रकल्पांमध्ये ठणठणाट

जळगाव: जिल्ह्यात यंदा गत १५ वर्षातील गंभीर दुष्काळ असून अल्प पावसामुळे धरणांमध्ये देखील कमीच पाणीसाठा झाला होता. त्यामुळे एप्रिल संपत आला असताना जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये एकूण १२.६७ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यापैकी तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये १४.७४ टक्के पाणीसाठा आहे. या प्रकल्पांमध्ये मागील वर्षी आजच्या तारखेला २४.९६टक्के पाणीसाठा होता.गतवर्षीच्या तुलनेत यंदा ५ टक्के कमीच म्हणजे सुमारे ६८ टक्के पाऊस झाला. त्यातही पावसाने मोठ्या प्रमाणावर खंड दिला. वाहून निघेल असा पाऊस फारच कमी प्रमाणात झाल्याने धरणांमध्ये अपेक्षित पाणीसाठा होऊ शकला नाही.८ मध्यम प्रकल्पांमध्ये ठणठणाटजिल्ह्यातील १३ मध्यम प्रकल्पांपैकी ान्याड, बोरी, भोकरबारी, अग्नावती, तोंडापूर, हिवरा, बहुळा या ८ प्रकल्पांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे. तर उर्वरीत सुकी, अभोरा, मंगरूळ, मोर व गूळ या पाच मध्यम प्रकल्पांमध्ये मिळून एकूण १०.२० टक्के पाणीसाठा आहे.मोठ्या प्रकल्पांमध्येही मोजकाच साठा१०० टक्के भरूनही हतनूरमध्ये सध्या ३.६९ टक्के उपयुक्त पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. गतवर्षी आजच्या तारखेला या धरणात २०.०४ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.गिरणा धरणात मात्र गतवर्षीच्या तुलनेत थोडा अधिक साठा यंदा शिल्लक आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी गिरणात १७.२७ टक्के पाणीसाठा होता. सध्या गिरणात १८.२६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.जळगाव शहराचा पाणीपुरवठा अवलंबून असलेल्या वाघूर धरणाची स्थिती मात्र बिकट आहे. धरणात सध्या १८.६७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी ४६.२२ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.लघुप्रकल्प कोरडेचजिल्ह्यातील ९६ लघुप्रकल्पांपैकी बहुतांश प्रकल्प कोरडेच असून सर्व प्रकल्प मिळून जेमतेम ४.४० टक्के पाणीसाठा आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव