शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कांदा दरात तेजीची ‘दिवाळी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 17:16 IST

चाळीसगाव बाजार समितीत झगमग : नऊ दिवसात 24 हजार 300 क्विंटल आवक

ठळक मुद्देपावसाळी कांद्याचे मात्र मोठे नुकसान नाशिक, मराठवाड्यातूनही आवक

जिजाबराव वाघ । लोकमत ऑनलाईन चाळीसगाव, दि.24 : येथील बाजार समितीत उन्हाळी कांद्याला रविवारी झालेल्या लिलावात 3520 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वोच्च दर मिळाला असून ऑक्टोबर महिन्याच्या एकूण नऊ लिलावात बाजार समितीत 24 हजार 300 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. मंगळवारीही भावात तेजी कायम होती. 3200 रुपये प्रतिक्विंटल अशा दराने लिलाव झाले. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, वेहेळगाव, औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, पिशोर आणि पाचोरा, भडगाव येथून कांदा विक्रीसाठी येत आहे. दोन वर्षापूर्वी चाळीसगाव बाजार समितीने उत्पन्न वाढीसाठी कांदा मार्केट सुरु केले. त्याला आतार्पयत चांगला प्रतिसाद मिळाला असून आठवडय़ातून चार दिवस कांद्याचे लिलाव केले जातात. तेजीची झळाळी येथील कांदा मार्केटमध्ये एक ते 23 ऑक्टोंबर दरम्यान नऊ वेळा लिलाव झाले. गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत रविवारी 22 रोजी उन्हाळी कांद्याला 3520 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वोच्च भाव मिळाला. यामुळे कांदा उत्पादक सुखावले असून त्यांच्यासाठी भावातील ही तेजी दिवाळी सारखीच असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली. नाशिक जिल्ह्यातूनही आवक नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात कांदा लागवडीचे मोठे क्षेत्र असून येथूनही मोठ्या प्रमाणात चाळीसगाव बाजार समितीत कांद्याची आवक होत आहे. त्या जिल्ह्यातील भावापेक्षा चाळीसगाव येथे मिळणारे दर चांगले आहे. याबरोबरच पेमेंटही लवकर मिळत असल्याचे नांदगाव तालुक्यातील वेहेळगाव येथील कांदा उत्पादक शेतकरी महेश चकोर यांनी सांगितले. पावसाळी कांद्याचे मोठे नुकसान उन्हाळी कांद्याला चढे दर मिळत असले तरी मध्यंतरी परतीच्या वादळी पावसामुळे पावसाळी कांद्याला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे हे पिक फारसे हाती आले नाही. शेतक-यांना उन्हाळी कांदा विकण्याशिवाय पर्याय नाही. तीन महिन्याचे पीक कांदा पीक अवघे तीन महिन्यात येते. यामुळेच खान्देशात गेल्या आठ ते दहा वर्षात कांदा लागवडीकडे शेतक-यांचा कल वाढला आहे. गिरणा परिसरात कांदा लागवडीचा नाशिक पॅर्टन चांगलाचा यशस्वी आणि लाभदायी ठरला आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतक-यांनी गिरणा पट्टय़ात येऊन ठराविक दराने कांदा लागवड केली असून आता मोठय़ा संख्येने गिरणा परिसरातील शेतकरीही कांदा लागवडीकडे वळले आहेत. पावसाळी कांद्याने रडविले उन्हाळी कांद्याने शेतक-यांना ऐन दिवाळीत काहीसे हसविले असले तरी मध्यंतरी झालेल्या पावसाचे पाणी शेतात साचून राहिले. यात कांदा पीक भिजले. काही ठिकाणी ते कुजले तर बुरशीचाही त्याला विळखा पडला. परिणामी पोळ्याला लागवड झालेले पावसाळी कांद्याचे पिक दिवाळीनंतर हाती येण्याच्या वेळीच अस्मानी मार बसल्याने हे वेळापत्रक कोलमडले, असे मेहुणबारे येथील शेतकरी संजय तुकाराम बोलकर यांनी सांगितले. यामुळे चाळीसगाव बाजार समितीत महिन्याभरात पावसाळी कांद्याची अल्पशीही आवक झाली नसल्याचे बाजार समितीच्या सुत्रांनी सांगितले.