शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
2
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
6
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
7
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
8
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
9
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
10
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
11
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
12
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
13
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
14
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
15
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
16
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
17
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
18
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
19
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
20
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला

कांदा निर्यात बंदी मागे घेण्यात यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 17:18 IST

मागणी : चोपडा आणि अमळनेर येथे तहसीलदारांना दिले निवेदन

अमळनेर/ चोपडा : कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेऊन शेतकयांना न्याय द्या अशी मागणी अमळनेर तालुका काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच चोपडा येथे किसान मोर्चातर्फे निवेदन देऊन केली आहे.अमळनेरयेथे तहसीलदार मिलिंद वाघ यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केले आहे की, जगभरात लॉकडाऊन असतांना मोठ्या कष्टाने शेतकºयाने कांदयाचे उत्पादन घेतले. कांद्याला आता कुठे चांगला भाव येऊ लागल्याचे दिसत होते. चार पैसे हाता पडतील अशी शेतकºयाला आशा होती. पण केंद्रातील लहरी मोदी सरकारने अचानक निर्यातबंदी जाहीर करून शेतकऱ्यांवर घोर अन्याय केला आहे. तीन महिन्यापूर्वी म्हणजेच ४ जून २०२० रोजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कांदा, बटाटा, डाळींना जीवनाश्यक वस्तूंच्या यादीतुन वगळले असल्याची घोषणा करुन स्वत:ची पाठ थोपटवून घेतली होती आणि त्यांनीही तीन महिन्यात घुमजाव करुन निर्णय बदलुन शेतकºयांवर अन्याय केला आहे. या निर्णयामुळे कांदयाचे भाव कोसळून शेतकºयाचे प्रचंड मोठे नुकसान होणार आहे. तरी कांदा उत्पादक शेतकºयांवर अन्याय करणारा कांदा निर्यातबंदीचा निर्णय तात्काळ मागे घेवुन शेतकºयांना न्याय दयावा अशी मागणी केली आहे.यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गोकुळ बोरसे, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, जिल्हा किसान काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश पाटील, रेशनिंग समिती अध्यक्ष भागवत सूर्यवंशी, सुनील पाटील,अनंत निकम आदी उपस्थित होते.चोपडाकांदा निर्यातबंदी बाबत किसान सभा किसान मोर्चा व इतर संबंधित शेतकरी संघटना या प्रश्नावर पुढील आठवड्यात आंदोलन करणार आहे असा इशारा भाकप नेते अमृत महाजन, सूकाणु समीतीने सदस्य एस. बी. पाटील, किसान मोर्चाचे कृष्णा बाविस्कर, संभाजी बाविस्कर, अशोक भाईदास बाविस्कर, नवल बाविस्कर, छोटू पाटील, कैलास महाजन, वासुदेव कोळी, रवी महाजन, गोरख वानखेडे, देवानंद बाविस्कर, गोवर्धन सोनवणे, गंगाराम प्रल्हाद महाजन, मूकेश महाजन, राकेश महाजन, रमेश महाजन, शिवाजी पाटील, मनोहर चौधरी, अडावद, लासुर, धानोरा परीसरातील शेतकरी आदींनी दिला आहे.