शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
4
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
5
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
6
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
7
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
8
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
9
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
10
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
11
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
12
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
13
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
14
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
15
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
16
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
17
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
18
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
19
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
20
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
Daily Top 2Weekly Top 5

जीवनाचे चित्र जे व्यवस्थित मांडू शकले ते खरे शिक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : प्रत्येकाने शालेय ज्ञान मिळविणे महत्त्वाचे आहेच, मात्र केवळ वर्गात जाऊन बसणे म्हणजे शिक्षण घेणे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : प्रत्येकाने शालेय ज्ञान मिळविणे महत्त्वाचे आहेच, मात्र केवळ वर्गात जाऊन बसणे म्हणजे शिक्षण घेणे होत नाही. शाळेत जाऊनही अनेक जण ‘अशिक्षित’च असतात. लेखी असो की मौखिक असो, जो जीवनाचे चित्र व्यवस्थित मांडू शकला तो खरा शिक्षित आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी शिक्षण घेतलेले नसले तरी त्यांनी जीवनाचे खरे सार आपल्या काव्यातून मांडले. त्यामुळे त्या खऱ्या अर्थाने शिक्षित म्हणाव्या, असे परखड मत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी जळगावात व्यक्त केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला डॉ. भालचंद्र नेमाडे यांची जैन इरिगेशनमधील सहकारी ज्ञानेश्वर शेंडे यांनी मुलाखत घेतली. त्या वेळी डॉ. नेमाडे यांनी विविध विषयांवर मत व्यक्त केले.

बहिणाबाईंच्या कवितांनी अनेकांना धडा

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे जीवनाविषयीचे परिपूर्ण आकलन होते. आजही महिलांना पुरुषांपेक्षा अधिक आकलन असते. त्यामुळे त्या देश व्यवस्थित चालवू शकत आहेत. १९५२ मध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कविता आल्या त्या वेळी इतर कवींना त्यातून धडा मिळाला, असेही डॉ. नेमाडे यांनी नमूद केले.

बोलीभाषांना वाईट दिवस

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे काव्य ज्या बोलीभाषेत आहे, ते सर्वांना भावते. मुळात प्रत्येक बोलीभाषाच ही मूळ भाषा आहे. मात्र जे लिहिले जाते ती प्रमाणभाषा होते. अशाच प्रकारे राज्यात ३२ बोलीभाषा बोलणाऱ्या सर्वांनी प्रमाणभाषा स्वीकारली, हे त्यांचे मोठेपण आहे. मात्र नंतर ती प्रमाणभाषाच खरी वाटू लागल्याने आज बोलीभाषेला वाईट दिवस आल्याचे स्पष्ट मत डॉ. नेमाडे यांनी व्यक्त केले.