शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

जीवनाचे चित्र जे व्यवस्थित मांडू शकले ते खरे शिक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : प्रत्येकाने शालेय ज्ञान मिळविणे महत्त्वाचे आहेच, मात्र केवळ वर्गात जाऊन बसणे म्हणजे शिक्षण घेणे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : प्रत्येकाने शालेय ज्ञान मिळविणे महत्त्वाचे आहेच, मात्र केवळ वर्गात जाऊन बसणे म्हणजे शिक्षण घेणे होत नाही. शाळेत जाऊनही अनेक जण ‘अशिक्षित’च असतात. लेखी असो की मौखिक असो, जो जीवनाचे चित्र व्यवस्थित मांडू शकला तो खरा शिक्षित आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी शिक्षण घेतलेले नसले तरी त्यांनी जीवनाचे खरे सार आपल्या काव्यातून मांडले. त्यामुळे त्या खऱ्या अर्थाने शिक्षित म्हणाव्या, असे परखड मत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी जळगावात व्यक्त केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला डॉ. भालचंद्र नेमाडे यांची जैन इरिगेशनमधील सहकारी ज्ञानेश्वर शेंडे यांनी मुलाखत घेतली. त्या वेळी डॉ. नेमाडे यांनी विविध विषयांवर मत व्यक्त केले.

बहिणाबाईंच्या कवितांनी अनेकांना धडा

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे जीवनाविषयीचे परिपूर्ण आकलन होते. आजही महिलांना पुरुषांपेक्षा अधिक आकलन असते. त्यामुळे त्या देश व्यवस्थित चालवू शकत आहेत. १९५२ मध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कविता आल्या त्या वेळी इतर कवींना त्यातून धडा मिळाला, असेही डॉ. नेमाडे यांनी नमूद केले.

बोलीभाषांना वाईट दिवस

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे काव्य ज्या बोलीभाषेत आहे, ते सर्वांना भावते. मुळात प्रत्येक बोलीभाषाच ही मूळ भाषा आहे. मात्र जे लिहिले जाते ती प्रमाणभाषा होते. अशाच प्रकारे राज्यात ३२ बोलीभाषा बोलणाऱ्या सर्वांनी प्रमाणभाषा स्वीकारली, हे त्यांचे मोठेपण आहे. मात्र नंतर ती प्रमाणभाषाच खरी वाटू लागल्याने आज बोलीभाषेला वाईट दिवस आल्याचे स्पष्ट मत डॉ. नेमाडे यांनी व्यक्त केले.