शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

जीवनाचे चित्र जे व्यवस्थित मांडू शकले ते खरे शिक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : प्रत्येकाने शालेय ज्ञान मिळविणे महत्त्वाचे आहेच, मात्र केवळ वर्गात जाऊन बसणे म्हणजे शिक्षण घेणे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : प्रत्येकाने शालेय ज्ञान मिळविणे महत्त्वाचे आहेच, मात्र केवळ वर्गात जाऊन बसणे म्हणजे शिक्षण घेणे होत नाही. शाळेत जाऊनही अनेक जण ‘अशिक्षित’च असतात. लेखी असो की मौखिक असो, जो जीवनाचे चित्र व्यवस्थित मांडू शकला तो खरा शिक्षित आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी शिक्षण घेतलेले नसले तरी त्यांनी जीवनाचे खरे सार आपल्या काव्यातून मांडले. त्यामुळे त्या खऱ्या अर्थाने शिक्षित म्हणाव्या, असे परखड मत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी जळगावात व्यक्त केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला डॉ. भालचंद्र नेमाडे यांची जैन इरिगेशनमधील सहकारी ज्ञानेश्वर शेंडे यांनी मुलाखत घेतली. त्या वेळी डॉ. नेमाडे यांनी विविध विषयांवर मत व्यक्त केले.

बहिणाबाईंच्या कवितांनी अनेकांना धडा

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे जीवनाविषयीचे परिपूर्ण आकलन होते. आजही महिलांना पुरुषांपेक्षा अधिक आकलन असते. त्यामुळे त्या देश व्यवस्थित चालवू शकत आहेत. १९५२ मध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कविता आल्या त्या वेळी इतर कवींना त्यातून धडा मिळाला, असेही डॉ. नेमाडे यांनी नमूद केले.

बोलीभाषांना वाईट दिवस

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे काव्य ज्या बोलीभाषेत आहे, ते सर्वांना भावते. मुळात प्रत्येक बोलीभाषाच ही मूळ भाषा आहे. मात्र जे लिहिले जाते ती प्रमाणभाषा होते. अशाच प्रकारे राज्यात ३२ बोलीभाषा बोलणाऱ्या सर्वांनी प्रमाणभाषा स्वीकारली, हे त्यांचे मोठेपण आहे. मात्र नंतर ती प्रमाणभाषाच खरी वाटू लागल्याने आज बोलीभाषेला वाईट दिवस आल्याचे स्पष्ट मत डॉ. नेमाडे यांनी व्यक्त केले.