शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

जनतेचे लक्ष वळविण्यासाठी 'वन नेशन वन इलेक्शन' - शरद पवार

By विलास बारी | Updated: September 5, 2023 14:03 IST

जळगाव शहरातील अजिंठा विश्रामगृहावर त्यांची पत्रकार परिषद झाली.

जळगाव : केंद्र सरकारच्या विरोधात जनमानसात तीव्र नाराजी आहे.तो नाराजीचा मुद्दा दूर करण्यासाठी व जनतेचे लक्ष दुसऱ्या दिशेने वळविण्यासाठी भाजपने वन नेशन वन इलेक्शनचा मुद्दा पुढे केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रमुख व खासदार शरद पवार यांनी मंगळवारी जळगावात पत्रकार परिषदेत केले.

जळगाव शहरातील अजिंठा विश्रामगृहावर त्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी राज्य सरकारने अन्य कार्यक्रमांना महत्व न देता शेतकऱ्यांच्या प्रश्नांना महत्व द्यायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली.शेतकऱ्यांना पुरेसा वीज पुरवठा आजही उपलब्ध होत नाही आहे.संभाव्य दुष्काळीस्थिती लक्षात घेता शासनाने जी पिके चांगल्या स्थितीत आहेत त्यांना वाचविण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करायला हव्या. यासोबत शेतकत-यांकडून वसुली केली जात आहे ती थांबविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

दुष्काळी परिस्थिती पाहता उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची स्थिती आहे. त्यासाठी उपाययोजना शासनाने कराव्या. तसेच चारा टंचाई निर्माण होण्याआधी त्याबाबत उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगतले. जळगावसह पूर्ण खान्देशात दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे राज्य शासनाने दुष्काळाबाबत तातडीने पावले उचलने गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारJalgaonजळगाव