शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

एका दुपारची गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 13:22 IST

एकदा असे झाले. कस्तुरबा निघाली. वेळ दुपारची होती. बिहारातले रणरणते ऊन. सोबत अवंतिकाबाई होत्या. त्या महाराष्ट्रातल्या होत्या. दुर्गाबेन होत्या. तिघी सोबत निघाल्यात. या बायका एका चौकात थांबल्यात. चौकात मोठे चिंचेचे झाड होते. प्रगाढ सावली होती. तसे बिहारात बांबू खूप. गवताला तर काही सुमार नाही. यापासून झोपड्या बनवायच्या. एका झोपडीपाशी या ...

एकदा असे झाले. कस्तुरबा निघाली. वेळ दुपारची होती. बिहारातले रणरणते ऊन. सोबत अवंतिकाबाई होत्या. त्या महाराष्ट्रातल्या होत्या. दुर्गाबेन होत्या. तिघी सोबत निघाल्यात. या बायका एका चौकात थांबल्यात. चौकात मोठे चिंचेचे झाड होते. प्रगाढ सावली होती. तसे बिहारात बांबू खूप. गवताला तर काही सुमार नाही. यापासून झोपड्या बनवायच्या. एका झोपडीपाशी या तिघी जणी थांबल्यात. हाक मारली.कुणी आहे का घरात? घरातून काहीही हालचाल कशी नाही?’ उत्तरादाखल अपार शांतता होती. कस्तुरबा म्हणाली, ‘तहान लागलीय बाई खूप. कुणी आहे का घरात? पेलाभर पाणी मिळेल का प्यायला? दाराशी साºया बायका आहेत तुमच्या.’झोपडीचे कवाड कुरकुरले. किलकिले झाले. एक हात दाराच्या फटीतून बाहेर आला. कृश, काळा कुळकुळीत हात. हातावर निळ्या रेषांचे घनदाट जाळे. हात काळा कळकट. पेला मात्र कमालीचा स्वच्छ. पेल्यातले पाणी झळाळते. कस्तुरबाने पेला हातात नाही घेतला. पाणी देणारे मनगटच हातात धरले. काळा हात थरथरला.‘कवाड उघड बाई.’‘लाज आती है.’‘बाई ग, तू का नाही येत स्वराज्याच्या कार्यक्रमात बाहेर?’‘अडचण आहे बाई.’‘कसली अडचण आहे?’‘काय करू बाई? आम्हाला चळवळीत सामील व्हायची खूप इच्छा आहे. आम्हाला वाटते की सभेला जावे. नेत्यांचे दोन शब्द आमच्या कानी पडावे, पण काय करणार? मोठी अडचण आहे. या, घरात तर या.’कस्तुरबा आपल्या सख्यांसोबत घरात गेली. घरात तीन बायका होत्या. एकीच्याही अंगावर धडपणे कपडे नव्हते. एक कपडा घरात असायचा. तो पुरुषाने अंगावर घ्यायचा. बाईला तो अर्धा तुकडा अंगावर अर्ध्या साडीसारखा नेसून बाहेर पडावे लागायचे. अंगावर नेसलेली तेवढी एक काय ती साडी. हिंदुस्तानात असल्या झोपड्या अगणित आहेत जिथे काही काही नाही. अंगावरचे कपडे तेवढे जेमतेम आहेत. खूप माणसे अशी रहातात. त्या झोपडीतली एक बाई म्हणाली, ‘आम्ही दोघा जावा घरात आहोत. सासूबाई लुगडे नेसून बाजाराला गेल्या आहेत. अब्रू झाकण्यासाठी आमच्यापाशी दुसरा कपडा नाही. त्यामुळे आम्हाला बाहेर पडता येत नाही. मन मारून झोपडीत बसून रहावे लागते.’कस्तुरबाच्या प्रश्नाला हे उत्तर होते. सायंकाळी तिने दुपारची ही करुण कथा गांधीजींना सांगितली. ते गंभीर झाले. त्यांच्या हृदयात वेदना जागली.(क्रमश:)- प्रा.विश्वास पाटील

टॅग्स :Jalgaonजळगाव