शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
3
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
4
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
5
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
6
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
7
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
8
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
9
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
10
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
11
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
12
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
13
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
14
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
15
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
16
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
17
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
18
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
19
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
20
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या

एका दुपारची गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 13:22 IST

एकदा असे झाले. कस्तुरबा निघाली. वेळ दुपारची होती. बिहारातले रणरणते ऊन. सोबत अवंतिकाबाई होत्या. त्या महाराष्ट्रातल्या होत्या. दुर्गाबेन होत्या. तिघी सोबत निघाल्यात. या बायका एका चौकात थांबल्यात. चौकात मोठे चिंचेचे झाड होते. प्रगाढ सावली होती. तसे बिहारात बांबू खूप. गवताला तर काही सुमार नाही. यापासून झोपड्या बनवायच्या. एका झोपडीपाशी या ...

एकदा असे झाले. कस्तुरबा निघाली. वेळ दुपारची होती. बिहारातले रणरणते ऊन. सोबत अवंतिकाबाई होत्या. त्या महाराष्ट्रातल्या होत्या. दुर्गाबेन होत्या. तिघी सोबत निघाल्यात. या बायका एका चौकात थांबल्यात. चौकात मोठे चिंचेचे झाड होते. प्रगाढ सावली होती. तसे बिहारात बांबू खूप. गवताला तर काही सुमार नाही. यापासून झोपड्या बनवायच्या. एका झोपडीपाशी या तिघी जणी थांबल्यात. हाक मारली.कुणी आहे का घरात? घरातून काहीही हालचाल कशी नाही?’ उत्तरादाखल अपार शांतता होती. कस्तुरबा म्हणाली, ‘तहान लागलीय बाई खूप. कुणी आहे का घरात? पेलाभर पाणी मिळेल का प्यायला? दाराशी साºया बायका आहेत तुमच्या.’झोपडीचे कवाड कुरकुरले. किलकिले झाले. एक हात दाराच्या फटीतून बाहेर आला. कृश, काळा कुळकुळीत हात. हातावर निळ्या रेषांचे घनदाट जाळे. हात काळा कळकट. पेला मात्र कमालीचा स्वच्छ. पेल्यातले पाणी झळाळते. कस्तुरबाने पेला हातात नाही घेतला. पाणी देणारे मनगटच हातात धरले. काळा हात थरथरला.‘कवाड उघड बाई.’‘लाज आती है.’‘बाई ग, तू का नाही येत स्वराज्याच्या कार्यक्रमात बाहेर?’‘अडचण आहे बाई.’‘कसली अडचण आहे?’‘काय करू बाई? आम्हाला चळवळीत सामील व्हायची खूप इच्छा आहे. आम्हाला वाटते की सभेला जावे. नेत्यांचे दोन शब्द आमच्या कानी पडावे, पण काय करणार? मोठी अडचण आहे. या, घरात तर या.’कस्तुरबा आपल्या सख्यांसोबत घरात गेली. घरात तीन बायका होत्या. एकीच्याही अंगावर धडपणे कपडे नव्हते. एक कपडा घरात असायचा. तो पुरुषाने अंगावर घ्यायचा. बाईला तो अर्धा तुकडा अंगावर अर्ध्या साडीसारखा नेसून बाहेर पडावे लागायचे. अंगावर नेसलेली तेवढी एक काय ती साडी. हिंदुस्तानात असल्या झोपड्या अगणित आहेत जिथे काही काही नाही. अंगावरचे कपडे तेवढे जेमतेम आहेत. खूप माणसे अशी रहातात. त्या झोपडीतली एक बाई म्हणाली, ‘आम्ही दोघा जावा घरात आहोत. सासूबाई लुगडे नेसून बाजाराला गेल्या आहेत. अब्रू झाकण्यासाठी आमच्यापाशी दुसरा कपडा नाही. त्यामुळे आम्हाला बाहेर पडता येत नाही. मन मारून झोपडीत बसून रहावे लागते.’कस्तुरबाच्या प्रश्नाला हे उत्तर होते. सायंकाळी तिने दुपारची ही करुण कथा गांधीजींना सांगितली. ते गंभीर झाले. त्यांच्या हृदयात वेदना जागली.(क्रमश:)- प्रा.विश्वास पाटील

टॅग्स :Jalgaonजळगाव