शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांमध्ये वृध्दांचेच प्रमाण अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 12:14 IST

दीड महिन्यात रुग्णालयात ३०पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू : १० महिन्याचे बाळ व ९८ वर्षीय महिलेचाही मृतांमध्ये समावेश

जळगाव : कोरोना बाधीत व कोरोना संशयित असलेल्या ३० च्यावर रुग्णांचा दीड महिन्यात मृत्यू झालेला असून सर्वसाधारण ५५ ते ८० या वयोगटातील वृध्दांचीच अधिक संख्या आहे. त्याशिवाय १० महिन्याच्या एका बाळाचा, ९८ वर्षीय महिला व ९० वर्षीय पुरुषाचाही समावेश आहे. कोरोना बाधीत असले तरी दोन रुग्ण वगळता सर्वांना मधुमेह, हृदयविकार, कोणाला किडनी आजार, कर्करोग अशा विविध प्रकारच्या व्याधी होत्या, असेही आता स्पष्ट झालेले आहे.कोरोना बाधित मृतांची संख्या २५ असून यात केवळ एक ४० वर्षीय इसम आणि एक ४३ वर्षीय इसम आहे. उर्वरित सर्व ५५ वर्षे वयापेक्षा अधिक आहेत.पाचोरा आणि अमळनेर येथील दोघांना कोणत्याही व्याधी नव्हत्या. कोरोना बाधीत असलेल्या तिघांचा मृत्यू रुग्णालयात आणण्यापूर्वीच झाला आहे. तसेच सात संशयितांचाही मृत्यू रुग्णालयात आणण्याआधीच झाला होता. एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींचा आकडा हा ३० च्यावर व ३५ च्या आत आहे. कोरोना बाधित मृत्यूचा आकडा २५ इतका आहे. १० महिने, ४० व ४३ वर्षाचे तीन रुग्ण सोडले तर सर्वच मृत्यू झालेल्यांचे वय हे ५५ व त्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे रुग्णांच्या मृत्यूमध्ये वृध्दांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते.रोगप्रतिकार शक्ती घटल्याने धोका५५ व त्यापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांमध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी असल्याचे हे एक प्रमुख कारण आहे. आजाराशी लढताना मानसिकदृष्ट्या न खचणारे वृध्दही आजारावर मात करीत आहेत. मेहरुणमधील ४८ वर्षीय प्रौढ व मुंगसे, ता.अमळनेर येथील ६० वर्षीय महिला वृध्दा हे त्याचे उदाहरण आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी फळे, मोसंबी, संत्र्याचा ज्यूस, हिरव्या भाज्या, निंबू, कैरी आदींचा आहारात समावेश असावा, त्याशिवाय दर तासांनी थोडं कोमट पाणी घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.जन्म-मृत्यू नोंदणी विभागात नोंदणीच नाहीमनपा जन्म-मृत्यू विभागाचे काम सध्या अतिशय संथगतीने सुरू आहे. या विभागातील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनासाठीच्या उपाययोजनांचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दरम्यान, लॉकडाउन झाल्यानंतर या विभागात शहरातील झालेल्या एकाही मृत्यूची नोंदणी झालेली नाही. ही नोंदणी केवळ स्मशानभूमीत होत आहे. लॉकडाउन काळात ४०७ जणांचा मृत्यू झाला आहे. एप्रिल महिन्यात ३५९ मृत्यू झाले आहेत. तर मे महिन्यात २७ मृत्यू झाले आहेत. तर २५ मार्च ते ३१ मार्च दरम्यान २१ जणांचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव