शहरं
Join us  
Trending Stories
1
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
2
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
4
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
5
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
6
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
7
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
8
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
9
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
10
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
11
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
12
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
13
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
14
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
15
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
16
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
17
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
18
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
19
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
20
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?

कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांमध्ये वृध्दांचेच प्रमाण अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 12:14 IST

दीड महिन्यात रुग्णालयात ३०पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू : १० महिन्याचे बाळ व ९८ वर्षीय महिलेचाही मृतांमध्ये समावेश

जळगाव : कोरोना बाधीत व कोरोना संशयित असलेल्या ३० च्यावर रुग्णांचा दीड महिन्यात मृत्यू झालेला असून सर्वसाधारण ५५ ते ८० या वयोगटातील वृध्दांचीच अधिक संख्या आहे. त्याशिवाय १० महिन्याच्या एका बाळाचा, ९८ वर्षीय महिला व ९० वर्षीय पुरुषाचाही समावेश आहे. कोरोना बाधीत असले तरी दोन रुग्ण वगळता सर्वांना मधुमेह, हृदयविकार, कोणाला किडनी आजार, कर्करोग अशा विविध प्रकारच्या व्याधी होत्या, असेही आता स्पष्ट झालेले आहे.कोरोना बाधित मृतांची संख्या २५ असून यात केवळ एक ४० वर्षीय इसम आणि एक ४३ वर्षीय इसम आहे. उर्वरित सर्व ५५ वर्षे वयापेक्षा अधिक आहेत.पाचोरा आणि अमळनेर येथील दोघांना कोणत्याही व्याधी नव्हत्या. कोरोना बाधीत असलेल्या तिघांचा मृत्यू रुग्णालयात आणण्यापूर्वीच झाला आहे. तसेच सात संशयितांचाही मृत्यू रुग्णालयात आणण्याआधीच झाला होता. एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींचा आकडा हा ३० च्यावर व ३५ च्या आत आहे. कोरोना बाधित मृत्यूचा आकडा २५ इतका आहे. १० महिने, ४० व ४३ वर्षाचे तीन रुग्ण सोडले तर सर्वच मृत्यू झालेल्यांचे वय हे ५५ व त्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे रुग्णांच्या मृत्यूमध्ये वृध्दांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते.रोगप्रतिकार शक्ती घटल्याने धोका५५ व त्यापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांमध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी असल्याचे हे एक प्रमुख कारण आहे. आजाराशी लढताना मानसिकदृष्ट्या न खचणारे वृध्दही आजारावर मात करीत आहेत. मेहरुणमधील ४८ वर्षीय प्रौढ व मुंगसे, ता.अमळनेर येथील ६० वर्षीय महिला वृध्दा हे त्याचे उदाहरण आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी फळे, मोसंबी, संत्र्याचा ज्यूस, हिरव्या भाज्या, निंबू, कैरी आदींचा आहारात समावेश असावा, त्याशिवाय दर तासांनी थोडं कोमट पाणी घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.जन्म-मृत्यू नोंदणी विभागात नोंदणीच नाहीमनपा जन्म-मृत्यू विभागाचे काम सध्या अतिशय संथगतीने सुरू आहे. या विभागातील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनासाठीच्या उपाययोजनांचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दरम्यान, लॉकडाउन झाल्यानंतर या विभागात शहरातील झालेल्या एकाही मृत्यूची नोंदणी झालेली नाही. ही नोंदणी केवळ स्मशानभूमीत होत आहे. लॉकडाउन काळात ४०७ जणांचा मृत्यू झाला आहे. एप्रिल महिन्यात ३५९ मृत्यू झाले आहेत. तर मे महिन्यात २७ मृत्यू झाले आहेत. तर २५ मार्च ते ३१ मार्च दरम्यान २१ जणांचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव