शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावला अतिवृष्टीने हाहाकार, वृद्धेचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:35 IST

चाळीसगाव (जि. जळगाव) : सतत ओढ देत हुलकावणी देणाऱ्या पावसाने सोमवारी रात्री जोरदार बॅटिंग करीत चाळीसगाव परिसराला बेसुमार झोडपून ...

चाळीसगाव (जि. जळगाव) : सतत ओढ देत हुलकावणी देणाऱ्या पावसाने सोमवारी रात्री जोरदार बॅटिंग करीत चाळीसगाव परिसराला बेसुमार झोडपून काढले. अतिवृष्टीमुळे मंगळवारी पहाटे डोंगरी व तितूर नदीकाठालगतचा परिसर जलमय झाला. या दोन्ही नद्या दुथडी भरून वेगाने वाहत होत्या. शिवाजी घाटासह बामोशी दर्गाह परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकानदारांचे मोठे नुकसान झाले. ग्रामीण भागात पशुधनाची मोठी हानी झाली आहे. शेतांमध्ये पाणी आल्याने पिके वाहून गेली. तर एका महिलेचा बुडून मृत्यू झाला. कन्नड घाटात दरड कोसळण्यासह भूस्सखलन झाल्याने वाहतूक ठप्प झाली.

धुळे येथील आपत्ती व्यवस्थापनाची ३० जणांची टीम बोलाविण्यात आली. तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. दुपारी दोन वाजता पाऊस थांबल्याने मदत कार्याला वेग आला होता. सकाळी सहा वाजताच आमदार मंगेश चव्हाण हे प्रशासनाच्या टीमसह नागरिकांच्या मदतीला धावून गेले.

एक अनोळखी मृतदेह वाहून आला

वाकडी येथे कलाबाई सुरेश पवार (वय ६०) या महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर पिंपरखेड येथे आश्रमशाळेच्या मागील बाजूस बाल्डे नदीच्या पाण्यात एक मृतदेह वाहून आला. कन्नड घाटासह पाटणादेवी परिसरात सोमवारी रात्रीनंतर अतिवृष्टी झाल्याने डोंगरी नदीला मोठा पूर आला.

गेल्या २४ तासांपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे.

चौकट कन्नड घाटात दरड कोसळली

अतिवृष्टीने कन्नड घाटातील स्थिती सर्वाधिक भयावह झाली असून, आठ ते दहा ठिकाणी दरड कोसळून भूस्खखलन झाल्याने रस्त्याला मोठमोठी भगदाडे पडली आहेत. यामुळे येथील वाहतूक थांबविण्यात आली आहे. दरम्यान, येथे अनेक वाहने अडकून पडल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. किमान महिनाभर तरी येथून सुरळीत वाहतूक होण्याची शक्यता नाही. पूरग्रस्तांना विविध संस्थांकडून जेवण वगैरे पुरविले जात आहे.

२४ तासांत ५४६ मिमी पाऊस, १० धरणेही ओव्हरफ्लो

मंगळवारपासून सुरू झालेल्या पावसाने बुधवारी तीन वाजेपर्यंत संततधार कायम ठेवल्याने गत २४ तासांत तालुक्यात ५४६ मिमी पाऊस झाला आहे. चाळीसगाव मंडळात ९२ तर तळेगाव मंडळात सर्वाधिक १४५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

भडगाव तालुक्यातही तितूरचा हाहाकार

जळगाव जिल्ह्यात सोमवारी रात्री व मंगळवारी पावसाने सर्वत्र हजेरी लावली. भडगाव तालुक्यात साधारण पाऊस झाला असला तरी चाळीसगावमधून येणाऱ्या तितूर नदीला येथे महापूर आल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांची पिके वाहून गेली आहेत. काही घरांचे व जनावरांचेही नुकसान झाले आहे.